शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

नदीचे पाणी ओसरू लागले, जगबुडी पुलावरुन धिम्या गतीने वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:53 IST

जगबुडीसह नारिंगी नदीच्या पाण्याची पातळीही वाढल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांसह शहरातील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरूवारी सकाळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुलावरचे पाणी ओसरले. त्यानंतर या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देजगबुडी पुलावरुन वाहतूक सुरूखेडला पावसाचा दणका

खेड : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर खेड तालुक्यात पुन्हा पावसाने धुडगूस घालायला सुरुवात केली असल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी रात्री ८ वाजता जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जगबुडीसह नारिंगी नदीच्या पाण्याची पातळीही वाढल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांसह शहरातील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरूवारी सकाळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुलावरचे पाणी ओसरले. त्यानंतर या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली.गेल्या आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात धुवाँधार पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. खेडची जगबुडी व चिपळूणची वाशिष्ठी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकही बंद होती.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली होती. जगबुडी नदीचा उगम असलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस झाल्याने सायंकाळी जगबुडी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती.

जगबुडीचे पाणी जुन्या पुलाला पोहोचण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव यांना देताच जाधव यांनी तत्काळ जगबुडी पुलाला भेट दिली.दरम्यान, खेड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मदत ग्रुपच्या सदस्यांच्या मदतीने रात्री ८ वाजता जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. पूल बंद झाल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या.

जगबुडी पुलावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे जगबुडी नदीचे पाणी ओसरू लागल्यानंतर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या मार्गावर सध्या धिम्या गतीने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :riverनदीRatnagiriरत्नागिरी