शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

रत्नागिरी : प्रकल्पग्रस्त शेतकरी सळो की पळो करून सोडणार - संतोष चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 16:55 IST

कोकण रेल्वे प्रकल्पासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्यांना नोकऱ्या देण्याऐवजी स्वत:च्या फायद्यासाठी, आपली तुंबडी भरून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य तो धडा शिकविला पाहिजे. सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र येऊन हा धडा शिकवूया. प्रकल्पग्रस्त शेतकरी कोकण रेल्वे प्रशासनाला सळो की पळो करून सोडतील, असे प्रतिपादन कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्त शेतकरी सळो की पळो करून सोडणार - संतोष चव्हाण यांचा इशारा सिंधुदुर्ग, रायगडमधील प्रकल्पग्रस्तांची सभा

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रकल्पासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्यांना नोकऱ्या देण्याऐवजी स्वत:च्या फायद्यासाठी, आपली तुंबडी भरून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य तो धडा शिकविला पाहिजे. सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र येऊन हा धडा शिकवूया. प्रकल्पग्रस्त शेतकरी कोकण रेल्वे प्रशासनाला सळो की पळो करून सोडतील, असे प्रतिपादन कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले.रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील सर्व कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जाहीर सभा रत्नागिरीत आयोजित करण्यात आली होती. ही सभा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

सभेला कृती समितीचे कार्याध्यक्ष विनायक मुकादम, सचिव अमोल सावंत, सहसचिव प्रभाकर सहदेव हातणकर, प्रतीक्षा सावंत, लांजा महिला संघटक भिंगार्डे, राजापूर तालुका संघटक यश भिंगार्डे, सिंधुदुर्गचे प्रतिनिधी पांडुरंग सुतार, मुरारी पेडणेकर हे उपस्थित होते. कृती समितीचे समर्थक श्री. विनय लुबडे हे मुंबईहून या सभेला उपस्थित राहिले होते.अमोल सावंत यांनी स्वागत केले. उपस्थित सर्व उमेदवारांमध्ये कोकण रेल्वेने असिस्टंट स्टेशन मास्तर, गुडस गार्डस साठी परीक्षा दिलेले तसेच ह्यडीह्ण ग्रुपची परीक्षा दिलेले परंतु आजपर्यंत त्यांना निकालासंदर्भात काहीच कळविलेले नाही असे अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरीही उपस्थित होते.कृती समितीचे कार्याध्यक्ष विनायक मुकादम म्हणाले की, कोकण रेल्वे प्रशासनाने ०३/२०१८ च्या अधिसुचनेनुसार असिस्टंट स्टेशन मास्तर, गुड्स गार्डस इत्यादी केवळ १२५ पदांसाठी निव्वळ कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांमधून आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार होते.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना खुली करून ऑनलाईनद्वारे अर्ज तसेच परीक्षा झाल्या. परंतु दुर्दैवाने कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांमधील एकही उमेदवार न घेता परप्रांतीय, परजिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तेतर उमेदवारांनाच कोकण रेल्वे भरती अधिकाऱ्यांनी जास्त प्राधान्य दिले आहे, असे सांगितले.कृती समितीचे सहसचिव प्रभाकर हातणकर यांनी सांगितले की, कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात मुख्य कार्मिक अधिकारी ठाकूर यांचेसमवेत झालेल्या बैठकीत हे उमेदवार जर का बाहेरचे आहेत म्हणजेच प्रकल्पग्रस्तेतर आहेत असे आढळले तर आम्ही त्यांना बाहेर काढू, असे सांगितले होते. परंतु आता ह्या अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी