शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मेर्वी कुडतरकरवाडीतील ग्रामस्थांचा रस्ता अडथळा मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:43 IST

gram panchayat Ratnagiri Tahshildar- घराकडे, शेतीकडे, जनावरे नेण्यासाठी पूर्वापार रस्त्यावर दगडी बांध घालून अडवणूक केल्याने मेर्वी कुडतरकरवाडी येथील ग्रामस्थांनी दावा दाखल केला होता. याबाबत वारंवार नोटीस बजावूनही संबंधितांनी रस्ता मोकळा न केल्याने अखेर तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सोमवारी जेसीबीच्या साहाय्याने मार्गातील अडथळे काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर हा रस्ता मोकळा झाला.

ठळक मुद्देमेर्वी कुडतरकरवाडीतील ग्रामस्थांचा रस्ता अडथळा मुक्त तहसीलदारांच्या तत्परतेने ग्रामस्थांना न्याय, ग्रामस्थांमधून समाधान

रत्नागिरी : घराकडे, शेतीकडे, जनावरे नेण्यासाठी पूर्वापार रस्त्यावर दगडी बांध घालून अडवणूक केल्याने मेर्वी कुडतरकरवाडी येथील ग्रामस्थांनी दावा दाखल केला होता. याबाबत वारंवार नोटीस बजावूनही संबंधितांनी रस्ता मोकळा न केल्याने अखेर तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सोमवारी जेसीबीच्या साहाय्याने मार्गातील अडथळे काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर हा रस्ता मोकळा झाला.मेर्वी कुडतरकरवाडी येथील ग्रामस्थांसाठी १२ फुटी रुंद व १६० फूट लांब रस्ता उपलब्ध होता. हा रस्ता याच वाडीतील काहीजणांनी दोन वर्षापूर्वी अडवला होता. रस्त्याच्या बाजूला दगडी बांध घातला आणि फक्त ४ फूट रुंदीचा रस्ता ठेवण्यात आला होता.

त्यानंतर वाडीतील काही ग्रामस्थांनी तत्कालीन तहसीलदारांसमोर दावा दाखल केला आणि यात दोन्ही पक्षांची मते, म्हणणे व पुरावे घेऊन तत्कालीन तहसीलदार यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये या दाव्याचा निकाल देऊन रस्ता खुला करून देण्याचे आदेश दिले होते.या आदेशाविरुध्द वरिष्ठ न्यायालयात अपील करून संबंधितांनी तहसीलदार यांच्या आदेशाला स्थगिती घेतली होती. वरिष्ठ न्यायालयाने सुध्दा या प्रकरणाचा ऑक्टोबर २०१९ मध्ये न्यायनिर्णय देऊन अपील फेटाळले आणि त्याचबरोबर स्थगितीही उठविली होती. त्यानंतर संबंधितांना नोटीस देऊन अडथळा काढून टाकण्याची सूचना करण्यात आली होती, मात्र, तरीही रस्ता मोकळा करण्यात आला नव्हता.

त्यामुळे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी अंतिम नोटीस देऊन अडथळा काढून टाकण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली, तथापि त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने पावस येथील मंडल अधिकारी यांना अडथळा काढून टाकून रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार जाधव यांनी आदेश दिले. त्यानंतर ४ जानेवारी रोजी मेर्वी कुडतरकरवाडी येथील रस्त्यावरील अडथळा जेसीबीच्या मदतीने काढून टाकून रस्ता खुला करून देण्यात आला. त्यामुळे दोन वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.सर्व खर्च वसूल करणारअडथळा शासकीय खर्चाने दूर करण्यासाठी जो खर्च आला आहे. त्याची सक्तीने वसुली जागा अडवणूक करणाऱ्या संबंधितांकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिली. कोणीही कोणाचाही शेतावर जाणारा पूर्वापार वापराचा रस्ता किंवा पाणंद अडवू किंवा अडथळा आणू नये. जेणेकरुन अशा प्रकारे कारवाईस सामोरे जावे लागणार नाही, असे आवाहनही शशिकांत जाधव यांनी केले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीTahasildarतहसीलदार