शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

रत्नागिरी : राजापुरातील वेत्ये समुद्रात मच्छिमारी बोटीला जलसमाधी, सातजणांना वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 3:57 PM

राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्रत मच्छिमारीसाठी निघालेल्या बोटीला सोमवारी सकाळी ७च्या दरम्यान जलसमाधी मिळाली. मात्र, बोटीवरील सातजणांनी मोठा आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजुला असलेल्या बोटीतील मच्छिमारांनी तात्काळ धाव घेऊन त्या सातही जणांना बुडत्या बोटीतून सुखरुप बाहेर काढले.

ठळक मुद्देराजापुरातील वेत्ये समुद्रात मच्छिमारी बोटीला जलसमाधीसातजणांना वाचविण्यात यश

राजापूर : तालुक्यातील वेत्ये समुद्रत मच्छिमारीसाठी निघालेल्या बोटीला सोमवारी सकाळी ७च्या दरम्यान जलसमाधी मिळाली. मात्र, बोटीवरील सातजणांनी मोठा आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजुला असलेल्या बोटीतील मच्छिमारांनी तात्काळ धाव घेऊन त्या सातही जणांना बुडत्या बोटीतून सुखरुप बाहेर काढले.समुद्रात बुडालेली बोट तुळसुंदे येथील असून, ती महालक्ष्मी या नावाची होती. तुळसुंदेमधील नितीन देवकर हे बोटीचे मालक आहेत. त्यांच्या समवेत जगदीश शिरगावकर, पुरुषोत्तम नाटेकर, कुंदन आडिवरेकर, भिकाजी आडिवरेकर, संजय पावस्कर व मारुती खडपे असे सातजण सोमवारी तुळसुंदे बंदरातून समुद्रात मच्छिमारीसाठी निघाले होते.

सकाळी सातच्या दरम्यान त्यांची बोट किनाऱ्यापासून साधारणपणे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आली असता अचानक जोरात वारा वाहू लागला. त्यानंतर काही क्षणातच बोटीच्या तळाची लाकडी फळी फुटून आता पाणी भरु लागले व बोट समुद्रात हेलखावे खावू लागली.अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे बोटीवरील मालकासह अन्य सहाजण गोंधळून गेले. त्यांनी जोरदार आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी बुडत असलेल्या बोटीपासून आजुबाजुलाच काही अंतरावर सात ते आठ बोटीदेखील समुद्रात मच्छिमारीसाठी चालल्या होत्या. त्यावर असलेल्या मच्छिमारांनी खलाशांचा गोंधळ पाहिला आणि ते त्याठिकाणी पोहचले. त्यांनी दोरीच्या सहाय्याने अडकलेल्या सातही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.मात्र, लाकडी फळी तुटल्याने त्या बोटीला जलसमाधी मिळाली. या घटनेमध्ये नितीन देवकर यांचे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस ठाण्याचे निरीक्षक कानसे व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार