शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रत्नागिरी :  दोन दुचाकींचा अपघात, दोन ठार, १ अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:36 IST

मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.

ठळक मुद्दे दोन दुचाकींचा अपघात, दोन ठार, १ अत्यवस्थ

रत्नागिरी : मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.

यात अनिल विजय शिरोटे आणि रोहीत रावसाहेब शिरोटे हे दोघे ठार झाले. निवास आनंद थोरात अत्यवस्थ आणि दीपक भुपाल शिरोटे किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील रहिवासी असून, ते अंगारकीनिमित्त गणपतीपुळेकडे जात होते.अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार मार्गावरच होती. अपघात पाहून त्यांना वाचवण्यासाठी कारचालकाने लगेचच गाडीचे ब्रेक लावल्याने त्यांची गाडी गटारात गेली. त्याला दुखापत झालेली नाही.तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील दीपक शिरोटे, अनिल शिरोटे (२५), निवास थोरात (२६) आणि रोहित शिरोटे (२७) हे चौघेजण दोन दुचाकी घेऊन सोमवारी रात्री आपल्या घरातून बाहेर पडले. रोहित आणि दीपक हे एका दुचाकीवर (एमएच 0८-एम २३७0) होते. अनिल आणि निवास हे दुसऱ्या दुचाकीवर (एमएच १0 - एए - ८0१३) होते. मंगळवारी अंगारकी असल्याने गणपतीपुळे येथे जाऊन देवदर्शन घेण्यासाठी ते निघाले.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते निघाले. पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास अनिल आणि निवास पुढे गेले. रोहित आणि दीपक मागे राहिले होते. ते अजून आले का नाहीत, हे पाहण्यासाठी अनिल व निवास फिरून परत आले. दुर्दैवाने हातखंबा ते निवळीदरम्यानच्या एका पेट्रोल पंपासमोर दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या.

हा अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार निवळीहून हातखंब्याकडे जात होती. अपघात झाल्यामुळे कारचालकाने आपल्या गाडीला अचानकच ब्रेक लावला. त्यात ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात गेली. अपघातात दीपक शिरोटे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे हे अपघात होताच क्षणी लगतच्या पेट्रोल पंपात गेले. त्यानंतर नरेंद्र महाराज संस्थानची रूग्णवाहिका घेऊन धनेश केतकर घटनास्थळी पोहोचले. त्यातून सर्वांना जिल्हा रूग्णालयात आणले गेले.मित्र-मित्रच एकमेकांवर आदळलेअपघातग्रस्त चौैघेही तरूण एकाच गावातील आहेत. गणपतीपुळेला जाण्यासाठी ते एकत्रच गावातून बाहेर पडले. या दोघांची एकमेकांशीच टक्कर झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. मित्रच एकमेकांवर आपटल्याने अपघात झाल्याचा प्रकार प्रथमच रत्नागिरीत झाला. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीSangliसांगली