शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

सायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर, पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:14 IST

रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश

रत्नागिरी : रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रविवारी रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी आयटीआय- शिवाजीनगर ते हातखंबा व परत शिवाजीनगर हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सायकल मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक उत्स्फूर्तरित्या सहभागी झाले होते.

अशाप्रकारचा उपक्रम दोन महिन्यातून एकदा तरी आयोजित करण्यात यावा, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. आयटीआय मार्गावरील मंगळवार आठवडा बाजार येथे या मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी झेंडा दाखवला व शंभर नागरिकांनी हातखंब्याकडे कूच केली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉनचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याहस्ते करण्यात आले. रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य धरमसी चौहान यांनी या मॅरेथॉनला झेंडा दाखवला.शिवाजीनगर ते हातखंबा या मॅरेथॉन मार्गावर रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था दहा ठिकाणी करण्यात आली होती. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सायकलस्वारांसाठी साळवी स्टॉप येथील चिरायू हॉस्पिटल शेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा करण्यात आली होती.सायकल ट्रॅक उभारारत्नागिरी शहरात दुचाकी, चारचाकी व रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रस्त्याने जाताना सायकलस्वारांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता शहरातील रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनRatnagiriरत्नागिरी