शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही, नीलेश राणेंनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 18:54 IST

राजापुरात येणाऱ्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता

राजापूर : तालुक्यात आलेला करोडोंची उलाढाल असणारा रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही. त्यासाठी सज्ज व्हा, कुठल्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच मार्गी लागेल, अशा शब्दात भाजपचे सचिव नीलेश राणे यांनी सांगितले.

राजापूर शहरातील श्रीमंगल कार्यालयात भाजपतर्फे रविवारी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बाेलत हाेते. या मेळाव्याला माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, ॲड. विलास पाटणे, संतोष गांगण, उल्का विश्वासराव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजापुरात येणाऱ्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता. मात्र आता परिस्थिती खूप बदलली आहे. प्रकल्पाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. भविष्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील प्रत्येक गावातील बेरोजगारांना या प्रकल्पातून रोजगार मिळतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या बाजूने कोकणी माणसाने राहिले पाहिजे, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.

पूर्वी राजापूर हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राजापूर तालुका रिफायनरी प्रकल्पामुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बनणार आहे. कोकणचे भवितव्य उज्ज्वल असताना दुसरीकडे काही नतद्रष्ट मंडळी कोकणी जनतेला चुकीचे मार्गदर्शन करताना त्यांची माथी भडकविण्याचे काम करीत आहेत. अशा मंडळींना त्यांची जागा दाखविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन नीलेश राणे यांनी केले.राजापूर तालुक्यातच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार हे निश्चित असून त्यासाठी सज्ज व्हा, आपल्यासमवेत या, कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, ॲड. विलास पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. रिफायनरी प्रकल्प कसा उपयुक्त ठरेल ते सर्वांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पNilesh Raneनिलेश राणे