शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

रत्नागिरी : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा, रवींद्र वायकर यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:25 IST

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सूचनाबॅरिकेट, दिशादर्शक फलक व अन्य सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना.कंत्राटदारांना दक्ष राहण्याचे निर्देश, कार्यकारी अभियंत्यांना दिले लेखी पत्र

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ते वाहतुकीतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात. तसे निर्देश या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात यावेत, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.मागील वर्षीपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. एप्रिल - मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणात येणाऱ्या व परत जाणाऱ्या प्रवाशांच्या हितासाठी तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही प्रवाशांच्या व स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना कंत्रादारांनी न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.मागील काही दिवसांमध्ये दिवाणी खवटी तसेच कशेडी घाट येथे २ ते ३ अपघात झाले असून, यात काही प्रवाशांना प्राणही गमवावे लागले. कशेडी घाटातही अपघात झाल्याचे पालकमंत्री वायकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कंत्राटदारांनी विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून मुंबई - गोवा - मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी कंत्राटदारांना धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट व दिशादर्शक फलक लावणे, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.सुरक्षेची काळजी नाहीगेल्या काही दिवसात महामार्ग चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत अपघातांची संख्या वाढत आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने काम सुरु करताना सुरक्षेची काळजी न घेतल्याने असे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग