शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हौसेला मोल नाही; पसंतीच्या क्रमांकासाठी रत्नागिरीकरांनी मोजले ९६ लाख रुपये

By शोभना कांबळे | Updated: April 26, 2025 18:31 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : हाैसेला मोल नसते, म्हणतात, ते खोटे नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील ८५३ वाहनचालकांनी पसंतीच्या क्रमांकांसाठी ३ हजार ...

शोभना कांबळेरत्नागिरी : हाैसेला मोल नसते, म्हणतात, ते खोटे नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील ८५३ वाहनचालकांनी पसंतीच्या क्रमांकांसाठी ३ हजार रुपयांपासून अगदी अडीच लाखांपर्यंत खर्च केला आहे. या हाैसेपाेटी चाॅइस नंबरमधून गेल्या साडेतीन महिन्यात येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत तब्बल ९६ लाख २६ हजार रुपयांची भर पडली आहे.नवीन वाहन खरेदी करताना बहुतांश वाहनचालकांना विशिष्ट क्रमांक हवा असताे. काहींना जन्माचे वर्ष, लग्नाचे वर्ष, ठराविक लक्षात ठेवण्याजोगा क्रमांक किंवा शुभ मानला जाणारा क्रमांक हवा असताे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याचीही तयारी असते. आपल्याला चाॅइस क्रमांक हवा असेल तर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे त्यासाठी शुल्क भरून नंबर मिळवावा लागतो. हे शुल्क क्रमांकानुसार अगदी पाच हजारांपासून पाच लाखांपर्यंत असते.रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते १५ एप्रिल या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ८५३ वाहनचालकांनी ३ हजारापासून अडीच लाखांपर्यंत शुल्क भरले आहे. यात दुचाकी, कार, खासगी वाहने, रिक्षा, रिक्षा टेंपो, बस आणि डंपर या वाहनांचा समावेश आहे. या नंबरमध्ये १ आणि ९ या आकड्यांना आणि त्यापुढील ० ला अधिक प्राधान्य दिले आहे. या हाैसेपायी मोजलेल्या शुल्कातून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मात्र मालामाल झाले आहे.

प्रत्येकाला आपल्या वाहनासाठी विशिष्ट क्रमांक असावा, असे वाटते. त्यामुळे वाहनचालक जन्म वर्ष, जन्मतारीख किंवा शुभ असलेला अंक, सम संख्या, विषम संख्या अशा प्रकारचे वाहनांचे नंबर खरेदी करतात. गेल्या साडेतीन महिन्यांत जिल्ह्यात ८५३ वाहनचालकांनी चाॅइस क्रमांकासाठी भरलेल्या शुल्कातून या कार्यालयाला ९० लाख २६ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.- राजवर्धन करपे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

शुल्क (रुपयात) - वाहनांची संख्या३००० - १५०००  - २८४६००० - २११७००० - ९०१०,००० - ७६१५,००० - ६४१८,००० - ७१२१००० - १६२५,००० - २१४५,००० - १०७०,००० - २७५,०००-  ४१,००,००० - २२,५०,००० - १

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRto officeआरटीओ ऑफीस