शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, पण... : सामाजिक संस्था ठरताहेत चिमुकल्यांसाठी भाग्यविधात्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:29 IST

बालदिनाचा सोहळा वर्षातून केवळ नावापुरता करून वर्षभर वंचित बालकांच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करीत असले तरी सेवाभावी संस्था पदरमोड करीत अशा मुलांसाठी कार्य करीत असल्याने या मुलांना मायेची ऊब मिळतानाच त्यांचे आयुष्यही घडविली जात आहेत. या संस्था या मुलांची भाग्यविधाते ठरू लागल्या आहेत.

ठळक मुद्देशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, पण... : सामाजिक संस्था ठरताहेत चिमुकल्यांसाठी भाग्यविधात्याबालदिन विशेष : हरवलेल्या बालपणात बालगृहांमध्ये मायेचा आसरा

शोभना कांबळे 

रत्नागिरी : बालदिनाचा सोहळा वर्षातून केवळ नावापुरता करून वर्षभर वंचित बालकांच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करीत असले तरी सेवाभावी संस्था पदरमोड करीत अशा मुलांसाठी कार्य करीत असल्याने या मुलांना मायेची ऊब मिळतानाच त्यांचे आयुष्यही घडविली जात आहेत. या संस्था या मुलांची भाग्यविधाते ठरू लागल्या आहेत.१४ नोव्हेंबर, मुलांचे लाडके चाचा, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुलांना निखळ आनंद मिळावा, यासाठी या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. ह्यनेमेचि येतो मग पावसाळाह्ण या उक्तीप्रमाणे बालदिन साजरा होतो.

या दिवशी कुठल्या तरी बालगृहात जाऊन तेथील बालकांना खाऊ, कपडे, जेवण यांचे वाटप होते. काहीजण तर आपला वाढदिवसही या मुलांसमवेत साजरा करायला बालगृहात जातात. पण वर्षभर या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या संस्थांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याची कल्पना फारच थोड्यांना असेल.आज ज्या संस्था पदरमोड करून बालगृह चालवत आहेत, त्यांना शासनाच्या जाचक धोरणामुळे संस्था चालवताना नाकीनऊ येऊ लागले आहे.. शासनाने कितीही घोषणा केल्या तरी राज्याच्या बाल विकास विभागाकडे खुद्द शासनाचेच दुर्लक्ष झाले आहे. आज महागाई गगनाला भिडू पाहात असताना शासनाकडून प्रतिपोषणाचा खर्च प्रतिमूल १५०० रूपये केवळ जाहीर करण्यात आले असला तरी प्रत्यक्षात अजूनही नऊशे रूपये इतकाच खर्च शासनाकडून दिला जात आहे. शासनाची इतर धोरणेही जाचक असल्याने या संस्था त्रस्त झाल्या आहेत.जिल्ह्यात रत्नागिरीतील डॉ. न. दा. पानवलकर बालगृह, माहेर, ओणी (ता. राजापूर) येथील वात्सल्य मंदिर, देवरूख येथील गोकुळ, लांजातील बालगृह या संस्था शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता निराधार मुलांचे भविष्य घडविण्याचे कार्य दात्यांच्या सहकार्याने, प्रसंगी पदरमोड करून करीत आहेत.

या संस्थांच्या मायेची ऊब या मुलांना मिळत असल्याने त्यांना विविध सणांचा आनंद मिळतो आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेतच नव्हे; तर विविध क्षेत्रातही यश मिळवू लागली आहेत. संस्थांच्या छताखाली राहून शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय करून स्वावलंबी बनली आहेत.शासनाच्या बालविकासाच्या केवळ घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात बालविकास झाकोळलेलाच आहे. बाल हक्कांची पायमल्ली होत आहे. मात्र, शासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. 

आज बालगृह चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या जाचक धोरणामुळे बालगृहे चालविणे जिकिरीचे झाले आहे. मुले ही देशाची बहुमोल संपत्ती आहे, असा विचार करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. वंचित बालकांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात, त्यांची सोडवणूक व्हायला हवी. एक बालदिन साजरा करून बालकांचा विकास होणार नाही.- डॉ. महेंद्र गुजर,वात्सल्यमंदिर, ओणी

टॅग्स :children's dayबालदिनRatnagiriरत्नागिरी