शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पीक विमा योजनेकडे यंदा शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:58 IST

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, यासाठी शासनातर्फे पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून एकाही शेतकऱ्यांला लाभ मिळालेला नाही. त्यामुळे यावर्षी अद्याप तरी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली आहे.

ठळक मुद्देपीक विमा योजनेकडे यंदा शेतकऱ्यांची पाठएकाही शेतकऱ्याची नोंदणी नाही : लाभच नाही तर योजना हवी कशाला?

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे पिकाचे होणारे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, यासाठी शासनातर्फे पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या योजनेतून एकाही शेतकऱ्यांला लाभ मिळालेला नाही. त्यामुळे यावर्षी अद्याप तरी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली आहे.शासनाकडून कोणतीही योजना तयार करताना सरसकट सर्वांसाठी तयार केली जाते. मात्र, कोकणातील भौगोलिक परिस्थिती विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी अडसर ठरते. खरीप हंगामासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनसाठी कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक, तर बिगर कर्जदारांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आली आहे.

वास्तविक सुरूवातीला पीक विमा योजनेतील काही निकषांमध्ये बदल करून गतवर्षी खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजा सुरू करण्यात आली. परंतु नवीन योजनेतील काही तरतूदींमुळे या योजनेकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

जिल्ह्यात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. भाताची उत्पादकता २४.७३ क्विंटल प्रतिहेक्टरी आहे. कर्जदार शेतकऱ्यांची संख्या पन्नास हजार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना बंधनकारक असली तरी बहुतांश शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाहीत.

योजनेच्या पहिल्या वर्षी २ हजार ३९० शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. बिगर कर्जदार दोन शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. गतवर्षी मात्र लाभार्थींची संख्या घटली. एक हजार २१४ शेतकरी विमा योजनेचे लाभार्थी झाले होते. त्यामध्ये एकमेव बिगर कर्जदार शेतकऱ्याचा समावेश होता.

गतवर्षी ६६६.१ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला होता.  त्यासाठी  पाच लाख १९ हजार ५७६.३ रूपये विमा हप्त्याचे शेतकऱ्यांनी भरले होते.पावसाळ्यात येणारा पूर, पावसातील खंड, पावसाअभावी पडणारा दुष्काळ यामुळे भात पिकाचे नुकसान झाले तर अपेक्षित उत्पादनामध्ये उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट असेल तर नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम विमा लाभार्थ्यांना मिळणार आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्याचे ७० टक्के उंबरठा उत्पादन उत्पन्न असल्यामुळे विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

वैयक्तिक स्तरावरही शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची तरतूद करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर ४८ तासात विमा कंपनी किंवा ज्या ठिकाणी विमा उतरविला ती बँक, कृषी विभाग व महसूल विभागांना नुकसान झाल्याची माहिती कळविणे बंधनकारक आहे.शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करूनही शेतकऱ्यांकडून प्रतिसादच मिळत नसल्यामुळे तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे सांगण्यात येत आहे.विमा उतरविताना शेतकऱ्यांना शेतीचा आठ (अ) घेऊन कृषी सहाय्यकांकडून अर्ज भरून राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांकडे कोणताच पुरावा राहात नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर नुकसानभरपाई देताना पाच वर्षांच्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित करण्यात येणार आहे.आवाहन करूनही शेतकऱ्यांचा या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षात शेतकऱ्यांना या योजनेचा मिळालेला वाईट अनुभव याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरीgovernment schemeसरकारी योजना