शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रत्नागिरी :  दोन दुचाकींचा अपघात, दोन ठार, १ अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:36 IST

मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.

ठळक मुद्दे दोन दुचाकींचा अपघात, दोन ठार, १ अत्यवस्थ

रत्नागिरी : मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.

यात अनिल विजय शिरोटे आणि रोहीत रावसाहेब शिरोटे हे दोघे ठार झाले. निवास आनंद थोरात अत्यवस्थ आणि दीपक भुपाल शिरोटे किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील रहिवासी असून, ते अंगारकीनिमित्त गणपतीपुळेकडे जात होते.अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार मार्गावरच होती. अपघात पाहून त्यांना वाचवण्यासाठी कारचालकाने लगेचच गाडीचे ब्रेक लावल्याने त्यांची गाडी गटारात गेली. त्याला दुखापत झालेली नाही.तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील दीपक शिरोटे, अनिल शिरोटे (२५), निवास थोरात (२६) आणि रोहित शिरोटे (२७) हे चौघेजण दोन दुचाकी घेऊन सोमवारी रात्री आपल्या घरातून बाहेर पडले. रोहित आणि दीपक हे एका दुचाकीवर (एमएच 0८-एम २३७0) होते. अनिल आणि निवास हे दुसऱ्या दुचाकीवर (एमएच १0 - एए - ८0१३) होते. मंगळवारी अंगारकी असल्याने गणपतीपुळे येथे जाऊन देवदर्शन घेण्यासाठी ते निघाले.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते निघाले. पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास अनिल आणि निवास पुढे गेले. रोहित आणि दीपक मागे राहिले होते. ते अजून आले का नाहीत, हे पाहण्यासाठी अनिल व निवास फिरून परत आले. दुर्दैवाने हातखंबा ते निवळीदरम्यानच्या एका पेट्रोल पंपासमोर दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या.

हा अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार निवळीहून हातखंब्याकडे जात होती. अपघात झाल्यामुळे कारचालकाने आपल्या गाडीला अचानकच ब्रेक लावला. त्यात ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात गेली. अपघातात दीपक शिरोटे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे हे अपघात होताच क्षणी लगतच्या पेट्रोल पंपात गेले. त्यानंतर नरेंद्र महाराज संस्थानची रूग्णवाहिका घेऊन धनेश केतकर घटनास्थळी पोहोचले. त्यातून सर्वांना जिल्हा रूग्णालयात आणले गेले.मित्र-मित्रच एकमेकांवर आदळलेअपघातग्रस्त चौैघेही तरूण एकाच गावातील आहेत. गणपतीपुळेला जाण्यासाठी ते एकत्रच गावातून बाहेर पडले. या दोघांची एकमेकांशीच टक्कर झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. मित्रच एकमेकांवर आपटल्याने अपघात झाल्याचा प्रकार प्रथमच रत्नागिरीत झाला. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीSangliसांगली