शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

सायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर, पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:14 IST

रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश

रत्नागिरी : रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रविवारी रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी आयटीआय- शिवाजीनगर ते हातखंबा व परत शिवाजीनगर हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सायकल मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक उत्स्फूर्तरित्या सहभागी झाले होते.

अशाप्रकारचा उपक्रम दोन महिन्यातून एकदा तरी आयोजित करण्यात यावा, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. आयटीआय मार्गावरील मंगळवार आठवडा बाजार येथे या मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी झेंडा दाखवला व शंभर नागरिकांनी हातखंब्याकडे कूच केली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉनचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याहस्ते करण्यात आले. रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य धरमसी चौहान यांनी या मॅरेथॉनला झेंडा दाखवला.शिवाजीनगर ते हातखंबा या मॅरेथॉन मार्गावर रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था दहा ठिकाणी करण्यात आली होती. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सायकलस्वारांसाठी साळवी स्टॉप येथील चिरायू हॉस्पिटल शेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा करण्यात आली होती.सायकल ट्रॅक उभारारत्नागिरी शहरात दुचाकी, चारचाकी व रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रस्त्याने जाताना सायकलस्वारांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता शहरातील रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनRatnagiriरत्नागिरी