शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

रत्नागिरी :  दोन दुचाकींचा अपघात, दोन ठार, १ अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:36 IST

मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.

ठळक मुद्दे दोन दुचाकींचा अपघात, दोन ठार, १ अत्यवस्थ

रत्नागिरी : मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.

यात अनिल विजय शिरोटे आणि रोहीत रावसाहेब शिरोटे हे दोघे ठार झाले. निवास आनंद थोरात अत्यवस्थ आणि दीपक भुपाल शिरोटे किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील रहिवासी असून, ते अंगारकीनिमित्त गणपतीपुळेकडे जात होते.अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार मार्गावरच होती. अपघात पाहून त्यांना वाचवण्यासाठी कारचालकाने लगेचच गाडीचे ब्रेक लावल्याने त्यांची गाडी गटारात गेली. त्याला दुखापत झालेली नाही.तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील दीपक शिरोटे, अनिल शिरोटे (२५), निवास थोरात (२६) आणि रोहित शिरोटे (२७) हे चौघेजण दोन दुचाकी घेऊन सोमवारी रात्री आपल्या घरातून बाहेर पडले. रोहित आणि दीपक हे एका दुचाकीवर (एमएच 0८-एम २३७0) होते. अनिल आणि निवास हे दुसऱ्या दुचाकीवर (एमएच १0 - एए - ८0१३) होते. मंगळवारी अंगारकी असल्याने गणपतीपुळे येथे जाऊन देवदर्शन घेण्यासाठी ते निघाले.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते निघाले. पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास अनिल आणि निवास पुढे गेले. रोहित आणि दीपक मागे राहिले होते. ते अजून आले का नाहीत, हे पाहण्यासाठी अनिल व निवास फिरून परत आले. दुर्दैवाने हातखंबा ते निवळीदरम्यानच्या एका पेट्रोल पंपासमोर दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या.

हा अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार निवळीहून हातखंब्याकडे जात होती. अपघात झाल्यामुळे कारचालकाने आपल्या गाडीला अचानकच ब्रेक लावला. त्यात ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात गेली. अपघातात दीपक शिरोटे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे हे अपघात होताच क्षणी लगतच्या पेट्रोल पंपात गेले. त्यानंतर नरेंद्र महाराज संस्थानची रूग्णवाहिका घेऊन धनेश केतकर घटनास्थळी पोहोचले. त्यातून सर्वांना जिल्हा रूग्णालयात आणले गेले.मित्र-मित्रच एकमेकांवर आदळलेअपघातग्रस्त चौैघेही तरूण एकाच गावातील आहेत. गणपतीपुळेला जाण्यासाठी ते एकत्रच गावातून बाहेर पडले. या दोघांची एकमेकांशीच टक्कर झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. मित्रच एकमेकांवर आपटल्याने अपघात झाल्याचा प्रकार प्रथमच रत्नागिरीत झाला. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीSangliसांगली