शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

रत्नागिरी जिल्हा परिषद : घरपट्टी थकबाकी ३ कोटीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:14 IST

ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ३९ कोटी घरपट्टीची वसुलीकारखानदारीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ

रत्नागिरी : ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे.रत्नागिरीजिल्हा परिषदेला घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, घरपट्टी आकारणी या ग्रामपंचायतींकडून करण्यात येते. जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये उद्योग, व्यापार, कारखानदारी असलेल्या कमीच ग्रामपंचायती आहेत.

त्यामध्ये रत्नागिरीतील शिरगाव, फणसोप, जयगड, कुवारबाव, मिरजोळे या ग्रामपंचायती आणि इतर तालुक्यांमध्येही कारखानदारी असलेल्या काही ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न लाखो रुपयांचे आहे. त्याचबरोबर बाजारपेठ असलेल्या संगमेश्वर, अंजनवेल, लोटे, पाचल अशा ग्रामपंचायतींचे उत्पन्नही जास्त आहे.दरम्यान, डोंगरदऱ्यात व अगदी ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींमध्ये सोयीसुविधा पुरवताना या ग्रामपंचायतींना शासनाकडून येणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहावे लागते.

सन २०१६-१७च्या ४ कोटी ८२ लाख २६ हजार २४८ रुपये थकीत असलेल्या घरपट्टीपैकी ४ कोटी ४ लाख ३७ हजार ५५७ रुपये वसुली, सन २०१७-१८ च्या ३९ कोटी ९० लाख ३ हजार ५४८ रुपयांपैकी ३६ कोटी ३ लाख ९३ हजार २०८ रुपये घरपट्टीची वसुली करण्यात आली़.

जिल्हा परिषदेला घरपट्टी आकारणीचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले असते. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेला ४३ कोटी ४५ लाख ६४ हजार ७७९ रुपये एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये वसुली करण्यात आली.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाची उर्वरित घरपट्टीची थकीत रक्कमही यामध्ये घरमालकांकडून वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षाची घरपट्टीची ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये एवढी थकबाकी वसूल करायची आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी