शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

रत्नागिरी : तीन दिवसांत तीन हजार डझन हापूसची लक्षणीय विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 17:11 IST

रत्नागिरी हापूसला औरंगाबादकरांची विशेष पसंती मिळाल्याने शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल एक हजार डझन आणि एकूण तीन हजार डझन आंब्यांची लक्षणीय विक्री झाली. त्याचबरोबर पुढील वर्षीपासून दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवासाठी आग्रहाचे निमंत्रणही मिळाले आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांत तीन हजार डझन हापूसची लक्षणीय विक्रीऔरंगाबादमध्ये दरवर्षीच होणार हापूसवारी

शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरी हापूसला औरंगाबादकरांची विशेष पसंती मिळाल्याने शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल एक हजार डझन आणि एकूण तीन हजार डझन आंब्यांची लक्षणीय विक्री झाली. त्याचबरोबर पुढील वर्षीपासून दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवासाठी आग्रहाचे निमंत्रणही मिळाले आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, या संकल्पनेतून राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने औरगांबाद येथे ३०, ३१ मे आणि १ जून या तीन दिवसांच्या कालावधीत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३ आंबा उत्पादक सहभागी झाले होते.

रत्नागिरी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी, समितीचे सहाय्यक सचिव सुहास साळवी, सुधाकर कोकीतकर, निरीक्षक अतुल नागवेकर, लिपीक रूपेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश चव्हाण, निवळी, मारूती साळुंखे, करबुडे, दिगंबर मयेकर, पोमेंडी, सुभाष भुवड, डुगवे, गणेश देसाई, दीपक देसाई, नूरमहंमद मुकादम, अर्जुन पाडावे आणि प्रकाश साळवी यांनी आंब्याची विक्री केली.तीन दिवसांच्या कालावधीत झालेल्या या महोत्सवात नैसर्गिक पिकवलेला रत्नागिरी हापूस उपलब्ध झाल्याने रत्नागिरीच्या हापूसची लक्षणीय उचल झाली. या तीन दिवसात हापूसला उत्तम दर मिळालाच पण तब्बल तीन हजार डझन आंब्याची विक्री झाल्याने आंबा उत्पादकही आनंदी झाले असून, पुढीलवर्षी पुन्हा सहभागी होण्याचे ठरवले आहे.आग्रहाचे निमंत्रणरत्नागिरी हापूसला या महोत्सवात चांगली पसंती मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढील वर्षी होणाऱ्या महोत्सवासाठी आग्रहाने बोलावले असल्याचे रत्नागिरी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी माहिती देताना सांगितले.

टॅग्स :Alphonso Mangoहापूस आंबाRatnagiriरत्नागिरी