शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

रत्नागिरी महाराष्ट्रातील सुंदर शहर बनेल, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 16:49 IST

येत्या दोन ते तीन वर्षात पर्यटन असो वा अन्य विकासात्मक कामांमुळे रत्नागिरी शहराची महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून ओळख प्राप्त होईल व लाखो पर्यटक जिल्ह्यात येतील.

रत्नागिरी : जलतरण तलाव व जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील प्रशासकीय इमारत वगळता अन्य सर्व कामांना मंजुरी प्राप्त झाली असून, काही कामांसाठी निधी प्राप्त होऊन कामांना प्रारंभही झाला आहे. येत्या दोन ते तीन वर्षात पर्यटन असो वा अन्य विकासात्मक कामांमुळे रत्नागिरी शहराची महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून ओळख प्राप्त होईल व लाखो पर्यटक जिल्ह्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी शहर व तालुक्यातील शैक्षणिक, क्रीडा, पर्यटन, शहर विकासाबाबत कामे सुरू झाली आहेत. या कामांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी स्वा. सावरकर नाट्यगृह येथे रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. श्रीरंग कद्रेकर, उद्योजक प्रसन्न आंबुलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामे व सुरू झालेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले.

कोरोना काळात जिल्ह्यातील विकास कामांसाठी ८५० कोटी रुपये आणणे शक्य झाले असून, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सहकार्य लाभल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या व्यतिरिक्तही जिल्ह्यातील अन्य तालुक्यात काही प्रकल्प मंजूर आहेत. लवकरच अशाच प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात सुरू असणाऱ्या व नियोजित कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत