शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

पुरातून सुटका, चिपळुणातील रस्त्यावरच्या पाण्याचा प्रश्न सुटेना!, वाहतूकदारांसह नागरिक हैराण

By संदीप बांद्रे | Updated: July 26, 2023 18:25 IST

नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी

चिपळूण : मुसळधार पावसामुळे बुधवारी दिवसभर चिपळूण शहर व परिसराला अक्षरशः झोडपले. मंगळवारी दुपारनंतर बाजारपेठ परिसरात रस्त्यावर आलेले पुराचे पाणीही निघून गेले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत व बुधवारी पहाटेही पाऊस धो धो कोसळत होता. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी होताच पुराचा धोका टळला. परंतु त्यानंतरही शहरातील काही मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही पावसाचे पाणी दिवसभर साचले होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मंगळवारी पुन्हा येथे काहीशी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहर व आजूबाजूचा परिसर मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात पाणी आले होते. मात्र ओहोटीमुळे पुराचा धोका टळला. परंतु या पावसामुळे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही पाणी साचल्याने अनेकांना त्याचा फटका बसला. बुधवारी देखील पावसाचा जोर वाढतच राहील्याने काही रस्त्यावर एक ते दोन फूटापर्यंत पाणी होते. अनंत आईस फॅक्टरी व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे नेहमीच पाणी साचत आहे.  तर मुरादपूर, पेठमाप व गोवळकोट परिसरातील अंतर्गंत रस्त्यांवर पाणी पातळी अधिक होती. मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालयासमोर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. याशिवाय मिरजोळी साखरवाडी येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे देखील अनेकांना फटका बसला.गेल्या दोन दिवसात येथे २६० मिलिमीटर तर आतातपर्यंत एकूण २०७० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. परंतु अद्याप पावसाने २४ तासात २००मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. तरीही गाळ उपशामुळे वाशिष्ठी व शिवनदीच्या वहन क्षमतेत वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच बाजारपेठेत पुराचे पाणी शिरता शिरता थांबले आणि तूर्तास हा धोका टळला. त्यामुळे तीन दिवस मुसळधार पाऊस होऊन देखील चिपळूणकरांना पुराचा सामना करावा लागला नाही. मात्र आता चिपळूणकर वेगळ्याच विषयामुळे अडचणीत आले आहेत. ते म्हणजे रस्त्यावर साचत असलेल्या पाण्यामुळे काहींना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. शहरात काही ठिकाणी बांधकामांचे अतिक्रमण झाले असल्याने व काहींनी गाळ उपश्यानंतर त्याचा जागोजागी भराव टाकल्याने नैसर्गिक नाले तुंबू लागले आहेत. परिणामी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूकRainपाऊस