शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
2
Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट
3
भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद; श्वान सुखरूप...
4
१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला
5
भारतात का वाढतेय इन्फ्लुएंसर बनण्याची क्रेझ? यातील पैसा आणि आकडेवारी पाहून विश्वास नाही बसणार!
6
Meesho IPO Listing : स्वस्त सामान विकणाऱ्या 'मीशो'ची शेअर बाजारात तुफान एन्ट्री; ४५% प्रीमिअमवर लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल
7
ताडोबातील दुसरी वाघीणही सह्याद्रीच्या कुशीत! 'टी ७- एस २' मादीचे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारलीमध्ये 'सॉफ्ट रिलीज'
8
Shocking: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूनं मागितला घटस्फोट; कारण ऐकून दोन्ही कुटुंब हादरले!
9
CDF बनताच असीम मुनीर यांनी भारताविरोधात गरळ ओकली; तालिबानलाही धमकी, "तुमच्याकडे २ पर्याय..."
10
पत्नीसोबत Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पाहा डिटेल्स
11
Leopard Attack: नागपुरात बिबट्याची दहशत! पारडी भागात पहाटे चौघांवर हल्ला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
12
मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ
13
ज्यांच्यासाठी विनोद खन्नांनी कुटुंब-इंडस्ट्रीचा केलेला त्याग, त्या ओशोंबद्दल 'धुरंधर' फेम अभिनेत्याला काय वाटतं? म्हणालेला...
14
Video: फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल
15
बायकोशी झालेल्या तुफान वादातून पतीचा 'हाय व्होल्टेज' ड्रामा! पाण्याच्या टाकीवर चढला, पण पुढे काय झालं...
16
Census 2027: मोबाईल ॲप, वेबसाईटवरून माहिती गोळा करणार; 2027च्या जनगणनेबद्दल केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा
17
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत २५,८०० च्या जवळ; ऑटो, रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी
18
एकूण ३५० खेळाडूंवर लागणार बोली; आयपीएल लिलाव : २४० भारतीय खेळाडूंचा समावेश
19
पाकिस्तानी पत्नीने भारतीय उच्च न्यायलायचे दरवाजे ठोठावले! नेमका वाद काय? का पोहोचली कोर्टात?
20
लव्ह मॅरेज, विश्वासघात अन् कलम ४९८ चा गैरवापर...; विवाहित युवकाने उचललं धक्कादायक पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने दिला अहवाल, नीलम गोऱ्हे म्हणाल्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 11:50 IST

पुरातत्व विभागाचे म्हणणे असते की, मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. ते होण्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची गरज असते. रत्नागिरीमध्ये आर्किटेक्टरची कमी नाही, अशा वाड्यांचे जतन करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मदतीने वाड्याचे चांगले जतन व्हावे.

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने अहवाल दिला असून, त्यांनी काही अडचणी मांडल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. त्यासाठी अशा वाड्यांचे जतन करणाऱ्या आर्किटेक्टच्या मदतीने वाड्याचे जतन व्हावे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रत्नागिरीत व्यक्त केले.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. दोन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये त्या विविध मंदिरांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी आज, सोमवारी रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मभूमीला भेट देऊन केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, लोकमान्य टिळक यांचे हे जन्मस्थान, कर्मभूमी पुण्यात आहे. त्यांचा वाडा, पुण्यात वास्तव्य असलेला वाडा आणि त्यांचे चरित्र हे फक्त मराठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील व्यक्तिला माहिती आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश, देव आणि धर्मासाठी समर्पित केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या संदर्भात पुनर्वसनाचे आणि मदतीचे कार्य केले. त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्यातील सामाजिक घटकांना अधिक मदत व्हावी, यासाठीच हा दौरा असल्याचे त्या म्हणाल्या. या दौऱ्याची सुरुवातच लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानापासून केली आहे. त्याचबरोबर पतितपावन मंदिर आणि अन्य ठिकाणांना भेटी देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली...तर चांगला फरक पडतोत्या पुढे म्हणाल्या की, दुर्दैव्याने पुरातत्व विभागाच्या अडचणी सगळीकडे दिसत आहेत. परंतु, त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला तर त्यांच्या एकूणच कारभारात चांगला फरक पडतो, असे निदर्शनाला आले आहे. पुरातत्व विभागाने पाणी गळत आहे, दुरुस्तीत काही अडचणी आहेत, याबाबतचा अहवाल दिला आहे. पुरातत्व विभागाचे म्हणणे असते की, मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. ते होण्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची गरज असते. रत्नागिरीमध्ये आर्किटेक्टरची कमी नाही, अशा वाड्यांचे जतन करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मदतीने वाड्याचे चांगले जतन व्हावे, असा माझा प्रयत्न राहिल, असे उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले. याचा सर्व अहवाल पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीLokmanya Tilakलोकमान्य टिळकNeelam gorheनीलम गो-हे