शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

रत्नागिरीत रविवारपासून शहरवासियांना नियमित पाणीपुरवठा

By मेहरून नाकाडे | Updated: June 15, 2024 17:44 IST

पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिक ‘पाणी कपात’ बंद करण्याची मागणी करत होते. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शीळ धरणातील पाण्याची पातळी पाहून पाणी कपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी - मान्सून जिल्ह्यात चांगला बरसत असून आतापर्यंत सरासरी २६०. ४६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. त्यामुळे नद्या, विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ‘शीळ’ धरणातील पाण्याची पातळी उंचावल्याने शहरवासियांना रविवार (दि.१६) पासून नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

रत्नागिरी शहराला ‘शीळ’ धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणातील पाणीसाठा खालावला होता. मान्सून पर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा पुरेसा करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे सोमवार १३ मे पासून ‘एक दिवसा आड पाणी पुरवठा’ सुरू होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.

पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिक ‘पाणी कपात’ बंद करण्याची मागणी करत होते. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शीळ धरणातील पाण्याची पातळी पाहून पाणी कपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारपासून नागरिकांना दररोज पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

रत्नागिरी शहरात ११ हजार २८८ नळजोडण्या असून दिवसाला २० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. रविवारपासून योग्य दाबाने नागरिकांना पाणीपुरवठा होणार असल्याचे रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी