शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

रत्नागिरीची पाणी समस्या कायमच-- प्रश्न सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:29 IST

रत्नागिरी शहराला दररोज १६ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील साठा संपुष्टात आला असला तरी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही स्थिती यावर्षीचीच नाही तर दरवर्षी शहरासाठी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो.

ठळक मुद्देमहिलांची रोज नगर परिषदेवर धडक

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांपासून शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रत्नागिरीकर त्रस्त आहेत. २०१६ साली शासनाने मंजूर केलेल्या व खर्च ६३ कोटींवर पोहोचलेल्या सुधारित नळपाणी योजनेचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अजूनही दीड ते दोन वर्र्षे जाणार आहेत. पाणी समस्या जैसे थे आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागातील महिला पाण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेवर दररोज धडक देत आहेत. रत्नागिरीची पाणी समस्या नेमकी सुटणार तरी कधी, असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे.रत्नागिरी शहराला दररोज १६ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील साठा संपुष्टात आला असला तरी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही स्थिती यावर्षीचीच नाही तर दरवर्षी शहरासाठी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र, हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत आणणारी मुख्य जलवाहिनी जागोजागी गंजल्याने पाण्याची गळती मोठी आहे. अंतर्गत जलवाहिन्याही जुनाट झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून संपूर्ण रत्नागिरीकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. वारंवार तक्रारी होऊनही त्यात बदल झाला नव्हता.पाणी समस्येने त्रस्त झालेल्या रत्नागिरीकरांसाठी भाजपचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६मध्ये ५४ कोटी खर्चाची सुधारित नळपाणी योजना नगरोत्थान योजनेतून मंजूर केली. त्यामध्ये आणखी ९ कोटी वाढीव अंदाजपत्रक बनविण्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली आणि त्यामुळे बराच काळ हे काम रखडून राहिले होते. दीड वर्षापूर्वी या योजनेचे काम सुरू झाले. तरीही हे काम रडत खडत सुरू आहे. मुख्य जलवाहिनीचे काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर असले तरी काही काम अद्याप रखडलेले आहे.रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी योजनेच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यानुसार शहरातील काही भागांमध्ये अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. हे काम ३० टक्केपर्यंत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बरेच काम अद्याप अपूर्ण असल्याचे समोर येत आहे. ठेकेदाराकडून आवश्यक त्या वेगाने काम होत नसल्याने शहरवासियांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रत्नागिरीतील नागरिक पाणी समस्येला तोंड देत आहेत. कमी दाबाने पाणी पुरवठा ही मोठीच समस्या झाली असून, केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यातही रत्नागिरीकरांना टॅँकरद्वारे अधिकचा पाणीपुरवठा करण्याची वेळ नगर परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून आली आहे. अद्याप टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. नवीन योजनेचे काम पूर्ण कधी होईल, याची निश्चिती नसल्याने रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत.सत्ताधाऱ्यांचे आजवर दुर्लक्षचरत्नागिरी शहरातील पाणी समस्या ही गेल्या दहा वर्षांपूर्वीच सोडविण्याची गरज होती. मात्र, या कालावधीत नगर परिषदेत सत्तेत असलेल्यांनी शहराच्या पाणी प्रश्न सोडवणुकीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यातच मंजूर योजना राजकीय वादामध्ये अडकल्याने आणखी उशीर झाला आहे. आता नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी योजनेच्या कामाला गती देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwater shortageपाणीकपात