शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

रत्नागिरी :  चिपळूण तालुक्यातील अभियंत्यांनी सुरु केली अळंबीची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:05 IST

अभ्यासात हुशार असल्याने तो सिव्हील इंजिनिअर बनला. पण घरची परिस्थिती बेताची. त्यातच आई-वडिलांचा शेती हाच व्यवसाय. याच अल्पशा जागेत काहीतरी सोनं पिकवण्याचा निर्णय त्याने घेतला. आज त्याने आपल्या चार मित्रांसोबत अळंबीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून त्याला चांगला नफाही मिळू लागला आहे.

ठळक मुद्देचिपळूण तालुक्यातील अभियंत्यांनी सुरु केलीअळंबीची शेतीदिवसाला पाच किलो अळंबीचे उत्पादन

विहार तेंडुलकररत्नागिरी : अभ्यासात हुशार असल्याने तो सिव्हील इंजिनिअर बनला. पण घरची परिस्थिती बेताची. त्यातच आई-वडिलांचा शेती हाच व्यवसाय. याच अल्पशा जागेत काहीतरी सोनं पिकवण्याचा निर्णय त्याने घेतला. आज त्याने आपल्या चार मित्रांसोबत अळंबीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून त्याला चांगला नफाही मिळू लागला आहे.मनोज घाणेकर असे या तरूणाचे नाव. चिपळूण तालुक्यातील निवळी - कोदारेवाडी येथे छोट्याशा खोलीतच त्याने आपले अळंबीचे शेत तयार केले आहे. त्याच्या या अळंबी शेतीत सागर कोदारे, योगेश गावडे, स्वप्नील गावडे, यतीन गावडे हे तरूणही सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व तरूण उच्चशिक्षित आहेत. मनोज घाणेकर व सागर कोदारे हे दोघेही सिव्हील इंजिनिअर आहेत. तर योगेश गावडे हा मोटार मेकॅनिक, स्वप्नील गावडे याने डी. फार्मसी केले असून, यतीन गावडे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.दिवसाला पाच किलो अळंबीचे उत्पादन हे सर्वजण घेतात. आपापला व्यवसाय संभाळून हे सारेजण दररोज एक तास अळंबी लागवडीसाठी देतात. अळंबीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे अळंबी तयार झाल्यानंतर लगेचच त्याची विक्री होते. एक किलो अळंबीसाठी केवळ ५० रुपये खर्च येतो आणि हीच अळंबी बाजारात ३५० ते ४०० रुपये किलो दराने विकली जाते, असे मनोज घाणेकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी कोणतेही भांडवल लागत नाही. त्यांच्या शेतीत धिंगरी प्रकारची अळंबी फुलतात.आहारातील महत्त्वअळंबीमध्ये २.७८ टक्के प्रोटीन असतात तर फायबर ९.८ टक्के असते. अळंबीमध्ये अन्य जीवनसत्वही खूप मोठ्या प्रमाणात असतात. महिन्याला घाणेकर यांना ३० ते ३५ हजार रुपये नफा मिळतो. दिवसातील केवळ एक तास देऊन एवढा नफा मिळवून देणारी ही शेती आहे.मोठी मागणीनैसर्गिक अळंबी ही केवळ पावसाळ्यातील तीन महिन्यांपैकी एक-दीड महिनेच मिळते. मात्र, शेतीतून अळंबी वर्षभर मिळते. त्यामुळे अळंबीला वर्षभर मागणी असते. रत्नागिरी जिल्ह्यात त्यामानाने अळंबीचे उत्पादन कमी असल्याने अळंबी बाहेरूनच मागवावी लागते. 

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी