शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा, रवींद्र वायकर यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:25 IST

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सूचनाबॅरिकेट, दिशादर्शक फलक व अन्य सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना.कंत्राटदारांना दक्ष राहण्याचे निर्देश, कार्यकारी अभियंत्यांना दिले लेखी पत्र

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ते वाहतुकीतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात. तसे निर्देश या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात यावेत, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.मागील वर्षीपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. एप्रिल - मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणात येणाऱ्या व परत जाणाऱ्या प्रवाशांच्या हितासाठी तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही प्रवाशांच्या व स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना कंत्रादारांनी न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.मागील काही दिवसांमध्ये दिवाणी खवटी तसेच कशेडी घाट येथे २ ते ३ अपघात झाले असून, यात काही प्रवाशांना प्राणही गमवावे लागले. कशेडी घाटातही अपघात झाल्याचे पालकमंत्री वायकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कंत्राटदारांनी विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून मुंबई - गोवा - मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी कंत्राटदारांना धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट व दिशादर्शक फलक लावणे, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.सुरक्षेची काळजी नाहीगेल्या काही दिवसात महामार्ग चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत अपघातांची संख्या वाढत आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने काम सुरु करताना सुरक्षेची काळजी न घेतल्याने असे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग