शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

रत्नागिरी जिल्हा परिषद : घरपट्टी थकबाकी ३ कोटीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:14 IST

ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ३९ कोटी घरपट्टीची वसुलीकारखानदारीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ

रत्नागिरी : ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे.रत्नागिरीजिल्हा परिषदेला घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, घरपट्टी आकारणी या ग्रामपंचायतींकडून करण्यात येते. जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये उद्योग, व्यापार, कारखानदारी असलेल्या कमीच ग्रामपंचायती आहेत.

त्यामध्ये रत्नागिरीतील शिरगाव, फणसोप, जयगड, कुवारबाव, मिरजोळे या ग्रामपंचायती आणि इतर तालुक्यांमध्येही कारखानदारी असलेल्या काही ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न लाखो रुपयांचे आहे. त्याचबरोबर बाजारपेठ असलेल्या संगमेश्वर, अंजनवेल, लोटे, पाचल अशा ग्रामपंचायतींचे उत्पन्नही जास्त आहे.दरम्यान, डोंगरदऱ्यात व अगदी ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींमध्ये सोयीसुविधा पुरवताना या ग्रामपंचायतींना शासनाकडून येणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहावे लागते.

सन २०१६-१७च्या ४ कोटी ८२ लाख २६ हजार २४८ रुपये थकीत असलेल्या घरपट्टीपैकी ४ कोटी ४ लाख ३७ हजार ५५७ रुपये वसुली, सन २०१७-१८ च्या ३९ कोटी ९० लाख ३ हजार ५४८ रुपयांपैकी ३६ कोटी ३ लाख ९३ हजार २०८ रुपये घरपट्टीची वसुली करण्यात आली़.

जिल्हा परिषदेला घरपट्टी आकारणीचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले असते. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेला ४३ कोटी ४५ लाख ६४ हजार ७७९ रुपये एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये वसुली करण्यात आली.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाची उर्वरित घरपट्टीची थकीत रक्कमही यामध्ये घरमालकांकडून वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षाची घरपट्टीची ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये एवढी थकबाकी वसूल करायची आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी