शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रत्नागिरी : मच्छीमार समुदाय तटरक्षक दलाचे डोळे, कान, भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने दुचाकी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 4:06 PM

मच्छीमार समुदाय हा तटरक्षक दलासाठी डोळे आणि कान यांचे काम करतो. कारण मासेमारी करीत असताना समुद्रात एखादी संशयास्पद हलचाल आढळताच मच्छीमार बांधव तटरक्षक दलाच्या गस्ती नौका किंवा पोलिसांना त्वरित सूचित करतात. त्यामुळे मच्छीमार समुदायाला जीवनाचे संरक्षण होण्यासाठी समुदाय संवाद कार्यक्रम हाती घेतला जात असल्याची माहिती तटरक्षक दल, रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांनी दिली.

ठळक मुद्दे मच्छीमार समुदाय तटरक्षक दलाचे डोळे, कान भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने दुचाकी रॅली

दापोली : मच्छीमार समुदाय हा तटरक्षक दलासाठी डोळे आणि कान यांचे काम करतो. कारण मासेमारी करीत असताना समुद्रात एखादी संशयास्पद हलचाल आढळताच मच्छीमार बांधव तटरक्षक दलाच्या गस्ती नौका किंवा पोलिसांना त्वरित सूचित करतात. त्यामुळे मच्छीमार समुदायाला जीवनाचे संरक्षण होण्यासाठी समुदाय संवाद कार्यक्रम हाती घेतला जात असल्याची माहिती तटरक्षक दल, रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांनी दिली.तटरक्षक दलाच्या समन्वयाने मच्छीमारांच्या संरक्षणासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली दापोली तालुक्यातील दाभोळ येथे आली होती. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तटरक्षक दल, पोलीस, ओएनजीएस, कस्टम, फिशरीज या विभागाच्या एकूण ३६ जवानांचा व कर्मचाऱ्यांचा ताफा ९ दिवसांच्या मुंबई ते गोवा प्रवासासाठी मुंबईतून निघाला आहे.मुंबईहून गोव्याकडे निघालेला जवानांनाचा हा ताफा दाभोळ येथे सकाळी दाखल झाला. तत्पूर्वीच तटरक्षक दल रत्नागिरीने स्थानिक पोलिस व महसूल विभागाच्या मदतीने ग्राम पंचायत हॉल, दाभोळ येथे समुदाय संवाद कार्यक्रमाचे सर्व आयोजन केले होते. येथे तटरक्षक दल रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट एस आर पाटील, पोलीस निरीक्षक लाड, पोलीस निरीक्षक तायडे, फिशरीज विभागाचे सहायक आयुक्त साळुंखे, सीआयएसएफचे उपसमादेशक इंदोरीया उपस्थित होते.माहिती पत्रकांचे वितरणतटरक्षक दलामध्ये नाविक आणि अधिकाऱ्यांच्या भरतीसंबंधी माहिती जसे शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, परीक्षांचे वेळापत्रक व परीक्षा पध्दत याबद्दल मच्छीमारांना माहिती देण्यात आली, जेणेकरून त्यांची मुले तटरक्षक दलात येण्यासाठी प्रेरित होतील. यासंबंधीची माहिती पत्रकेही वाटण्यात आली.स्वच्छ सागरी पर्यावरणस्वच्छ व सुरक्षित सागरी पर्यावरण आणि सागरी सुरक्षा याबाबत मच्छीमार बांधवांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी हा समुदाय संवाद आयोजित करण्यात येणार असून, या रॅलीचे नेतृत्व तटरक्षक दलाचे असिस्टंट कमांडंट अजय दहिया यांच्याकडे आहे.प्रात्यक्षिक सादरीकरणसध्याच्या काळात देशाला समुद्रामार्गे भेडसावणारे सुरक्षिततेचे प्रश्न, शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण, जीवन संरक्षक उपकरणे, संकट कालीन इशारे, प्रथमोपचार इत्यादी बाबींची माहिती देण्यासाठी तटरक्षक दलातर्फे वारंवार असे समुदाय संवाद कार्यक्रम राबबिले जातात. त्यानंतर मच्छिमारांना सुरक्षा उपकरणे कशी वापरावी, संकट काळी इशारे कसे द्यावेत, संरक्षक दलास माहिती कशी द्यावी यांबद्दल प्रात्यक्षिके करून दाखवली गेली.जागृती निर्माण करणेमच्छीमारांमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबरच सागरी सुरक्षिततेची जबाबदारी निभावणारे तटरक्षक दल, सागरी पोलीस, कस्टम, फिशरीज अशा विविध संस्था व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये संघ भावना, कामात सुसूत्रता, परस्पर संपर्क व विश्वास यांचा विकास साधला जातो.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार