शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी  जिल्हा परिषद :  प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्धर आजारांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:37 IST

मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आता गावातच या आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी  जिल्हा परिषद :  प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्धर आजारांवर उपचार ग्रामीण जनतेला दिलासा, वेळ आणि पैसा वाचणार

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आता गावातच या आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे.बदलती जीवनशैली आणि वाढते प्रदूषण यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. खाण्यावर योग्य नियंत्रण नसणे आणि खाण्याचे योग्य नियोजन नसणे, यामुळे अनेक आजार उद्भवू लागले आहेत. मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन), लकवा (स्ट्रोक) यांसारख्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

या आजारांमुळे अनेकवेळा रूग्णाचा मृत्यूही ओढवतो. त्यामुळे या आजारांचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. वेळीच त्यांचे निदान झाल्यास त्यावर उपचार करून आजार नियंत्रणात आणता येऊ शकतात.या आजाराची लक्षणे दिसल्यानंतर त्याचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे, हे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नसते. त्यामुळे अनेकवेळा निदान होऊनही कमी प्रमाणात उपचार केले जातात. मात्र, आता सर्वसामान्यांना त्यांच्या खिशाला परवडेल आणि जवळच्या ठिकाणी त्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.रत्नागिरीजिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर या आजारांचे निदान करता येणार आहे. तसेच त्या आजारांवरील औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, आजाराचे प्रमाण अधिक आढळून आल्यास रूग्णाला जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथमच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये ३० वर्षांवरील कोणतीही व्यक्ती फायदा घेऊ शकते. या सुविधेसाठी अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून, लवकरच या आजारांचे निदान प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात येणार आहे.- डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.

उच्च रक्तदाबआहारात जास्त मीठ, अतिरिक्त शरीराचे वजन, धूम्रपान आणि दारू यामुळे उच्च रक्तदाब संभवतो. यामुळे क्रोनिक किडनी रोग, मूत्रपिंड, धमन्यांची संकुचिता होऊ शकते. सर्वसामान्य रक्तदाबाचे प्रमाण १०० ते १३० मिलिमीटर इतके असणे गरजेचे आहे.कर्करोगलठ्ठपणा, खराब आहार, दारूचे अति व्यसन, पर्यावरणी प्रदूषण यामुळे कॅन्सरचा आजार उद्भवतो. दीर्घकाळ खोकला लागणे, अनपेक्षितपणे वजन कमी होत जाणे. ही या आजाराची लक्षणे आहेत. त्याचबरोबर आतड्यांवरील हालचालींमध्ये बदल होतात.मधुमेहमधुमेह हा चयापचयाचा एक आजार आहे. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास हा आजार उद्भवतो. वारंवार लघवी होणे, तहान लागणे आणि वाढलेली उपासमार ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. हा आजार दीर्घकालीन राहिल्यास हृदयविकाराचा आजार, लकवा, क्रोनिक कीडनी रोग, पाय अल्सर आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो.लकवा (स्ट्रोक)हा आजार मेंदूशी निगडीत आहे. अति रक्तस्त्राव आणि रक्तस्त्राव न होणे यामुळे मेंदूचे काम करणे बंद होते. त्यामुळे माणसाला लकवा येऊ शकतो. तंबाखू सेवन, धूम्रपान, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण यामुळे लकवा येण्याची शक्यता असते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्यRatnagiriरत्नागिरी