शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोरांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 16:40 IST

पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोरांची माघारशिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार

चिपळूण : पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.चिपळूणमधील माटे सभागृहात सोमवारी दुपारी शिवसेना - भाजपची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, भाजप उमेदवार तुषार खेतल, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, बांधकाम सभापती विनोद झगडे, ज्येष्ठ कर्यकर्ते सुधीर काणे, बाळा कदम यांच्यासह शिवसेना - भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पटवर्धन यांनी राजापूरमधून प्रसाद पाटोळे, संतोष गांगण , चिपळूणमधून तुषार खेतल, गुहागरमधून रामदास राणे, दापोलीमधून केदार साठे या भाजप उमेदवारांनी माघार घेतली असल्याचे जाहीर केले.दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, एकही मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज होते. म्हणून आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्वांना युतीची भूमिका पटवून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल म्हणाले की, कार्यकत्यार्ना न्याय मिळण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अर्ज दाखल केला होता. मात्र, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष यांनी चर्चा केली. त्यानंतर अर्ज माघारीचा निर्णय घेतल्याचे सांगितले.आमदार सदानंद चव्हाण म्हणाले की, खेतल यांचा अर्ज अपक्ष म्हणून होता. मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते पण त्यांनी पक्षादेश मानत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभा