शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही, नीलेश राणेंनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 18:54 IST

राजापुरात येणाऱ्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता

राजापूर : तालुक्यात आलेला करोडोंची उलाढाल असणारा रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही. त्यासाठी सज्ज व्हा, कुठल्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच मार्गी लागेल, अशा शब्दात भाजपचे सचिव नीलेश राणे यांनी सांगितले.

राजापूर शहरातील श्रीमंगल कार्यालयात भाजपतर्फे रविवारी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बाेलत हाेते. या मेळाव्याला माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, ॲड. विलास पाटणे, संतोष गांगण, उल्का विश्वासराव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजापुरात येणाऱ्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता. मात्र आता परिस्थिती खूप बदलली आहे. प्रकल्पाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. भविष्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील प्रत्येक गावातील बेरोजगारांना या प्रकल्पातून रोजगार मिळतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या बाजूने कोकणी माणसाने राहिले पाहिजे, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.

पूर्वी राजापूर हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राजापूर तालुका रिफायनरी प्रकल्पामुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बनणार आहे. कोकणचे भवितव्य उज्ज्वल असताना दुसरीकडे काही नतद्रष्ट मंडळी कोकणी जनतेला चुकीचे मार्गदर्शन करताना त्यांची माथी भडकविण्याचे काम करीत आहेत. अशा मंडळींना त्यांची जागा दाखविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन नीलेश राणे यांनी केले.राजापूर तालुक्यातच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार हे निश्चित असून त्यासाठी सज्ज व्हा, आपल्यासमवेत या, कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, ॲड. विलास पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. रिफायनरी प्रकल्प कसा उपयुक्त ठरेल ते सर्वांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पNilesh Raneनिलेश राणे