शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

रत्नागिरी यावर्षी हापूसचा हंगाम उशिराने, बागायतदारांचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 17:06 IST

गतवर्षी जिल्ह्यात ६० ते ७० टक्के हापूस पीक आले होते. मात्र हवामानातील बदलामुळे यावर्षी हापूसचे पीक हे गतवर्षीच्या तुलनेत कमी येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केला आहे. सध्या हापूस कलमांना अत्यल्प प्रमाणात मोहर आला आहे. हा मोहर टिकण्याची शक्यता कमी आहे. सद्यस्थिती पाहता या हंगामातील हापूस पीक हे फेब्रुवारी, मार्च महिन्यातच मिळेल, असा अंदाज बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देबागायतदारांमधून कमी हापूसचा अंदाज हंगामातील हापूस पीक फेब्रुवारी, मार्च महिन्यात मिळण्याची शक्यता नोव्हेंबर महिन्यात हापूसच्या झाडांवर ५ ते १० टक्के मोहर

प्रकाश वराडकररत्नागिरी : गतवर्षी जिल्ह्यात ६० ते ७० टक्के हापूस पीक आले होते. मात्र हवामानातील बदलामुळे यावर्षी हापूसचे पीक हे गतवर्षीच्या तुलनेत कमी येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केला आहे. सध्या हापूस कलमांना अत्यल्प प्रमाणात मोहर आला आहे. हा मोहर टिकण्याची शक्यता कमी आहे. सद्यस्थिती पाहता या हंगामातील हापूस पीक हे फेब्रुवारी, मार्च महिन्यातच मिळेल, असा अंदाज बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.

ज्यावर्षी हापूसचे पीक अधिक येते, त्याच्या दुसऱ्या वर्षी पीक कमी होते. ज्या हापूस कलमांपासून पीक अधिक येते त्या कलमांना पुढील वर्षी पीक कमी येते. काहीवेळा पीकच येत नाही, हा आजवरचा अनुभव पाहता यंदा गेल्या वर्षीपेक्षा उशिराने व कमी हापूस पीक येण्याची दाट शक्यता अनेक बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

गेल्यावर्षीच्या हापूस हंगामात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात हापूसचे पीक बाजारात आले होते. त्यामुळे हापूसचे बाजारभाव काही काळ कोसळले होते. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हापूसच्या झाडांवर केवळ ५ ते १० टक्के मोहर आला आहे. हा

तसेच काही प्रमाणात मोहर टिकलाच तर सुरुवातीला अत्यल्प हापूस हाती येईल. काही ठिकाणी हापूस कलमांना पालवी आली आहे. ही पालवी पानात रुपांतरीत होईपर्यंत महिना ते दोन महिन्यांचा कालावधी जाईल. त्यानंतर या हापूस कलमांना मोहर आला तर त्यापासून मिळणारे हापूस पीक हे मार्च, एप्रिल, मे महिन्यातच हाती येईल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfruitsफळे