शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा, रवींद्र वायकर यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:25 IST

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सूचनाबॅरिकेट, दिशादर्शक फलक व अन्य सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना.कंत्राटदारांना दक्ष राहण्याचे निर्देश, कार्यकारी अभियंत्यांना दिले लेखी पत्र

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ते वाहतुकीतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात. तसे निर्देश या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात यावेत, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.मागील वर्षीपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. एप्रिल - मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणात येणाऱ्या व परत जाणाऱ्या प्रवाशांच्या हितासाठी तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही प्रवाशांच्या व स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना कंत्रादारांनी न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.मागील काही दिवसांमध्ये दिवाणी खवटी तसेच कशेडी घाट येथे २ ते ३ अपघात झाले असून, यात काही प्रवाशांना प्राणही गमवावे लागले. कशेडी घाटातही अपघात झाल्याचे पालकमंत्री वायकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कंत्राटदारांनी विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून मुंबई - गोवा - मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी कंत्राटदारांना धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट व दिशादर्शक फलक लावणे, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.सुरक्षेची काळजी नाहीगेल्या काही दिवसात महामार्ग चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत अपघातांची संख्या वाढत आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने काम सुरु करताना सुरक्षेची काळजी न घेतल्याने असे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग