शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने दिला अहवाल, नीलम गोऱ्हे म्हणाल्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 11:50 IST

पुरातत्व विभागाचे म्हणणे असते की, मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. ते होण्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची गरज असते. रत्नागिरीमध्ये आर्किटेक्टरची कमी नाही, अशा वाड्यांचे जतन करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मदतीने वाड्याचे चांगले जतन व्हावे.

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने अहवाल दिला असून, त्यांनी काही अडचणी मांडल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. त्यासाठी अशा वाड्यांचे जतन करणाऱ्या आर्किटेक्टच्या मदतीने वाड्याचे जतन व्हावे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रत्नागिरीत व्यक्त केले.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. दोन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये त्या विविध मंदिरांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी आज, सोमवारी रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मभूमीला भेट देऊन केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, लोकमान्य टिळक यांचे हे जन्मस्थान, कर्मभूमी पुण्यात आहे. त्यांचा वाडा, पुण्यात वास्तव्य असलेला वाडा आणि त्यांचे चरित्र हे फक्त मराठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील व्यक्तिला माहिती आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश, देव आणि धर्मासाठी समर्पित केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या संदर्भात पुनर्वसनाचे आणि मदतीचे कार्य केले. त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्यातील सामाजिक घटकांना अधिक मदत व्हावी, यासाठीच हा दौरा असल्याचे त्या म्हणाल्या. या दौऱ्याची सुरुवातच लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानापासून केली आहे. त्याचबरोबर पतितपावन मंदिर आणि अन्य ठिकाणांना भेटी देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली...तर चांगला फरक पडतोत्या पुढे म्हणाल्या की, दुर्दैव्याने पुरातत्व विभागाच्या अडचणी सगळीकडे दिसत आहेत. परंतु, त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला तर त्यांच्या एकूणच कारभारात चांगला फरक पडतो, असे निदर्शनाला आले आहे. पुरातत्व विभागाने पाणी गळत आहे, दुरुस्तीत काही अडचणी आहेत, याबाबतचा अहवाल दिला आहे. पुरातत्व विभागाचे म्हणणे असते की, मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. ते होण्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची गरज असते. रत्नागिरीमध्ये आर्किटेक्टरची कमी नाही, अशा वाड्यांचे जतन करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मदतीने वाड्याचे चांगले जतन व्हावे, असा माझा प्रयत्न राहिल, असे उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले. याचा सर्व अहवाल पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीLokmanya Tilakलोकमान्य टिळकNeelam gorheनीलम गो-हे