शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

रत्नागिरीला जागतिक दर्जाचे निर्यात केंद्र बनवून नवी ओळख देणार : डॉ. बी. एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने इतर देशात निर्यात व्हावीत या दृष्टिकोनातून एक जागतिक दर्जाचे निर्यात केंद्र विकसित करण्याचा आराखडा ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने इतर देशात निर्यात व्हावीत या दृष्टिकोनातून एक जागतिक दर्जाचे निर्यात केंद्र विकसित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्याला नवीन ओळख मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या स्वरूपाचे निर्यात केंद्र रत्नागिरीत निर्माण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. बी. एम. पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात ‘आजादी का अमृत महोत्सव-७५’ स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत Exporters' Conclaves (निर्यातदारांचे संमेलन) व रत्नागिरी जिल्ह्यातील निर्यात होणारी उत्पादने व सेवा यांच्या प्रदर्शनाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, जिल्हा अग्रणी प्रबंधक एन. डी. पाटील, पणन विभागाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, उद्योजक अमर देसाई, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, आंबा, काजू, कोकम व त्यांची उत्पादने तसेच जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभल्याने समुद्री उत्पादने यांना जागतिक बाजारात निर्यातीसाठी मोठा वाव आहे. स्थानिक ठिकाणी उपलब्ध ही उत्पादने आणखी विकसित करून त्यांची इतर देशांमध्ये निर्यात आणखी वाढविणे शक्य आहे. त्यामुळे येथे रोजगार निर्मितीही होईल आणि निर्यात वाढल्याने येथील उद्योजकांबरोबर जिल्ह्यालाही त्याचा फायदा होईल. जिल्ह्यातील बचत गटांमार्फत तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांच्या निर्यातीसाठीदेखील मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या बचत गटांची उत्पादने एकत्र करून, निर्यातदार तयार करून त्यांच्यामार्फतही जिल्ह्यातील निर्यात वाढवून जिल्ह्याला त्याचा फायदा होऊ शकेल, असेही ते म्हणाले. स्थानिक नवउद्योजकांना उत्पादने निर्यातीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊन त्यांच्यातूनही नवीन निर्यातदार तयार होतील, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाव्यवस्थापक संतोष कोलते यांनी Ratnagiri District Export Action Plan चे सादरीकरण यावेळी केले. आंबा निर्यातीसंदर्भात मार्गदर्शन करताना पणन विभागाचे मिलिंद जोशी यांनी निर्यात करणे किती महत्त्वाचे आहे, ते का महत्त्वाचे आहे, त्याचे होणारे फायदे, कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.