शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

रत्नागिरी : अचानक उष्म्यात वाढ; बागायतदार घामाघूम, आंब्यावर पुन्हा संकट, पुनर्मोहोरामुळे फळगळतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:16 IST

गेले चार दिवस हवामानात बदल जाणवत आहे. थंडीचा जोर ओसरला असून, उष्मा वाढला आहे. दिवसा कडकडीत ऊन असल्याने दिवसाचे तापमान हे ३३ अंश सेल्सियस इतके असते तर रात्री २३ अंश इतके तापमान खाली येत असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवते. मात्र, या संमिश्र हवामानाचा आंबा पिकावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत अचानक उष्म्यात वाढ; बागायतदार घामाघूमआंब्यावर पुन्हा संकटपुनर्मोहोरामुळे फळगळतीत वाढ

रत्नागिरी : गेले चार दिवस हवामानात बदल जाणवत आहे. थंडीचा जोर ओसरला असून, उष्मा वाढला आहे. दिवसा कडकडीत ऊन असल्याने दिवसाचे तापमान हे ३३ अंश सेल्सियस इतके असते तर रात्री २३ अंश इतके तापमान खाली येत असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवते. मात्र, या संमिश्र हवामानाचा आंबा पिकावर परिणाम होत आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील प्रचंड थंडीमुळे आंब्यावर मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. फळधारणा झालेल्या झाडांनाही पुनर्मोहोर सुरू झाल्याने फळगळती वाढली आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना घाम फुटला आहे.ओखी वादळानंतर झालेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील फुलोऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी वाटाण्याएवढी झालेली फळे गळली शिवाय मोहोरही कुजून गेला. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढल्याने झडलेल्या मोहोरातून पुन्हा मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे.

पालवी जून होऊन मोहोर येऊ लागला आहे. याशिवाय मोहोराच्या ठिकाणी पुन्हा पुनर्मोहोर येऊ लागल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. निसर्गावर अवलंबून असणारे आंबापीक दिवसेंदिवस खर्चिक बनले असून, मकर संक्रांतीपासूनच्या संमिश्र हवामानामुळे तुडतुडा व कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर व फळांच्या संरक्षणासाठी फवारणीचा मात्र खर्च वाढला आहे.सन २०१४-१५मध्ये अवकाळी पावसामुळे आंबापीक धोक्यात आले होते. २०१५-१६मध्ये पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले. २०१६-१७मध्ये अधिकतम पर्जन्यमान होऊनही नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्याने मोहोर प्रक्रिया लवकर झाली.

गतवर्षी आंबा चांगला झाला. मात्र, परराज्यातील आंबा त्याचवेळी बाजारात आला व हापूसचे दर कोसळले. शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ओखी वादळानंतर अवकाळी पावसामुळे मोहोर कुजला. वाटाण्याएवढी झालेली फळे गळून पडली. कल्टार, वोल्टारसारखी संजीवके वापरलेल्या शेतकऱ्यांना वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला.सध्या कमाल ३३ तर किमान २३ अंश सेल्सियस इतके तापमान आहे. दिवसभर उष्मा असतो तर रात्री तापमान खाली येते. या संमिश्र हवामानामुळे तुडतुड्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोर पावसामुळे वाया गेला तर दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला फळधारणा झाली आहे. मात्र, अतिथंडीमुळे फळधारणा झालेल्या मोहोरातून पुनर्मोहोर सुरू झाल्यामुळे फळधारणेला धोका निर्माण झाला आहे.

बोराएवढी झालेली फळे गळू लागली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आंबा नैसर्गिक दृष्टचक्रातून वाचला तर मार्चअखेर अथवा एप्रिलमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, फळगळ वाढल्याने त्याचेही प्रमाण अत्यल्प असण्याचा संभव आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तिसऱ्या टप्प्यातील मोहोर सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यातील झडून गेलेल्या मोहोराच्या देठातून मोहोर येऊ लागला आहे. गेल्या चार दिवसात थंडीचा जोर ओसरला आहे. दिवसा सुटणारे वारे बंद झाले असून, उष्मा मात्र बऱ्यापैकी वाढला आहे.

रात्री तापमान खाली येत असले तरी दव पडत नाही. संमिश्र हवामानामुळे काही ठिकाणी मोहोर काळवंडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा अधिक खर्च करावा लागत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील निच्चांकी तापमानामुळे तिसऱ्या टप्प्यातील नवीन मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

ओखी वादळामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर कुजून गेला. दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला नुसताच फुलोरा आला. त्यानंतर जानेवारीच्या सुरूवातीला थंडीचे प्रमाण वाढले शिवाय तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही सुरू झाला. मात्र, त्याचबरोेबर पुनर्मोहोर प्रक्रिया झाल्याने फळधारणेला धोका निर्माण झाला. मकर संक्रांतीपासून पुन्हा हवामानात बदल झाला. दिवसा उष्मा व रात्री थंडी असे विचित्र हवामान असून, ते आंब्याला पोषक नाही. त्यामुळे आंबापिकाचे दिवसेंदिवस नुकसान होत आहे.- टी. एस. घवाळी,आंबा बागायतदार, रत्नागिरी. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfruitsफळे