शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले, पार्क की गवताचे कुरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:27 PM

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून बांधण्यात येणाऱ्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले असून, या कामाची पार दुरवस्था झाली आहे. या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या या ठिकाणी उद्यान होणार आहे की गवताचे कुरण, असा सवाल केला जात आहे.

ठळक मुद्दे- कामाकडे दुर्लक्ष झाल्याने आश्वासन कागदोपत्रीचज्येष्ठ नागरिकांसाठी नाना - नानी पार्क- निधी मिळाल्यानंतर दोन वर्ष झाली तरी काम थांबलेलेच- नाविन्यपूर्ण योजनेखाली ४८ लाख रूपयांचा निधी मंजूर जिल्हा नियोजन समितीकडून निधी नगर परिषदेकडे वर्गज्येष्ठ नागरिक संघासाठी सभागृहाचेही नियोजन.

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून बांधण्यात येणाऱ्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले असून, या कामाची पार दुरवस्था झाली आहे. या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या या ठिकाणी उद्यान होणार आहे की गवताचे कुरण, असा सवाल केला जात आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना - नानी पार्क व ज्येष्ठ नागरिक संघाला सभागृह यासाठी नाविन्यपूर्ण योजनेखाली २०१३ - १४मध्ये ४८ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे.

नागरिक संघाच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा ११ फेब्रुवारी २०१६ रोजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते तसेच माजी राज्यमंत्री, आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यानंतर हे सभागृह ज्येष्ठ नागरिक संघाकडे हस्तांतरीत करण्यात आले.

सभागृहाचे हस्तांतरण झाल्यास पावणेदोन वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, या सभागृहाच्या शेजारी प्रस्तावित असलेल्या नाना - नानी पार्कचे काम त्यानंतर आत्तापर्यंत थांबवण्यात आलेले आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय या जागेत सुरळीत सुरू आहे. मात्र, नाना - नानी पार्कच्या कामाचा विसर नगर परिषदेला पडलेला दिसत आहे.या नाना - नानी पार्कची दुरवस्था झाली असून, या भागात गवताचे साम्राज्य माजले आहे. या दोन्ही कामांसाठी नगर परिषदेकडे आधीच निधी देण्यात आलेला असतानाही दोन वर्ष होत आली तरीही हे काम का थांबविण्यात आले, असा सवाल करण्यात येत आहे.

याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सुभाष थरवळ यांनी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीसोबत या कामाची सद्यस्थिती दर्शवणारा अहवाल छायाचित्रासह सादर केला आहे. त्यामुळे नाना-नानी पार्कचे काम मार्गी लागेल, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.काम मार्गी लागणार?नाना-नानी पार्कसाठी ४८ लाख रूपयांचा निधी नगर परिषदेकडे आधीच वर्ग करण्यात आला आहे. मात्र, तरीही या कामाची दुरवस्था झाली आहे. हे काम पूर्णत: थांबलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हे काम का थांबलेले आहे, याची चौकशी करावी, त्याचा अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

हे काम विनाविलंब पूर्ण करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक यांनी रत्नागिरी नगर परिषदेला पाठविले आहे. त्यामुळे आता हे काम मार्गी लागण्याची आशा ज्येष्ठ नागरिकांना आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार