शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

रत्नागिरी  जिल्हा परिषद :  प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्धर आजारांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:37 IST

मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आता गावातच या आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी  जिल्हा परिषद :  प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्धर आजारांवर उपचार ग्रामीण जनतेला दिलासा, वेळ आणि पैसा वाचणार

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आता गावातच या आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे.बदलती जीवनशैली आणि वाढते प्रदूषण यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. खाण्यावर योग्य नियंत्रण नसणे आणि खाण्याचे योग्य नियोजन नसणे, यामुळे अनेक आजार उद्भवू लागले आहेत. मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन), लकवा (स्ट्रोक) यांसारख्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

या आजारांमुळे अनेकवेळा रूग्णाचा मृत्यूही ओढवतो. त्यामुळे या आजारांचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. वेळीच त्यांचे निदान झाल्यास त्यावर उपचार करून आजार नियंत्रणात आणता येऊ शकतात.या आजाराची लक्षणे दिसल्यानंतर त्याचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे, हे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नसते. त्यामुळे अनेकवेळा निदान होऊनही कमी प्रमाणात उपचार केले जातात. मात्र, आता सर्वसामान्यांना त्यांच्या खिशाला परवडेल आणि जवळच्या ठिकाणी त्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.रत्नागिरीजिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर या आजारांचे निदान करता येणार आहे. तसेच त्या आजारांवरील औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, आजाराचे प्रमाण अधिक आढळून आल्यास रूग्णाला जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथमच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये ३० वर्षांवरील कोणतीही व्यक्ती फायदा घेऊ शकते. या सुविधेसाठी अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून, लवकरच या आजारांचे निदान प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात येणार आहे.- डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.

उच्च रक्तदाबआहारात जास्त मीठ, अतिरिक्त शरीराचे वजन, धूम्रपान आणि दारू यामुळे उच्च रक्तदाब संभवतो. यामुळे क्रोनिक किडनी रोग, मूत्रपिंड, धमन्यांची संकुचिता होऊ शकते. सर्वसामान्य रक्तदाबाचे प्रमाण १०० ते १३० मिलिमीटर इतके असणे गरजेचे आहे.कर्करोगलठ्ठपणा, खराब आहार, दारूचे अति व्यसन, पर्यावरणी प्रदूषण यामुळे कॅन्सरचा आजार उद्भवतो. दीर्घकाळ खोकला लागणे, अनपेक्षितपणे वजन कमी होत जाणे. ही या आजाराची लक्षणे आहेत. त्याचबरोबर आतड्यांवरील हालचालींमध्ये बदल होतात.मधुमेहमधुमेह हा चयापचयाचा एक आजार आहे. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास हा आजार उद्भवतो. वारंवार लघवी होणे, तहान लागणे आणि वाढलेली उपासमार ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. हा आजार दीर्घकालीन राहिल्यास हृदयविकाराचा आजार, लकवा, क्रोनिक कीडनी रोग, पाय अल्सर आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो.लकवा (स्ट्रोक)हा आजार मेंदूशी निगडीत आहे. अति रक्तस्त्राव आणि रक्तस्त्राव न होणे यामुळे मेंदूचे काम करणे बंद होते. त्यामुळे माणसाला लकवा येऊ शकतो. तंबाखू सेवन, धूम्रपान, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण यामुळे लकवा येण्याची शक्यता असते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्यRatnagiriरत्नागिरी