शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

रत्नागिरी : जग जाते आहे विनाशकारी विज्ञानाच्या विळख्यात : निरंजन वर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:58 IST

पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन (पंडा) यांच्या विद्यमाने हमारी सोच गोमातासे निरोगी भारत विषयानुशंगाने महाराष्ट्र राज्य पंचम पंचगव्य संमेलन स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर, पावस (रत्नागिरी) यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पंचगव्य विद्यापीठ, कांजीपूरमचे कुलपती गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा बोलत होते.

ठळक मुद्दे- पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन यांच्या विद्यमाने पावस येथे आयोजन - महाराष्ट्रामधून १५० गव्यसिद्ध, गोमाताप्रेमी सहभागी देशात गव्यसिद्धांच्या १०० गोशाळा

पावस : विज्ञानाच्या अनिर्बंध वापरामुळे सृष्टीचे संतुलन बिघडले आहे. जग या विनाशकारी विज्ञानाच्या विळख्यात सापडले आहे. अमेरिकेचे आकाश प्रदूषित झाल्याने तेथील एक चतुर्थांश जनसंख्या कारागृहात असते. नासाने भविष्यातील संकट ओळखून एका अस्थापनाला गोमयाधारीत हायड्रोजनसारख्या वायूंवर चालणाऱ्या संशोधनाचे कंत्राट दिले आहे. गोमय, मूत्र, दूध यामध्ये अत्यंत उपयोगी घटक आहेत. जगाला या विनाशातून केवळ गोमाताच वाचवू शकते, असे उद्गार पंचगव्य विद्यापीठ, कांजीपूरमचे कुलपती गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा यांनी येथे काढले.पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन (पंडा) यांच्या विद्यमाने हमारी सोच गोमातासे निरोगी भारत विषयानुशंगाने महाराष्ट्र राज्य पंचम पंचगव्य संमेलन स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर, पावस (रत्नागिरी) यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.

या संमेलनासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १५० गव्यसिद्ध तसेच काही स्थानिक गोमाताप्रेमी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने तसेच राजीव दीक्षित यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक येथील आमोद केळकर यांनी केले.गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा पुढे म्हणाले की, आज देशात गव्यसिद्धांच्या सुमारे १०० गोशाळा आहेत. प्रत्येक गोशाळेची गोसंवर्धनाची मर्यादा आहे. त्या अतिरिक्त असणारी वासरे, गाई आपण गरजू गव्यसिद्धांना दान देऊन त्यांना उभे केले पाहिजे. गुरुकुलम इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय भाषेत शिक्षण देते. शासनाच्या काही अटीमुळे मात्र आपणाला गुरुकुलममध्ये प्रवेश १०+२ असा ठेवावा लागला आहे.यावेळी राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माने म्हणाले की, गाय-बैल जरी वृद्ध झाले तरी टाकाऊ नाहीत. ते शेवटपर्यंत आपल्याला सेवा देतात, असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी विजय जोशी म्हणाले की, समाजात गोमातेविषयी जागृती होत आहे. परंतु त्याला दिशा देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ते सिंधुदुर्गात शिबिराचे आयोजन करत असल्याचे सांगितले.गोमाता वाचली पाहिजेभारताची ताकद गाय आहे, ती नष्ट करण्याचे षडयंत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवले गेले. यासाठी गोमासाला वाढीव मागणी मूल्य देणे संकरीकरणातून भारतीय गोवंश नष्ट केले. यासाठी गायींचे रक्षण आपणच केले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात असणाऱ्या कायद्यांच्या कार्यवाहीसाठी आपण शासनाला भाग पाडले पाहिजे, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्य