शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 12:26 IST

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजापुरातील अर्जुना नदीसह कोदवली नदीचे पाणी वाढले आहे. तर खेडमधील जगबुडी आणि चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

ठळक मुद्देचिपळुणातील वाशिष्टीचे पाणी वाढलेराजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा

रत्नागिरी : सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजापुरातील अर्जुना नदीसह कोदवली नदीचे पाणी वाढले आहे. तर खेडमधील जगबुडी आणि चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. 

रत्नागिरीतील चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने मार्ग बंद पडला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणच्या नद्यांना पूर आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेत काजळी नदीचे पाणी भरायला सुरुवात झाली आहे.

काजळी नदीने सकाळी १० वाजता इशारा पातळी ओलांडली आहे. काजळी नदीची इशारा पातळी १६.५० मीटर असून, सकाळी १० वाजता पाणीपातळी १७.२४ मीटर होती. धोका पातळी १८ मीटर आहे.दरम्यान, खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून, पातळी वेगाने वाढत आहे. भरणे नाका पूल येथे सकाळी ८.३० वाजता पाण्याची पातळी साडेसहा मीटर होती. दहा वाजता ती ७.७५ मीटर एवढी झाली होती. इशारा पातळी सहा मीटर असून, धोक्याची पातळी सात मीटर आहे.त्याचबरोबर राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी शहरात घुसू लागले असून, व्यापाऱ्यांनी दुकानातील माल इतरत्र हलविला आहे. चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी