शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

७५ दिवसांतच गंगामाईचे पुनरागमन, सर्व कुंडांमध्ये मुबलक पाण्याचा प्रवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 17:03 IST

यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या गंगामाईचे आगमन व गमन या कालखंडाला छेद मिळाला आहे.

राजापूर : दिवसागणिक हवेतील उष्मा आणि तापमान वाढत असताना शहरानजीकच्या उन्हाळे येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन झाले आहे. तब्बल ७५ दिवसांनंतर १५ मे रोजी गंगामाईचे आगमन झाले असून, सद्यस्थितीमध्ये मूळ गंगा, काशिकुंड, गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती गंगा देवस्थानचे पदाधिकारी श्रीकांत घुगरे यांनी दिली.शहरानजीकच्या उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री गंगामाईचे होणारे आगमन आणि वास्तव्याचा काळ भाविकांच्या दृष्टीने एक धार्मिक पर्वणी असते. त्यामुळे गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात विविध राज्यांतील भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येतात. मात्र, कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेक भाविकांना गंगास्नानाची ही पर्वणी साधता आलेली नव्हती. अशा स्थितीमध्ये गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गंगामाईचे फेब्रुवारी महिन्यामध्ये निर्गमन झाले होते. त्यानंतर, ७५ दिवसांनंतर पुन्हा एकदा गंगामाईचे आगमन झाले आहे.सद्यस्थितीमध्ये मूळ गंगेसह गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवास असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे पुन्हा एकदा आगमन झालेले असले तरी, भाविकांची गंगास्नानासाठी फारशी गर्दी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गंगा - धूतपापेश्वर विवाहाची प्रथागंगेचा राजापूरनजीक असलेल्या धूतपापेश्वरशी विवाह सोहळा होतो. यापूर्वी २००३-०४ साली गंगा आणि धूतपापेश्वर यांचा विवाह सोहळा पार पडला होता. हा सोहळा प्रतिवर्षी होत नाही. त्यामुळे आजपर्यंत हा विवाह साेहळा झालेला नाही.

  • यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या गंगामाईचे आगमन व गमन या कालखंडाला छेद मिळाला आहे.
  • मागील काही वर्षात सलग दुसऱ्या वर्षीही गंगेचे आगमन झाल्याची घटना घडली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज, आर्याकार कवी मोरोपंत गंगाक्षेत्रावर आल्याची इतिहासात नोंद मिळते.
  • गंगा क्षेत्राचा आणि काशीचा संबंध असल्याची चर्चा सातत्याने  ऐकायला मिळते.
  • प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे जाणवते.
  • गंगेच्या आगमनापूर्वी हिवाळ्यात उष्ण स्वरूपाचे वारे वाहतात. गंगेच्या आगमनाची ती चाहूल असते.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी