शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

आंबा पिकावरील फूलकिडे नियंत्रणासाठी संशोधन सुरू : डॉ. व्ही. एन. जालगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:52 IST

रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे आंबा बागायतदार तुडतुड्यासह फूलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत ...

रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे आंबा बागायतदार तुडतुड्यासह फूलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत नाही. तुडतुडे आणि फूलकिड्यांच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठामध्ये संशोधन सुरू असून, लवकरच योग्य उपाययोजनाबाबतची माहिती बागायतदारांना देऊ, असे आश्वासन डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख डाॅ. व्ही. एन. जालगावकर यांनी दिले.रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे रविवारी आंबा बागायतदारांसाठी रत्नागिरीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डाॅ. जालगावकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डाॅ. महेश कुलकर्णी, जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, मंदार सरपोतदार उपस्थित होते.डाॅ. जालगावकर यांनी सांगितले की, अति कीटकनाशकांचा वापर, सातत्याने कीटकनाशकांची फवारणी, दोन ते तीन कीटकनाशक एकाचवेळी वापरल्यामुळे कीडरोग नियंत्रणात येत नाही. काही ठिकाणी थ्रीप्स आटोक्यात आला नाही किंवा त्याने नुकसानही केल्याचे दिसले नाही. फूलकिडे नियंत्रणाबाबत सध्या विद्यापीठात संशोधन सुरू आहे. गतवर्षीच्या हंगामात काही आंबा बागेत प्रात्यक्षिके घेण्यात आली. १५ दिवसांच्या फरकानंतर विशिष्ट कीटकनाशकांच्या फवारण्या करण्यात आल्या. काही झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचेल, असे कीटकनाशक पाण्यातून देण्यात आली. त्याचा वापर प्रभावी ठरल्याचे त्यांनी सांगितले. फळमाशीसाठी रक्षक सापळा वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.डाॅ. महेश कुलकर्णी म्हणाले की, आंबा बागेतील प्रत्येक झाडाच्या पानावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे. योग्य उष्णता असेल, तर झाडावरील कीडरोगाचे प्रमाण कमी होईल. अन्यथा वेळच्या वेळी फांद्यांची छाटणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या उत्तरार्धात बागायतदारांना फवारणीसाठी ड्रोनचा वापर करून त्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मंदार सरपोतदार यांनी या कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले.

गोगलगायींचा प्रादुर्भावसध्या गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याबाबतचेही संशोधन पूर्णत्वाकडे असल्याचे डाॅ. जालगावकर यांनी सांगितले. सध्या तरी गोगलगायी एकत्र करून युरियाच्या पाण्यात टाकण्याची सूचना त्यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाfarmingशेतीResearchसंशोधन