शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुरातून सुटका, चिपळुणातील रस्त्यावरच्या पाण्याचा प्रश्न सुटेना!, वाहतूकदारांसह नागरिक हैराण

By संदीप बांद्रे | Updated: July 26, 2023 18:25 IST

नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी

चिपळूण : मुसळधार पावसामुळे बुधवारी दिवसभर चिपळूण शहर व परिसराला अक्षरशः झोडपले. मंगळवारी दुपारनंतर बाजारपेठ परिसरात रस्त्यावर आलेले पुराचे पाणीही निघून गेले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत व बुधवारी पहाटेही पाऊस धो धो कोसळत होता. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी होताच पुराचा धोका टळला. परंतु त्यानंतरही शहरातील काही मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही पावसाचे पाणी दिवसभर साचले होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मंगळवारी पुन्हा येथे काहीशी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहर व आजूबाजूचा परिसर मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात पाणी आले होते. मात्र ओहोटीमुळे पुराचा धोका टळला. परंतु या पावसामुळे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही पाणी साचल्याने अनेकांना त्याचा फटका बसला. बुधवारी देखील पावसाचा जोर वाढतच राहील्याने काही रस्त्यावर एक ते दोन फूटापर्यंत पाणी होते. अनंत आईस फॅक्टरी व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे नेहमीच पाणी साचत आहे.  तर मुरादपूर, पेठमाप व गोवळकोट परिसरातील अंतर्गंत रस्त्यांवर पाणी पातळी अधिक होती. मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालयासमोर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. याशिवाय मिरजोळी साखरवाडी येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे देखील अनेकांना फटका बसला.गेल्या दोन दिवसात येथे २६० मिलिमीटर तर आतातपर्यंत एकूण २०७० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. परंतु अद्याप पावसाने २४ तासात २००मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. तरीही गाळ उपशामुळे वाशिष्ठी व शिवनदीच्या वहन क्षमतेत वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच बाजारपेठेत पुराचे पाणी शिरता शिरता थांबले आणि तूर्तास हा धोका टळला. त्यामुळे तीन दिवस मुसळधार पाऊस होऊन देखील चिपळूणकरांना पुराचा सामना करावा लागला नाही. मात्र आता चिपळूणकर वेगळ्याच विषयामुळे अडचणीत आले आहेत. ते म्हणजे रस्त्यावर साचत असलेल्या पाण्यामुळे काहींना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. शहरात काही ठिकाणी बांधकामांचे अतिक्रमण झाले असल्याने व काहींनी गाळ उपश्यानंतर त्याचा जागोजागी भराव टाकल्याने नैसर्गिक नाले तुंबू लागले आहेत. परिणामी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूकRainपाऊस