शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पुरातून सुटका, चिपळुणातील रस्त्यावरच्या पाण्याचा प्रश्न सुटेना!, वाहतूकदारांसह नागरिक हैराण

By संदीप बांद्रे | Updated: July 26, 2023 18:25 IST

नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी

चिपळूण : मुसळधार पावसामुळे बुधवारी दिवसभर चिपळूण शहर व परिसराला अक्षरशः झोडपले. मंगळवारी दुपारनंतर बाजारपेठ परिसरात रस्त्यावर आलेले पुराचे पाणीही निघून गेले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत व बुधवारी पहाटेही पाऊस धो धो कोसळत होता. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी होताच पुराचा धोका टळला. परंतु त्यानंतरही शहरातील काही मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही पावसाचे पाणी दिवसभर साचले होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मंगळवारी पुन्हा येथे काहीशी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहर व आजूबाजूचा परिसर मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात पाणी आले होते. मात्र ओहोटीमुळे पुराचा धोका टळला. परंतु या पावसामुळे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही पाणी साचल्याने अनेकांना त्याचा फटका बसला. बुधवारी देखील पावसाचा जोर वाढतच राहील्याने काही रस्त्यावर एक ते दोन फूटापर्यंत पाणी होते. अनंत आईस फॅक्टरी व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे नेहमीच पाणी साचत आहे.  तर मुरादपूर, पेठमाप व गोवळकोट परिसरातील अंतर्गंत रस्त्यांवर पाणी पातळी अधिक होती. मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालयासमोर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. याशिवाय मिरजोळी साखरवाडी येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे देखील अनेकांना फटका बसला.गेल्या दोन दिवसात येथे २६० मिलिमीटर तर आतातपर्यंत एकूण २०७० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. परंतु अद्याप पावसाने २४ तासात २००मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. तरीही गाळ उपशामुळे वाशिष्ठी व शिवनदीच्या वहन क्षमतेत वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच बाजारपेठेत पुराचे पाणी शिरता शिरता थांबले आणि तूर्तास हा धोका टळला. त्यामुळे तीन दिवस मुसळधार पाऊस होऊन देखील चिपळूणकरांना पुराचा सामना करावा लागला नाही. मात्र आता चिपळूणकर वेगळ्याच विषयामुळे अडचणीत आले आहेत. ते म्हणजे रस्त्यावर साचत असलेल्या पाण्यामुळे काहींना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. शहरात काही ठिकाणी बांधकामांचे अतिक्रमण झाले असल्याने व काहींनी गाळ उपश्यानंतर त्याचा जागोजागी भराव टाकल्याने नैसर्गिक नाले तुंबू लागले आहेत. परिणामी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूकRainपाऊस