शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

रत्नागिरी : पीक विमा योजनेकडे यंदा शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:58 IST

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, यासाठी शासनातर्फे पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून एकाही शेतकऱ्यांला लाभ मिळालेला नाही. त्यामुळे यावर्षी अद्याप तरी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली आहे.

ठळक मुद्देपीक विमा योजनेकडे यंदा शेतकऱ्यांची पाठएकाही शेतकऱ्याची नोंदणी नाही : लाभच नाही तर योजना हवी कशाला?

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे पिकाचे होणारे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, यासाठी शासनातर्फे पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या योजनेतून एकाही शेतकऱ्यांला लाभ मिळालेला नाही. त्यामुळे यावर्षी अद्याप तरी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली आहे.शासनाकडून कोणतीही योजना तयार करताना सरसकट सर्वांसाठी तयार केली जाते. मात्र, कोकणातील भौगोलिक परिस्थिती विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी अडसर ठरते. खरीप हंगामासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनसाठी कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक, तर बिगर कर्जदारांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आली आहे.

वास्तविक सुरूवातीला पीक विमा योजनेतील काही निकषांमध्ये बदल करून गतवर्षी खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजा सुरू करण्यात आली. परंतु नवीन योजनेतील काही तरतूदींमुळे या योजनेकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

जिल्ह्यात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. भाताची उत्पादकता २४.७३ क्विंटल प्रतिहेक्टरी आहे. कर्जदार शेतकऱ्यांची संख्या पन्नास हजार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना बंधनकारक असली तरी बहुतांश शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाहीत.

योजनेच्या पहिल्या वर्षी २ हजार ३९० शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. बिगर कर्जदार दोन शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. गतवर्षी मात्र लाभार्थींची संख्या घटली. एक हजार २१४ शेतकरी विमा योजनेचे लाभार्थी झाले होते. त्यामध्ये एकमेव बिगर कर्जदार शेतकऱ्याचा समावेश होता.

गतवर्षी ६६६.१ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला होता.  त्यासाठी  पाच लाख १९ हजार ५७६.३ रूपये विमा हप्त्याचे शेतकऱ्यांनी भरले होते.पावसाळ्यात येणारा पूर, पावसातील खंड, पावसाअभावी पडणारा दुष्काळ यामुळे भात पिकाचे नुकसान झाले तर अपेक्षित उत्पादनामध्ये उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट असेल तर नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम विमा लाभार्थ्यांना मिळणार आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्याचे ७० टक्के उंबरठा उत्पादन उत्पन्न असल्यामुळे विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

वैयक्तिक स्तरावरही शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची तरतूद करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर ४८ तासात विमा कंपनी किंवा ज्या ठिकाणी विमा उतरविला ती बँक, कृषी विभाग व महसूल विभागांना नुकसान झाल्याची माहिती कळविणे बंधनकारक आहे.शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करूनही शेतकऱ्यांकडून प्रतिसादच मिळत नसल्यामुळे तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे सांगण्यात येत आहे.विमा उतरविताना शेतकऱ्यांना शेतीचा आठ (अ) घेऊन कृषी सहाय्यकांकडून अर्ज भरून राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांकडे कोणताच पुरावा राहात नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर नुकसानभरपाई देताना पाच वर्षांच्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित करण्यात येणार आहे.आवाहन करूनही शेतकऱ्यांचा या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षात शेतकऱ्यांना या योजनेचा मिळालेला वाईट अनुभव याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरीgovernment schemeसरकारी योजना