शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रत्नागिरी :  अभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:59 IST

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.

ठळक मुद्देअभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव‘लोकमत’तर्फे दहावी, बारावीतील गुणवंतांचा गौरव सोहळा

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.

गुणवत्तेची भरपाई गुणांनी होत नाही, त्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण अभिनंदनीय आहेत. लोकमत आयोजित कार्यक्रमात सर्व अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे मुलांबरोबर पालकांनाही विविध शाखांविषयीचे ज्ञान अवगत झाले.दहावी व बारावी हा सर्वांच्याच आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

हे मार्गदर्शन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मिळाले तर ते अधिक उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’तर्फे ‘यशाची गुरुकिल्ली’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सुभाष देव यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.सध्याच्या विद्यार्थ्यांना निवडीसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मात्र, विद्यार्थी, पालकांची मानसिकता महत्त्वाची आहे. इंजिनिअरिंग निवडतानासुध्दा ठराविक शाखांपेक्षा संलग्न शाखांचाही विचार करणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.निवडीबरोबर पर्यायांचाही वापर केला पाहिजे. बहुतांश पालक दहावी, बारावीनंतर सक्रीय होतात. मात्र, तसे न करता प्रवेश घेण्यापूर्वीच सक्रीय होणे महत्त्वाचे आहे. विविध संस्थांना भेटी देऊन तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थी काय शिकतो, याऐवजी कशासाठी व तो किती महत्त्वाचा आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे. दहावीतील गुण पुढच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर ते विसरले पाहिजेत, असाही सल्ला डॉ. देव यांनी विद्यार्थ्यांना दिला.उच्च शिक्षणातील विविध संधी, विविध क्षेत्रात स्पेशलायझेशन, योग्य महाविद्यालय व विद्यापीठ कसे निवडावे, प्रवेश प्रक्रिया याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटRatnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय