शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

रत्नागिरी महाराष्ट्रातील सुंदर शहर बनेल, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 16:49 IST

येत्या दोन ते तीन वर्षात पर्यटन असो वा अन्य विकासात्मक कामांमुळे रत्नागिरी शहराची महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून ओळख प्राप्त होईल व लाखो पर्यटक जिल्ह्यात येतील.

रत्नागिरी : जलतरण तलाव व जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील प्रशासकीय इमारत वगळता अन्य सर्व कामांना मंजुरी प्राप्त झाली असून, काही कामांसाठी निधी प्राप्त होऊन कामांना प्रारंभही झाला आहे. येत्या दोन ते तीन वर्षात पर्यटन असो वा अन्य विकासात्मक कामांमुळे रत्नागिरी शहराची महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून ओळख प्राप्त होईल व लाखो पर्यटक जिल्ह्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी शहर व तालुक्यातील शैक्षणिक, क्रीडा, पर्यटन, शहर विकासाबाबत कामे सुरू झाली आहेत. या कामांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी स्वा. सावरकर नाट्यगृह येथे रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. श्रीरंग कद्रेकर, उद्योजक प्रसन्न आंबुलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामे व सुरू झालेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले.

कोरोना काळात जिल्ह्यातील विकास कामांसाठी ८५० कोटी रुपये आणणे शक्य झाले असून, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सहकार्य लाभल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या व्यतिरिक्तही जिल्ह्यातील अन्य तालुक्यात काही प्रकल्प मंजूर आहेत. लवकरच अशाच प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात सुरू असणाऱ्या व नियोजित कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत