शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

पावसातही रत्नागिरीतील पाणीटंचाई स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:42 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक धरणे भरून वाहात आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ व पानवल धरणही भरून वाहात आहे. गेला महिनाभर मुसळधार पाऊस झाल्याने सर्व जलाशये भरली तरी रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला काही पुरेसे पाणी येत नसल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देपावसातही रत्नागिरीतील पाणीटंचाई स्थिती गंभीरनगरसेवकांमध्ये असलेले हेवेदावे हेच पाणी पुरवठ्यातील अडसर

रत्नागिरी : जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक धरणे भरून वाहात आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ व पानवल धरणही भरून वाहात आहे. गेला महिनाभर मुसळधार पाऊस झाल्याने सर्व जलाशये भरली तरी रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला काही पुरेसे पाणी येत नसल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत.

आधीच जुनाट वितरण वाहिन्यांमुळे कमी दाबाने येणारे पाणी आणि त्यातच पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांची पाण्याच्या चाव्या उघडण्याबाबतची मनमानी व पाणी पुरवठ्यावरून काही प्रभागातील नगरसेवकांमध्ये असलेले हेवेदावे हेच रत्नागिरीच्या पाणी पुरवठ्यातील अडसर ठरत असल्याची चर्चा रत्नागिरीकरांमध्ये आहे.

रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेची मुख्य जलवाहिनी, अंतर्गत वितरण वाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्या गेल्या पाच वर्षांपूर्वीच बदलण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यासाठी नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांकडून ठोस प्रयत्न झाले नसल्याचा रत्नागिरीकरांचा आरोप आहे. शहरातील राजीवडा, शिवखोल, मिरकरवाडा तसेच अन्य भागांमध्येही नळपाणी योजनेला अल्पदाबाने अपुरे पाणी येते.

काही भागात काही दिवस पाणीच न येण्याचे प्रकार सुरू आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी नगर परिषदेकडून टॅँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र, त्यानेही शहरवासियांची पाण्याची गरज भागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरीतील पाणी टंचाईची स्थिती ही राजकीय अनास्थेमुळे असून २०१६ मध्ये मंजूर झालेली ६३ कोटींची सुधारित नळपाणी योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. या योजनेचे काम पूर्ण होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.

जुनाट वितरण वाहिन्यांमुळे टंचाईची स्थिती भर पावसाळ्यातही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या शहरातील अनेक भागात तीव्र टंचाई असून पाण्याविना नागरिक हतबल झाले आहेत. नवीन नळपाणी योजना कार्यान्वित होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार असल्याने रत्नागिरीकरांचे पाण्यावाचून हाल सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील राजीवडा भागातील टंचाई स्थिती गेल्या काही महिन्यांपासून गंभीर झाली आहे. नळपाणी योजनेच्या नळांना अल्प पाणी येते, तर कधी येतच नाही. त्यामुळे त्या ठिकाणी एका खासगी विहिरीचे पाणी साठवण टाकीत पंपाद्वारे लिफ्ट करून त्या परिसराला पुरविण्याची मागणी करण्यात आली होती. विहीर मालकाचीही त्याला सहमती होती. दोन महिन्यांपूर्वी त्यासाठी शिवखोल, राजीवडा येथे नगर परिषद अभियंत्यांनीही पाहणी केली. पंप देण्याचे आश्वासन मिळाले. आश्वासनाशिवाय राजीवडावासियांना काहीच मिळाले नाही.

शहराला दररोज शीळ व पानवल धरणातून सुमारे १५ ते १६ लाख लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, हे पाणी गळतीमुळे शहरातील नळ जोडण्यांपर्यंत पूर्ण दाबाने पोहोचतच नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती शहरात असून सुधारित नळपाणी योजना पूर्ण होणार कधी, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम पाणी सभापती सुहेल मुकादम हे प्रामाणिकपणे करीत आहेत. परंतु त्यांना पाणी विभागातील कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. पाणी पुरवठ्याच्या चाव्या उघडण्याच्या वेळांमध्ये सावळागोंधळ आहे. नगरसेवकांमध्येही पुरवठ्यावरून वादावादी आहे. त्यामुळे कर्मचारीही त्रस्त असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी