शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
2
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
3
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
4
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
5
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
6
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
7
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
8
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
9
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
10
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
11
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
12
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
13
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
14
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
16
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
17
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
18
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
19
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
20
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्ता अधिकाऱ्यांची की शिवसेनेची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 12:56 IST

आमदार उदय सामंत यांनी डाटाएन्ट्री आॅपरेटर्सना न्याय देण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेमध्ये चाललेला गोंधळ पुढे आला. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता नेमकी कुणाची आहे शिवसेनेची की अधिकाऱ्यांची?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे

रत्नागिरी - आमदार उदय सामंत यांनी डाटाएन्ट्री आॅपरेटर्सना न्याय देण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेमध्ये चाललेला गोंधळ पुढे आला. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता नेमकी कुणाची आहे शिवसेनेची की अधिकाऱ्यांची?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेत जाऊन डाटाएंट्री आॅपरेटर्सना न्याय दिला. तसेच सरपंचांना अपात्रतेची धमकी देणा-या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. अखेर संबंधित अधिकाऱ्यांना माफीनामा द्यावा लागला. तरीही जिल्हा परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता असतानाही तिथपर्यंत आमदारांना जाण्याची वेळ का यावी, अशी सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

डाटाएंट्री आॅपरेटर्सच्या मानधनाचा विषय स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत गाजला होता. त्यावेळी संबंधित कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावूनही तशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला होता. तरीही कंपनीचे अधिकारी ऐकत नाहीत. उलट कंपनीच्या बाजूने जिल्हा परिषदेचे अधिकारीच सरपंचांना अपात्रतेची तसेच ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची लेखी धमकी देण्याचे सत्र सुरू झाले. त्यामुळे स्थायी समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी अधिकारी वरचढपणाची तसेच मनमानीपणाची भूमिका घेत असतानाही अशा अधिकाऱ्यांबाबत सत्ताधारी काहीही करू शकत नाहीत. शिवाय ठरावाची अंमबजावणी चार-चार महिने होत नसेल तर सत्ताधारी गप्प का, अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लेखा परीक्षण अहवालातील मुद्दा असल्याने रत्नागिरी पंचायत समितीचे कार्यालय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीतून हलविण्यास सांगितले. आज अडगळीच्या ठिकाणी हे कार्यालय आहे. प्रत्यक्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असतानाही पंचायत समितीच्या कार्यालयाची अवस्था अशी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची, सत्ताधारी शिवसेनेची की, अधिका-यांची अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

अधिकारीच वरचढ

आमदार उदय सामंत यांनी डाटाएंट्री आॅपरेटर्सना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषदेवर धडक देताच प्रशासनासह संबंधित कंपनीचे अधिकारीही नरमले. मात्र, स्थायी समितीत निर्णय घेऊन चार महिने झाले तरी उलट लोकप्रतिनिधींवरच कारवाई करण्याची धमकी देण्याचा प्रकार म्हणजेच सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिकारीच वरचढ झाल्याचे हे एक ताजे उदाहरण आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना