शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

रत्नागिरी :  अभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:59 IST

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.

ठळक मुद्देअभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव‘लोकमत’तर्फे दहावी, बारावीतील गुणवंतांचा गौरव सोहळा

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.

गुणवत्तेची भरपाई गुणांनी होत नाही, त्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण अभिनंदनीय आहेत. लोकमत आयोजित कार्यक्रमात सर्व अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे मुलांबरोबर पालकांनाही विविध शाखांविषयीचे ज्ञान अवगत झाले.दहावी व बारावी हा सर्वांच्याच आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

हे मार्गदर्शन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मिळाले तर ते अधिक उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’तर्फे ‘यशाची गुरुकिल्ली’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सुभाष देव यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.सध्याच्या विद्यार्थ्यांना निवडीसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मात्र, विद्यार्थी, पालकांची मानसिकता महत्त्वाची आहे. इंजिनिअरिंग निवडतानासुध्दा ठराविक शाखांपेक्षा संलग्न शाखांचाही विचार करणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.निवडीबरोबर पर्यायांचाही वापर केला पाहिजे. बहुतांश पालक दहावी, बारावीनंतर सक्रीय होतात. मात्र, तसे न करता प्रवेश घेण्यापूर्वीच सक्रीय होणे महत्त्वाचे आहे. विविध संस्थांना भेटी देऊन तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थी काय शिकतो, याऐवजी कशासाठी व तो किती महत्त्वाचा आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे. दहावीतील गुण पुढच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर ते विसरले पाहिजेत, असाही सल्ला डॉ. देव यांनी विद्यार्थ्यांना दिला.उच्च शिक्षणातील विविध संधी, विविध क्षेत्रात स्पेशलायझेशन, योग्य महाविद्यालय व विद्यापीठ कसे निवडावे, प्रवेश प्रक्रिया याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटRatnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय