शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पालीनजीक महामार्गावर टेम्पो खाक, आगीमध्ये २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:23 IST

मिऱ्या - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पालीनजीक बांबर फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यातील वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली. यामध्ये टेम्पोसह आतील माल जळल्याने २ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प खोळंबली होती.

ठळक मुद्देपालीनजीक महामार्गावर टेम्पो खाकआगीमध्ये एकूण २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान

पाली : मिऱ्या - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पालीनजीक बांबर फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यातील वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली. यामध्ये टेम्पोसह आतील माल जळल्याने २ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प खोळंबली होती.देवरुख - साखरपा येथून मालवाहतूक करीत येणाऱ्या अशोक लेलॅण्ड दोस्त या ट्रकच्या वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने आग लागली. चालकाच्या केबीनमधून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. त्यामुळे चालकाने तत्काळ महामार्गावर वाहन थांबवून बाहेर उडी मारली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच संपूर्ण टेम्पोने पेट घेतला होता.

टेम्पो देवरुख - कोसुंब येथील अमित अनंत जाधव यांच्या मालकीचा होता. त्यावर सचिन गायकर (रा. देवरुख) हा चालक म्हणून होता. त्यांच्यासोबत प्रवीण अनंत जाधव हेही गाडीत होते.

प्रवीण जाधव या वाहनातून फरसाण व इतर खाद्यपदार्थांचे घाऊक वितरण करण्यासाठी पाली येथे येत होते. त्यामुळे ४०० किलोग्रॅम मालाचे ४० हजार रुपये इतकी किंमत होती. तसेच वाहनाचे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये एकूण २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.पाली येथील पाणी विक्रेते संदेश सावंत पाण्याची गाडी घेऊन, महेश सरगर हे पाण्याच्या पंपासह घटनास्थळी आले. त्यानंतर प्रसन्न राऊत यांच्यासह पाली पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल संजय झगडे, पोलीस नाईक मोहन पाटील यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेच्या बंबानेही प्रयत्न केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग