शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

रत्नागिरी महाराष्ट्रातील सुंदर शहर बनेल, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 16:49 IST

येत्या दोन ते तीन वर्षात पर्यटन असो वा अन्य विकासात्मक कामांमुळे रत्नागिरी शहराची महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून ओळख प्राप्त होईल व लाखो पर्यटक जिल्ह्यात येतील.

रत्नागिरी : जलतरण तलाव व जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील प्रशासकीय इमारत वगळता अन्य सर्व कामांना मंजुरी प्राप्त झाली असून, काही कामांसाठी निधी प्राप्त होऊन कामांना प्रारंभही झाला आहे. येत्या दोन ते तीन वर्षात पर्यटन असो वा अन्य विकासात्मक कामांमुळे रत्नागिरी शहराची महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून ओळख प्राप्त होईल व लाखो पर्यटक जिल्ह्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी शहर व तालुक्यातील शैक्षणिक, क्रीडा, पर्यटन, शहर विकासाबाबत कामे सुरू झाली आहेत. या कामांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी स्वा. सावरकर नाट्यगृह येथे रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. श्रीरंग कद्रेकर, उद्योजक प्रसन्न आंबुलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामे व सुरू झालेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले.

कोरोना काळात जिल्ह्यातील विकास कामांसाठी ८५० कोटी रुपये आणणे शक्य झाले असून, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सहकार्य लाभल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या व्यतिरिक्तही जिल्ह्यातील अन्य तालुक्यात काही प्रकल्प मंजूर आहेत. लवकरच अशाच प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात सुरू असणाऱ्या व नियोजित कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत