शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

रेडक्रॉसमुळे दोन हजार व्यक्तींना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:14 IST

रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जनसेवेप्रति बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या हजारो रूग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान दिले आहे. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांना नवजीवन मिळाले आहे.

ठळक मुद्देजागतिक रेड क्रॉस दिन : शून्यातून उभी राहिलेली एक अद्वितीय संस्थाहजारो रुग्णांना रक्तपुरवठा, शववाहिकाही उपलब्ध

शोभना कांबळे 

रत्नागिरी : रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जनसेवेप्रति बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या हजारो रूग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान दिले आहे. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांना नवजीवन मिळाले आहे.युद्धात जखमी होणारे सैनिक, आपद्ग्रस्त यांना मदत करण्याच्या गरजेतून रेडक्रॉस संस्थेची स्थापना करण्यात आली. रत्नागिरीत डॉ. श्रीधर सामंत यांच्या हॉस्पिटलच्या एका छोट्याशा जागेत १९८१ साली रेड क्रॉस सोसायटीचे कामकाज सुरू झाले.

सुरूवातीला आश्रमशाळा, तसेच इतर शाळांतील गरजू मुलांना टुथपेस्ट, पावडर, बिस्कीटे यांचे वाटप करण्यास सोसायटीने प्रारंभ केला. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी जिल्ह्यात एकमेव शासकीय रूग्णवाहिका तसेच शववाहिका होती. त्यामुळे सामान्य रूग्णांची गरज लक्षात घेऊन सोसायटीने वाहन विकत घेऊन जिल्ह्यात रूग्णवाहिका तसेच शववाहिका उपलब्ध करून दिली. सोसायटीने ना नफा ना तोटा या तत्वाने ही सेवा १२ वर्षे रूग्णांसाठी अत्यल्प उपलब्ध करून दिली होती.अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. आजारांचेही स्वरूप बदलले. अशावेळी अपघातात जखमी होऊन किंवा विविध जीवघेण्या आजाराने बेजार झालेल्या, भाजलेल्या रूग्णांसाठी वेळेवर रक्त मिळणे गरजेचे असते. त्याकाळी रत्नागिरीत रक्तपेढी नसल्याने रूग्णाला अत्यवस्थ स्थितीत पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर येथे हलवावे लागे किंवा तातडीने रक्त मागवावे लागे.

यासाठी येणाऱ्या तांत्रिक, आर्थिक अडचणीमुळे बरेचदा रूग्ण दगावण्याच्या घटना घडत असत. ही गैरसोय लक्षात घेऊन रेडक्रॉस सोसायटीने २४ फेब्रुवारी १९८३मध्ये रेडक्रॉस ब्लड बँकेची सुरूवात केली. या ब्लड बँकेमुळे आतापर्यंत हजारो रूग्णांना जीवनदान मिळवून त्यांच्या कुटुंबात आनंदाची पहाट निर्माण केली आहे.सामाजिक कार्यात आतापर्यंत कार्य करत आलेल्या रेडक्रॉस सोसायटीच्या या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या संस्थेच्या कार्याचा गौरव करून राष्ट्रीय पातळीवर तीन वेळा मेरिट सर्टिफिकेट आणि राजा महाराजा ट्रॉफीने या सोसायटीचा गौरव करण्यात आला आहे. 

समाजामध्ये रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झाले आहे. त्यामुळे स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढली आहे. सामाजिक बांधिलकीतून रक्तदानासारखी शिबीरे आयोजित करण्याकडे विविध संस्थांचा, संघटनांचा कल वाढला आहे. या रक्तदात्यांचा इंडियन रेडक्रॉस सोसायटीला मोठा हातभार मिळत आहे. कुठल्याही क्षणी बोलावताच हे दाते रक्तपेढीत येवून रक्तदानासाठी सहकार्य करतात. रक्तपेढीच्या कार्यात या रक्तदात्यांचे योगदान महत्वाचे आहे.- डॉ. श्रीधर सामंत, मानद सचिव,इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रत्नागिरी.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीRatnagiriरत्नागिरी