शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीची पाणी समस्या कायमच-- प्रश्न सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:29 IST

रत्नागिरी शहराला दररोज १६ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील साठा संपुष्टात आला असला तरी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही स्थिती यावर्षीचीच नाही तर दरवर्षी शहरासाठी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो.

ठळक मुद्देमहिलांची रोज नगर परिषदेवर धडक

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांपासून शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रत्नागिरीकर त्रस्त आहेत. २०१६ साली शासनाने मंजूर केलेल्या व खर्च ६३ कोटींवर पोहोचलेल्या सुधारित नळपाणी योजनेचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अजूनही दीड ते दोन वर्र्षे जाणार आहेत. पाणी समस्या जैसे थे आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागातील महिला पाण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेवर दररोज धडक देत आहेत. रत्नागिरीची पाणी समस्या नेमकी सुटणार तरी कधी, असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे.रत्नागिरी शहराला दररोज १६ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील साठा संपुष्टात आला असला तरी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही स्थिती यावर्षीचीच नाही तर दरवर्षी शहरासाठी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र, हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत आणणारी मुख्य जलवाहिनी जागोजागी गंजल्याने पाण्याची गळती मोठी आहे. अंतर्गत जलवाहिन्याही जुनाट झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून संपूर्ण रत्नागिरीकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. वारंवार तक्रारी होऊनही त्यात बदल झाला नव्हता.पाणी समस्येने त्रस्त झालेल्या रत्नागिरीकरांसाठी भाजपचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६मध्ये ५४ कोटी खर्चाची सुधारित नळपाणी योजना नगरोत्थान योजनेतून मंजूर केली. त्यामध्ये आणखी ९ कोटी वाढीव अंदाजपत्रक बनविण्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली आणि त्यामुळे बराच काळ हे काम रखडून राहिले होते. दीड वर्षापूर्वी या योजनेचे काम सुरू झाले. तरीही हे काम रडत खडत सुरू आहे. मुख्य जलवाहिनीचे काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर असले तरी काही काम अद्याप रखडलेले आहे.रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी योजनेच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यानुसार शहरातील काही भागांमध्ये अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. हे काम ३० टक्केपर्यंत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बरेच काम अद्याप अपूर्ण असल्याचे समोर येत आहे. ठेकेदाराकडून आवश्यक त्या वेगाने काम होत नसल्याने शहरवासियांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रत्नागिरीतील नागरिक पाणी समस्येला तोंड देत आहेत. कमी दाबाने पाणी पुरवठा ही मोठीच समस्या झाली असून, केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यातही रत्नागिरीकरांना टॅँकरद्वारे अधिकचा पाणीपुरवठा करण्याची वेळ नगर परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून आली आहे. अद्याप टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. नवीन योजनेचे काम पूर्ण कधी होईल, याची निश्चिती नसल्याने रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत.सत्ताधाऱ्यांचे आजवर दुर्लक्षचरत्नागिरी शहरातील पाणी समस्या ही गेल्या दहा वर्षांपूर्वीच सोडविण्याची गरज होती. मात्र, या कालावधीत नगर परिषदेत सत्तेत असलेल्यांनी शहराच्या पाणी प्रश्न सोडवणुकीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यातच मंजूर योजना राजकीय वादामध्ये अडकल्याने आणखी उशीर झाला आहे. आता नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी योजनेच्या कामाला गती देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwater shortageपाणीकपात