शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

संगमेश्वर तालुक्यात भात कापणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 16:18 IST

संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भातकापणीला प्रारंभ केला होता. मात्र, आता परतीचा पाऊस गायब झाल्याने बळीराजा सुखावला असून, तयार झालेले भातपीक घरात आणण्यावर शेतकरी भर देत आहे. त्यामुळे तालुक्यात भातकापणीला वेग आला आहे.

ठळक मुद्देभातपीक घरात आणण्यावर शेतकरी भर शेतकरी भातकापणीत मग्न

देवरूख , दि. २७ :  संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भातकापणीला प्रारंभ केला होता. मात्र, आता परतीचा पाऊस गायब झाल्याने बळीराजा सुखावला असून, तयार झालेले भातपीक घरात आणण्यावर शेतकरी भर देत आहे. त्यामुळे तालुक्यात भातकापणीला वेग आला असून, शेतकरी भातकापणीत मग्न असल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील बहुतांशी ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे येथील जनता शेतीवरच अवलंबून असून, या आधारे ते आपली गुजराण करतात. यावर्षीही तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भातशेती केली आहे. मात्र, भातपीक तयार होत असतानाच तालुक्यात मुसळधार पावसाने जोर धरत तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले होते.

हा पाऊस तालुक्यात सतत पडत असल्यामुळे त्याचा फटका भातशेतीला बसला होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेतो की काय? या विवंचनेत बळीराजा सापडला होता. अनेक ठिकाणी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले.

एकीकडे भातपीक कापणीयोग्य होत असतानाच दुसरीकडे मुसळधार पाऊस पडत असल्याने तयार झालेले भातपीक कापायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. संगमेश्वर तालुक्यात सद्यस्थितीत दुपारच्या वेळेत प्रचंड उकाडा जाणवत असल्याने सकाळच्या वेळेतच शेतकरी भातपिकाची कापणी करीत आहेत. तर काही ठिकाणी उन्हाची तमा न बाळगता शेतकरी भातकापणीत दंग असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :konkanकोकणFarmerशेतकरी