शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : आंबा निर्यात मँगोनेट प्रणालीव्दारे नावनोंदणीसाठी अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 16:29 IST

आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी नव्याने नोंदणी सुरू झाली असली तरी अद्याप त्यासाठी शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हाभरातून केवळ ४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

ठळक मुद्देगतवर्षी मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०५५ शेतकऱ्यांनी नोंदणी यावर्षी नव्याने नोंदणी सुरू असली तरी अद्याप प्रतिसाद नाही

रत्नागिरी : आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी नव्याने नोंदणी सुरू झाली असली तरी अद्याप त्यासाठी शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हाभरातून केवळ ४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.शेतकºयांना परदेशी बाजारपेठ खुली व्हावी, यासाठी शासनाने २०१४-१५पासून मँगोनेट प्रणाली सुरू केली. यावर्षीदेखील मँगोनेटसाठी नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून मँगोनेट प्रणालीअंतर्गत नोंदणीसाठी मिळणारा अल्प प्रतिसाद लक्षात घेता सुरूवातीला ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत देण्यात आलेली मुदत आता वाढवण्यात आली असून, ती ३१ जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे दरवर्षी मँगोनेट कार्यशाळा आयोजित करून आंब्याचे उत्पादन ते निर्यात याबाबतची माहिती देण्यात येते. तंत्रज्ञान पोहोचवण्याबरोबरच शेतकऱ्यांचा आंबा नाकारला जाणार नाही, याबाबत घेण्यात येणाऱ्या खबरदारीबाबतही सूचना देण्यात येते.

दरवर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. यावर्षीही नूतन नोंदणीबरोबर प्रमाणपत्र नूतनीकरणाचे आवाहन केले आहे. अमेरिका तसेच युरोपियन देशासाठी आंबा निर्यात करण्याकरिता ३१ जानेवारीपर्यत नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी दरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छूक आहेत, त्याची माहिती आॅनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार कोकणातील हापूस पिकवला जात असल्याने दर्जेदार हापूसचे उत्पादन घेण्यात येत आहे. आंब्याच्या झाडाचे खत व्यवस्थापन, कीटकनाशक फवारणीचे वेळापत्रक तयार करून टप्प्याटप्प्याने नोंदी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोकणातील भौगोलिक परिस्थिती भिन्न असून टप्प्याटप्प्यावर नैसर्गिक बदल संभवतात. थंडीमुळे पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे. आंब्याच्या निर्यातवाढीतून शेतकऱ्यांना चांगली अर्थप्राप्ती व्हावी, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ३१ जानेवारीपर्यंत मँगोनेटसाठी नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.गतवर्षी १८६२ शेतकऱ्यांनी मँगोनेटसाठी पुनर्नोंदणी केली होती, तर केवळ १९३ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केल्यामुळे एकूण २ हजार ५५ शेतकऱ्यांनी मँगोनेट प्रणालीव्दारे नोंदणी केल्याने १६९३ हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. सुरूवातीच्या दोन वर्षांत मँगोनेट प्रणालीव्दारे निर्यातच झाली नव्हती.

गतवर्षी (२०१७) मध्ये जिल्ह्यातून १६९२ किलो आंबा परदेशी निर्यात झाला होता. कुवेतमध्ये ४२ किलो, तर रशियामध्ये १६५० किलो आंबा निर्यात झाला होता. गतवर्षीपासून मँगोनेटव्दारे निर्यात सुरू झाली आहे. यावर्षी निर्यातीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfruitsफळे