शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रत्नागिरी : गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा, ग्रामस्थांचा मुंबई-गोवा महामार्ग रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 11:55 IST

गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी खेड तालुक्यातील पीरलोटे येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवला आहे.

ठळक मुद्देलोटे परिसरात गोवंश हत्येची चर्चा गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी -ग्रामस्थ

रत्नागिरी -गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी खेड तालुक्यातील पीरलोटे येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवला आहे. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे.  कत्तल करण्यासाठी गायींची वाहतूक केली जात असल्याचा संशय ग्रामस्थांना आहे. याविरोधात ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळेस लोकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांना धक्काबुक्की करुन ग्रामस्थांनी पोलिसांची गाडी पेटवली. इतर गाड्यांवरही दगडफेक झाली. यामध्ये एस.टी.बससह काही अन्य गाड्याही फोडण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून लोटे परिसरात गोवंश हत्येची चर्चा सुरू आहे. यावर ग्रामस्थ पाळत ठेवून होते. शनिवारी (26 जानेवारी) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी एक गाडी अडवली. यात एक गाय होती. मात्र गाडीतील लोक बंदुक आणि तलवारीचा धाक दाखवून पळून गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या लोकांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी महामार्ग अडवण्यात आला आहे.

लोकांना बाजूला करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांनी लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले. यामुळे जमाव संतप्त झाला आणि त्यांनी नांदेडकर यांना धक्काबुक्की केली. तेवढ्यावरच न थांबता लोकांनी पोलिसांची गाडीही पेटवून दिली. 

यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर, खेडचे पोलीस निरीक्षक अनिल हे गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.

टॅग्स :cowगाय