शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

रत्नागिरी : आंबा निर्यात मँगोनेट प्रणालीव्दारे नावनोंदणीसाठी अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 16:29 IST

आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी नव्याने नोंदणी सुरू झाली असली तरी अद्याप त्यासाठी शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हाभरातून केवळ ४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

ठळक मुद्देगतवर्षी मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०५५ शेतकऱ्यांनी नोंदणी यावर्षी नव्याने नोंदणी सुरू असली तरी अद्याप प्रतिसाद नाही

रत्नागिरी : आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी नव्याने नोंदणी सुरू झाली असली तरी अद्याप त्यासाठी शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हाभरातून केवळ ४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.शेतकºयांना परदेशी बाजारपेठ खुली व्हावी, यासाठी शासनाने २०१४-१५पासून मँगोनेट प्रणाली सुरू केली. यावर्षीदेखील मँगोनेटसाठी नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून मँगोनेट प्रणालीअंतर्गत नोंदणीसाठी मिळणारा अल्प प्रतिसाद लक्षात घेता सुरूवातीला ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत देण्यात आलेली मुदत आता वाढवण्यात आली असून, ती ३१ जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे दरवर्षी मँगोनेट कार्यशाळा आयोजित करून आंब्याचे उत्पादन ते निर्यात याबाबतची माहिती देण्यात येते. तंत्रज्ञान पोहोचवण्याबरोबरच शेतकऱ्यांचा आंबा नाकारला जाणार नाही, याबाबत घेण्यात येणाऱ्या खबरदारीबाबतही सूचना देण्यात येते.

दरवर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. यावर्षीही नूतन नोंदणीबरोबर प्रमाणपत्र नूतनीकरणाचे आवाहन केले आहे. अमेरिका तसेच युरोपियन देशासाठी आंबा निर्यात करण्याकरिता ३१ जानेवारीपर्यत नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी दरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छूक आहेत, त्याची माहिती आॅनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार कोकणातील हापूस पिकवला जात असल्याने दर्जेदार हापूसचे उत्पादन घेण्यात येत आहे. आंब्याच्या झाडाचे खत व्यवस्थापन, कीटकनाशक फवारणीचे वेळापत्रक तयार करून टप्प्याटप्प्याने नोंदी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोकणातील भौगोलिक परिस्थिती भिन्न असून टप्प्याटप्प्यावर नैसर्गिक बदल संभवतात. थंडीमुळे पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे. आंब्याच्या निर्यातवाढीतून शेतकऱ्यांना चांगली अर्थप्राप्ती व्हावी, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ३१ जानेवारीपर्यंत मँगोनेटसाठी नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.गतवर्षी १८६२ शेतकऱ्यांनी मँगोनेटसाठी पुनर्नोंदणी केली होती, तर केवळ १९३ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केल्यामुळे एकूण २ हजार ५५ शेतकऱ्यांनी मँगोनेट प्रणालीव्दारे नोंदणी केल्याने १६९३ हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. सुरूवातीच्या दोन वर्षांत मँगोनेट प्रणालीव्दारे निर्यातच झाली नव्हती.

गतवर्षी (२०१७) मध्ये जिल्ह्यातून १६९२ किलो आंबा परदेशी निर्यात झाला होता. कुवेतमध्ये ४२ किलो, तर रशियामध्ये १६५० किलो आंबा निर्यात झाला होता. गतवर्षीपासून मँगोनेटव्दारे निर्यात सुरू झाली आहे. यावर्षी निर्यातीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfruitsफळे