शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रिफायनरी प्रकल्प राजापूरच्या भविष्यकालीन विकासाची नांदी : जमीर खलिफे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST

राजापूर : तालुक्यात नव्याने गोवळ, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी वाढती मागणी आणि समर्थन निश्चितच ...

राजापूर : तालुक्यात नव्याने गोवळ, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी वाढती मागणी आणि समर्थन निश्चितच भविष्यातील राजापूरच्या विकासाची नांंदी आहे. या प्रकल्पाचे जाहीर समर्थन करून राजापूर नगर परिषदेने उचललेले पाऊलही तेवढेच महत्त्वाचे आणि भविष्यातील शहराच्या विकासाला गती देणारे ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून विकास तर होणार आहेच पण राजापूर तालुक्यात एक अद्ययावत सुविधांनी युक्त असे रूग्णालय उभारले जाणार आहे, अशी माहिती राजापूरचे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी व्यक्त केली आहे.

राजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. खलिफे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली. नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा विरोध होता, कारण याठिकाणी होणारे विस्थापन, धार्मिक स्थळांना निर्माण होणारी बाधा यामुळे हा विरोध होता व तो सार्थ होता. मात्र आता नव्याने बारसू, गोवळ, सोलगाव व या परिसरातील मोकळ्या जागेत हा प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा सुरू आहे. कंपनीकडूनही तशी पाहणी करून जागेबाबत संमती दर्शविली जात आहे. याठिकाणी होणाऱ्या एमआयडीसी प्रकल्पाबरोबरच हा प्रकल्प आला तर निश्चितच याठिकाणी विकासाला गती मिळणार आहे. त्यातही राजापूर शहरापासून जवळ असल्याने त्याचा शहरालाही फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बेरोजगारी काय समस्या आहे, याची आपल्याला चांगली जाणीव आहे. मी स्वत: इलेक्ट्रीकल इंजिनिअर आहे, बीएससी करून मग एलएलबी केले आहे. नोकरीसाठी तरूणांना काय वणवण करावी लागते, याची मला जाणीव आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून अन्य अनेक पूरक उद्योग राजापुरात येणार आहेत. महिला बचत गटांना, छोटया व्यावसायिकांना काम मिळणार आहे, अशी माहिती खलिफे यांनी दिली.

------------------------

शिवसेनेलाही प्रकल्पाचे महत्त्व पटले

आता या परिसरात प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर समर्थन वाढत आहे. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, बेरोजगार तरूण या प्रकल्पाचे समर्थन करत आहेत तर शिवसेनेकडूनही याठिकाणी आता या प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली जात आहे. उशिरा का होईना, शिवसेनेला या प्रकल्पाचे महत्त्व पटले त्याचे स्वागतच आहे, असेही ॲड. खलिफे यांनी सांगितले.