शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  चिपळूण तालुक्यातील अभियंत्यांनी सुरु केली अळंबीची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:05 IST

अभ्यासात हुशार असल्याने तो सिव्हील इंजिनिअर बनला. पण घरची परिस्थिती बेताची. त्यातच आई-वडिलांचा शेती हाच व्यवसाय. याच अल्पशा जागेत काहीतरी सोनं पिकवण्याचा निर्णय त्याने घेतला. आज त्याने आपल्या चार मित्रांसोबत अळंबीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून त्याला चांगला नफाही मिळू लागला आहे.

ठळक मुद्देचिपळूण तालुक्यातील अभियंत्यांनी सुरु केलीअळंबीची शेतीदिवसाला पाच किलो अळंबीचे उत्पादन

विहार तेंडुलकररत्नागिरी : अभ्यासात हुशार असल्याने तो सिव्हील इंजिनिअर बनला. पण घरची परिस्थिती बेताची. त्यातच आई-वडिलांचा शेती हाच व्यवसाय. याच अल्पशा जागेत काहीतरी सोनं पिकवण्याचा निर्णय त्याने घेतला. आज त्याने आपल्या चार मित्रांसोबत अळंबीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून त्याला चांगला नफाही मिळू लागला आहे.मनोज घाणेकर असे या तरूणाचे नाव. चिपळूण तालुक्यातील निवळी - कोदारेवाडी येथे छोट्याशा खोलीतच त्याने आपले अळंबीचे शेत तयार केले आहे. त्याच्या या अळंबी शेतीत सागर कोदारे, योगेश गावडे, स्वप्नील गावडे, यतीन गावडे हे तरूणही सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व तरूण उच्चशिक्षित आहेत. मनोज घाणेकर व सागर कोदारे हे दोघेही सिव्हील इंजिनिअर आहेत. तर योगेश गावडे हा मोटार मेकॅनिक, स्वप्नील गावडे याने डी. फार्मसी केले असून, यतीन गावडे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.दिवसाला पाच किलो अळंबीचे उत्पादन हे सर्वजण घेतात. आपापला व्यवसाय संभाळून हे सारेजण दररोज एक तास अळंबी लागवडीसाठी देतात. अळंबीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे अळंबी तयार झाल्यानंतर लगेचच त्याची विक्री होते. एक किलो अळंबीसाठी केवळ ५० रुपये खर्च येतो आणि हीच अळंबी बाजारात ३५० ते ४०० रुपये किलो दराने विकली जाते, असे मनोज घाणेकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी कोणतेही भांडवल लागत नाही. त्यांच्या शेतीत धिंगरी प्रकारची अळंबी फुलतात.आहारातील महत्त्वअळंबीमध्ये २.७८ टक्के प्रोटीन असतात तर फायबर ९.८ टक्के असते. अळंबीमध्ये अन्य जीवनसत्वही खूप मोठ्या प्रमाणात असतात. महिन्याला घाणेकर यांना ३० ते ३५ हजार रुपये नफा मिळतो. दिवसातील केवळ एक तास देऊन एवढा नफा मिळवून देणारी ही शेती आहे.मोठी मागणीनैसर्गिक अळंबी ही केवळ पावसाळ्यातील तीन महिन्यांपैकी एक-दीड महिनेच मिळते. मात्र, शेतीतून अळंबी वर्षभर मिळते. त्यामुळे अळंबीला वर्षभर मागणी असते. रत्नागिरी जिल्ह्यात त्यामानाने अळंबीचे उत्पादन कमी असल्याने अळंबी बाहेरूनच मागवावी लागते. 

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी