शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

रत्नागिरी : सागरी महामार्गाचे लवकरच दुपदरीकरण, प्रकल्प आराखडा केंद्र शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:27 IST

करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देसागरी महामार्गाचे होणार लवकरच दुपदरीकरणकरंजा ते आरोंदा : २५०० कोटींचा प्रस्ताव केंद्राला सादर

रत्नागिरी : करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

सध्याचा अनेक तुकड्यांच्या स्वरुपातील सागरी महामार्ग सलग जोडण्यासाठी त्याची नव्याने बांधणी होणार आहे. या जोडणीत ८२ पूल उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी शासनस्तरावरून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे.येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करंजा ते रेवस - दिघी - जैतापूर - वेंगुर्ला - आरोंदा असा हा ५५० किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सागरी महामार्गाचे काम सुरू होते. मात्र, अनेक ठिकाणी नद्या असून, त्यावर पूल न उभारता जेटी उभारून फेरीबोटीच्या सहाय्याने वाहनांना पुढील मार्गावर जावे लागते.त्यामुळे हा प्रवास अडथळ्यांचा ठरत आहे. अनेकदा फेरीबोटीबाबतच्या समस्यांमुळेही सागरी महामार्गावरील वाहतूक बेभरवशी ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच सर्व पुलांसहीत हा सागरी महामार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.कोकणात वाढणाऱ्या सागरी पर्यटनासाठीही सागरी महामार्ग सलगपणे होणे आवश्यक आहे. त्यासाठीच केंद्र शासन स्तरावरून सागरी महामार्ग पहिल्या टप्प्यात नव्याने बांधणी करीत दुपदरी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.करंजा ते आरोंदा किरणपाणी या गोव्याच्या हद्दीपर्यंतचा सागरी महामार्ग कोकणातील पर्यटन विकासासाठीच उभारण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी हा महामार्ग अपुरा तसेच तुकड्यांच्या स्वरुपात आहे. सागरी महामार्गाच्या झालेल्या कामाच्या दर्जाबाबतही अनेकांचे आक्षेप आहेत. आता या महामार्गाची पुनर्बांधणी व दुपदरीकरणासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे.

करंजा ते आरोंदा या संपूर्ण सागरी महामार्गावर ८२ पुल होणार असून त्यातील १८ पुल रत्नागिरी जिल्ह्यात व १० पुल सिंधुदुर्गात होणार आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जात असलेल्या या सागरी महामार्गाच्या उभारणीसाठी ३ एजन्सींचीही नेमणूक केली आहे. ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी