शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

रत्नागिरी : कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मागणीसाठी संस्थाचालक घेणार मुख्यमंत्र्याची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 14:31 IST

रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातील महाडपासूनची काही महाविद्यालये एकत्र केली तर शंभर महाविद्यालयांना मिळून स्वतंत्र कोकण विद्यापिठाची मागणी करण्यात येत आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून संस्था चालक विद्यापिठ मागणी करणार आहेत.

ठळक मुद्देकोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मागणीसाठी संस्थाचालक घेणार मुख्यमंत्र्याची भेटशैक्षणिक संस्थाचे प्रश्नांकडे वेधणार लक्ष, आमदार उदय सामंत यांनी जाणून घेतले प्रश्न

रत्नागिरी : कोकणामध्ये येवू घातलेल्या विविध कंपन्या, शिवाय होणारे बदल, कंपन्यांना ज्या पध्दतीचे मनुष्यबळ हवे त्या पध्दतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापिठाची आवश्यकता आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ८० महाविद्यालये आहेत. नव्याने दहा महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातील महाडपासूनची काही महाविद्यालये एकत्र केली तर शंभर महाविद्यालयांना मिळून स्वतंत्र कोकण विद्यापिठाची मागणी करण्यात येत आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून संस्था चालक विद्यापिठ मागणी करणार आहेत.जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात सर्व संस्थाचालक, व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची एकत्रित बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोकण विद्यापिठाबाबत भेट घेण्याच निश्चित करण्यात आले. यावेळी शैक्षणिक संस्था चालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व विचारविनिमय करण्यात आले.चेन्नई येथील मेरिटाईम विद्यापिठातंर्गत कोकणातील बंदरे, बंदराशी निगडित अभ्यासक्रमांसाठी उपकेंद्र रत्नागिरीत सुरू करावे. या उपकेंद्रासाठी चाफे येथे ५० एकर जागा मंजूर करण्यात आली असून याबाबत पुढील कामकाज सुरू करण्यात यावे. कोकणाला विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. मासेमारी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने किनारपट्टीवर स्वतंत्र मत्स्य विद्यापिठ निर्माण करण्याचीही मागणी संस्था चालकांनी केली आहे.पवित्र पोर्टलव्दारे शिक्षक भरतीला विरोध, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीवरील बंदी तात्काळ उठविणे, शिष्यवृत्तीसाठी असलेले महाडिबीटी पोर्टल ओपन न होणे, छत्रपती शाहूू महाराज शिष्यवृत्ती, ओबीसीना मिळणारी फी सवलत वेळेवर न मिळणे, कार्यरत शिक्षकांवर काही ठिकाणी आरक्षण ठरविले जाणे, रोस्टरनुसार आरक्षण पुरेसे न मिळणे, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नियमित मुख्याध्यापक भरण्यातील प्रशासकीय अडचणी व शिक्षण खात्याकडून योग्य मार्गदर्शन न मिळणे तसेच केलेल्या नियुत्यांना मंजूरी न मिळणे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या बायोमेट्रिक्स हजेरीमुळे अध्यापनावर होणारा परिणाम, शिक्षक भरती बंदी काळात संस्थांनी अस्थापनेवर नेमलेल्या शिक्षकांच्या सेवेचा विचार शासन पातळीवर करणे, अतिरिक्त शिक्षकांची नावे व माहिती संस्था पदाधिकाऱ्यांच्या सही शिक्याच्या पत्रानेच स्विकारण्याचा आग्रह धरणे तसेच अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन व समावेशन परस्पर मुख्याध्यापकांना न कळविता ते संस्थेला कळविण्याबाबत आग्रह धरणे. शिक्षण संस्था मागील वर्षाच्या पायाभूत पदानुसार न ठरविता ती उपलब्ध विद्यार्थी संख्येच्या निकषानुसार व आरटीई अ‍ॅक्ट नुसार मंजूर करणे. शिक्षण संस्था चालक राज्य संघटनेच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्याबाबत विचार करणे, इत्यादी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून समस्या मांडण्याचे निश्चित करण्यात आले. संबंधित मागण्यासाठी संस्था चालक पाठपुरावा तर करणार आहेत, शिवाय वेळ पडल्यास आंदोलन, न्यायालयीन लढ्याची तयारी संस्था चालकांनी दर्शविली आहे.सभेला संस्था चालक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.विलास पाटणे, कार्यवाह श्रीराम भावे, जावेद ठाकूर (राजापूर), नाना मयेकर (मालगुंड), आंबा सावंत, विनोद दळवी (मंडणगड) यांच्या सह ७२ संस्थाचालक सभेला उपस्थित होते. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी संस्था चालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी पाठिंबा दर्शविला आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी