शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  अभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:59 IST

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.

ठळक मुद्देअभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव‘लोकमत’तर्फे दहावी, बारावीतील गुणवंतांचा गौरव सोहळा

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.

गुणवत्तेची भरपाई गुणांनी होत नाही, त्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण अभिनंदनीय आहेत. लोकमत आयोजित कार्यक्रमात सर्व अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे मुलांबरोबर पालकांनाही विविध शाखांविषयीचे ज्ञान अवगत झाले.दहावी व बारावी हा सर्वांच्याच आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

हे मार्गदर्शन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मिळाले तर ते अधिक उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’तर्फे ‘यशाची गुरुकिल्ली’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सुभाष देव यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.सध्याच्या विद्यार्थ्यांना निवडीसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मात्र, विद्यार्थी, पालकांची मानसिकता महत्त्वाची आहे. इंजिनिअरिंग निवडतानासुध्दा ठराविक शाखांपेक्षा संलग्न शाखांचाही विचार करणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.निवडीबरोबर पर्यायांचाही वापर केला पाहिजे. बहुतांश पालक दहावी, बारावीनंतर सक्रीय होतात. मात्र, तसे न करता प्रवेश घेण्यापूर्वीच सक्रीय होणे महत्त्वाचे आहे. विविध संस्थांना भेटी देऊन तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थी काय शिकतो, याऐवजी कशासाठी व तो किती महत्त्वाचा आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे. दहावीतील गुण पुढच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर ते विसरले पाहिजेत, असाही सल्ला डॉ. देव यांनी विद्यार्थ्यांना दिला.उच्च शिक्षणातील विविध संधी, विविध क्षेत्रात स्पेशलायझेशन, योग्य महाविद्यालय व विद्यापीठ कसे निवडावे, प्रवेश प्रक्रिया याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटRatnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय