शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

रत्नागिरी : फिरत्या चाकावर ती हाकतेय संसाराचा गाडा, जोपासला पारंपरिक कुंभार व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 14:04 IST

पालपेणे-कुंभारवाडी येथील रुक्मिणी धोंडू नांदगावकर या वयोवृद्ध महिलेने मातीपासून माठ तसेच विविध वस्तूंना आकार देत आपला पारंपरिक तीन पिढ्यांपासूनचा कुंभार व्यवसाय आजही जोपासला आहे.

ठळक मुद्देफिरत्या चाकावर ती हाकतेय संसाराचा गाडावृध्द महिलेने मातीपासून बनवल्या विविध वस्तूपालपेणेतील रुक्मिणी नांदगावकर यांनी जोपासला पारंपरिक कुंभार व्यवसाय

मंदार गोयथळेअसगोली : पालपेणे-कुंभारवाडी येथील रुक्मिणी धोंडू नांदगावकर या वयोवृद्ध महिलेने मातीपासून माठ तसेच विविध वस्तूंना आकार देत आपला पारंपरिक तीन पिढ्यांपासूनचा कुंभार व्यवसाय आजही जोपासला आहे.

आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात पारंपरिक व्यवसायाकडे दुर्लक्ष होत चालले आहे. आजची तरुण पिढी आपला पारंपरिक व्यवसाय पुढे नेण्यास तयार नसल्याचे दिसून येते. प्रत्येक तरूणाला शहरातील नोकरीची ओढ असते. त्यामुळे विविध पारंपरिक व्यवसाय लोप पावण्याच्या स्थितीत आल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे. गुहागर तालुक्यातील पालपेणे - कुंभारवाडी येथे नांदगावकर कुटुंबियांचा पारंपरिक कुंभार व्यवसाय सुमारे ३ पिढ्यांपासून सुरु आहे. हा व्यवसाय आजही रुक्मिणी धोंडू नांदगावकर या आपल्या वयोवृद्ध अवस्थेत सांभाळत आहेत. या व्यवसायामध्ये त्यांना मुलगा उदय व सून नेहा यांचे सहकार्य लाभत आहे.

आपल्या या कुंभार व्यवसायामध्ये माठ तसेच मातीच्या विविध वस्तू बनवण्याचे काम हे कुटुंब करत आहे. मुळातच माठ बनवणे ही अवघड कला आहे. त्यातही माठ घडवणे अतिशय कठीण काम असून, नेमके हेच काम आजपर्यंत आपला मुलगा व सून यांना तितकेसे प्रभावीपणे जमत नसल्याचे रुक्मिणी नांदगावकर सांगतात.विशेष म्हणजे त्यांच्या या मातीच्या विविध वस्तू अनेक ठिकाणी प्रदर्शनासाठीदेखील गेल्या आहेत. वेळणेश्वर येथील प्रदर्शनात त्यांना रोख ५ हजार रुपयांचे पारितोषिकही देण्यात आले होते.

माठ बनवण्यासाठी मातीला आकार देणे, हे मोठे जिकरीचे काम आहे. परंतु ओल्या मातीत राहून मातीच्या विविध वस्तू घडवण्याचे कौशल्य आपल्या म्हातारपणीही रुक्मिणी नांदगावकर यांनी आजही जोपासले आहे. प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणाम थांबवण्याकरिता या कुंभार व्यवसायाला नवसंजिवनी मिळणे आज काळाची गरज बनली आहे.आर्थिक पाठबळ हवे..आपला कुंभार व्यवसाय गेल्या कित्येक पिढ्यांपासून सुरु आहे. या व्यवसायात मुलगा व सून यांचे चांगले सहकार्य मिळते. आपण बनवलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आर्थिक पाठबळाअभावी पाहिजे तशी गती देता येत नाही, असे त्या म्हणतात. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकRatnagiriरत्नागिरी