शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

रत्नागिरी : एकाच महिन्यात दोन महिन्यांची देयके, महावितरणचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:24 IST

रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील ग्राहकांकडे एकाचवेळी दोन महिन्यांची देयके येऊन थडकल्याने त्यांची झोप उडाली आहे. महावितरणने चालू महिन्यातील बिले बनविण्यास उशीर केल्याचे या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, ही दोन्ही देयके रक्कम भरायची तारीख उलटून गेल्यानंतर ग्राहकांच्या हाती पडल्याने ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

ठळक मुद्देएकाच महिन्यात दोन महिन्यांची देयकेमहावितरणचा हलगर्जीपणा, ग्राहकांवर खेटे मारण्याची वेळ

रत्नागिरी : शहरातील बाजारपेठ परिसरातील ग्राहकांकडे एकाचवेळी दोन महिन्यांची देयके येऊन थडकल्याने त्यांची झोप उडाली आहे. महावितरणने चालू महिन्यातील बिले बनविण्यास उशीर केल्याचे या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, ही दोन्ही देयके रक्कम भरायची तारीख उलटून गेल्यानंतर ग्राहकांच्या हाती पडल्याने ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.गेले काही महिने वाढीव बिले देण्याचा महावितरणचा सिलसिला अजूनही सुरुच आहे. मात्र, आॅक्टोबर महिन्यात तर महावितरणने कहरच केला. रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसर, तेलीआळी आदी भागात गेल्या दोन महिन्यांचे बिल एकाच महिन्यात काही दिवसांच्या फरकाने देण्यात आले आहे.

ही दोन्ही बिले त्या बिलावरील रक्कम भरण्याची तारीख उलटून गेल्यानंतर ग्राहकांना पोहोच करण्यात आली आहेत. त्यामुळे आधीच वाढीव बिल आणि त्यानंतर उशिरा बिले भरण्यामुळे लागणारा विलंब आकार यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. काही दिवसांच्या फरकाने ही बिले दारावर येऊन थडकल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर झाला आहे.महावितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, ही बिले वरिष्ठ कार्यालयाकडून उशिराने बजावण्यात आली आहेत. शहराच्या काही भागात ही समस्या निर्माण झाल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले. महावितरणने दुसऱ्या महिन्याचे बिल २४ आॅक्टोबरला वितरित केले. त्यापूर्वीचे बिल अनेक ग्राहकांनी भरले असले तरी दुसरे बिल प्रिंट करेपर्यंत पहिल्या बिलाची रक्कम कंपनीपर्यंत न पोहोचल्याने त्या बिलाची रक्कमही नवीन बिलात वाढवून देण्यात आली आहे. दोन बिलांच्या वितरणामध्ये केवळ सात दिवसांचा फरक आहे. त्यामुळे नवीन बिल कमी करून घेण्यासाठी महावितरणच्या चकरा माराव्या लागत आहेत.बिलात फरक१७ आॅक्टोबरला ही बिले ग्राहकांना देण्यात आली. या बिलांवरील तारीख ही त्या अगोदरचीच होती. त्यामुळे विलंब आकाराचा फटका ग्राहकांना बसलाच; परंतु ज्यांनी आठवडाभरात बिले भरली नाहीत, त्यांच्या दारात २३ तारखेलाच महावितरणचा कर्मचारी वीजजोडणी तोडण्याचा इशारा देण्यासाठी हजर झाला. या कारभाराबद्दल ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.दोन महिन्यांची वेगवेगळी बिलेमहावितरणने वितरित केलेल्या वीजबिलावर आणि आॅनलाईन वीजबिलावर बिलाची रक्कम वेगवेगळी दाखवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत चौकशी केल्यानंतर लक्षात आले की, आॅनलाईन वीजबिल हे दोन महिन्यांचे एकत्रितरित्या बनवण्यात आले आहे तर जी बिले वितरित करण्यात आली आहेत, ती दोन महिन्यांची वेगवेगळी बनविण्यात आली आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी