शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने दिला अहवाल, नीलम गोऱ्हे म्हणाल्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 11:50 IST

पुरातत्व विभागाचे म्हणणे असते की, मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. ते होण्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची गरज असते. रत्नागिरीमध्ये आर्किटेक्टरची कमी नाही, अशा वाड्यांचे जतन करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मदतीने वाड्याचे चांगले जतन व्हावे.

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने अहवाल दिला असून, त्यांनी काही अडचणी मांडल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. त्यासाठी अशा वाड्यांचे जतन करणाऱ्या आर्किटेक्टच्या मदतीने वाड्याचे जतन व्हावे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रत्नागिरीत व्यक्त केले.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. दोन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये त्या विविध मंदिरांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी आज, सोमवारी रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मभूमीला भेट देऊन केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, लोकमान्य टिळक यांचे हे जन्मस्थान, कर्मभूमी पुण्यात आहे. त्यांचा वाडा, पुण्यात वास्तव्य असलेला वाडा आणि त्यांचे चरित्र हे फक्त मराठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील व्यक्तिला माहिती आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश, देव आणि धर्मासाठी समर्पित केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या संदर्भात पुनर्वसनाचे आणि मदतीचे कार्य केले. त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्यातील सामाजिक घटकांना अधिक मदत व्हावी, यासाठीच हा दौरा असल्याचे त्या म्हणाल्या. या दौऱ्याची सुरुवातच लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानापासून केली आहे. त्याचबरोबर पतितपावन मंदिर आणि अन्य ठिकाणांना भेटी देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली...तर चांगला फरक पडतोत्या पुढे म्हणाल्या की, दुर्दैव्याने पुरातत्व विभागाच्या अडचणी सगळीकडे दिसत आहेत. परंतु, त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला तर त्यांच्या एकूणच कारभारात चांगला फरक पडतो, असे निदर्शनाला आले आहे. पुरातत्व विभागाने पाणी गळत आहे, दुरुस्तीत काही अडचणी आहेत, याबाबतचा अहवाल दिला आहे. पुरातत्व विभागाचे म्हणणे असते की, मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. ते होण्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची गरज असते. रत्नागिरीमध्ये आर्किटेक्टरची कमी नाही, अशा वाड्यांचे जतन करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मदतीने वाड्याचे चांगले जतन व्हावे, असा माझा प्रयत्न राहिल, असे उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले. याचा सर्व अहवाल पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीLokmanya Tilakलोकमान्य टिळकNeelam gorheनीलम गो-हे