शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : एकाच महिन्यात दोन महिन्यांची देयके, महावितरणचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:24 IST

रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील ग्राहकांकडे एकाचवेळी दोन महिन्यांची देयके येऊन थडकल्याने त्यांची झोप उडाली आहे. महावितरणने चालू महिन्यातील बिले बनविण्यास उशीर केल्याचे या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, ही दोन्ही देयके रक्कम भरायची तारीख उलटून गेल्यानंतर ग्राहकांच्या हाती पडल्याने ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

ठळक मुद्देएकाच महिन्यात दोन महिन्यांची देयकेमहावितरणचा हलगर्जीपणा, ग्राहकांवर खेटे मारण्याची वेळ

रत्नागिरी : शहरातील बाजारपेठ परिसरातील ग्राहकांकडे एकाचवेळी दोन महिन्यांची देयके येऊन थडकल्याने त्यांची झोप उडाली आहे. महावितरणने चालू महिन्यातील बिले बनविण्यास उशीर केल्याचे या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, ही दोन्ही देयके रक्कम भरायची तारीख उलटून गेल्यानंतर ग्राहकांच्या हाती पडल्याने ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.गेले काही महिने वाढीव बिले देण्याचा महावितरणचा सिलसिला अजूनही सुरुच आहे. मात्र, आॅक्टोबर महिन्यात तर महावितरणने कहरच केला. रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसर, तेलीआळी आदी भागात गेल्या दोन महिन्यांचे बिल एकाच महिन्यात काही दिवसांच्या फरकाने देण्यात आले आहे.

ही दोन्ही बिले त्या बिलावरील रक्कम भरण्याची तारीख उलटून गेल्यानंतर ग्राहकांना पोहोच करण्यात आली आहेत. त्यामुळे आधीच वाढीव बिल आणि त्यानंतर उशिरा बिले भरण्यामुळे लागणारा विलंब आकार यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. काही दिवसांच्या फरकाने ही बिले दारावर येऊन थडकल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर झाला आहे.महावितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, ही बिले वरिष्ठ कार्यालयाकडून उशिराने बजावण्यात आली आहेत. शहराच्या काही भागात ही समस्या निर्माण झाल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले. महावितरणने दुसऱ्या महिन्याचे बिल २४ आॅक्टोबरला वितरित केले. त्यापूर्वीचे बिल अनेक ग्राहकांनी भरले असले तरी दुसरे बिल प्रिंट करेपर्यंत पहिल्या बिलाची रक्कम कंपनीपर्यंत न पोहोचल्याने त्या बिलाची रक्कमही नवीन बिलात वाढवून देण्यात आली आहे. दोन बिलांच्या वितरणामध्ये केवळ सात दिवसांचा फरक आहे. त्यामुळे नवीन बिल कमी करून घेण्यासाठी महावितरणच्या चकरा माराव्या लागत आहेत.बिलात फरक१७ आॅक्टोबरला ही बिले ग्राहकांना देण्यात आली. या बिलांवरील तारीख ही त्या अगोदरचीच होती. त्यामुळे विलंब आकाराचा फटका ग्राहकांना बसलाच; परंतु ज्यांनी आठवडाभरात बिले भरली नाहीत, त्यांच्या दारात २३ तारखेलाच महावितरणचा कर्मचारी वीजजोडणी तोडण्याचा इशारा देण्यासाठी हजर झाला. या कारभाराबद्दल ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.दोन महिन्यांची वेगवेगळी बिलेमहावितरणने वितरित केलेल्या वीजबिलावर आणि आॅनलाईन वीजबिलावर बिलाची रक्कम वेगवेगळी दाखवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत चौकशी केल्यानंतर लक्षात आले की, आॅनलाईन वीजबिल हे दोन महिन्यांचे एकत्रितरित्या बनवण्यात आले आहे तर जी बिले वितरित करण्यात आली आहेत, ती दोन महिन्यांची वेगवेगळी बनविण्यात आली आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी