शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

रत्नागिरी : प्रकल्पग्रस्त शेतकरी सळो की पळो करून सोडणार - संतोष चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 16:55 IST

कोकण रेल्वे प्रकल्पासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्यांना नोकऱ्या देण्याऐवजी स्वत:च्या फायद्यासाठी, आपली तुंबडी भरून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य तो धडा शिकविला पाहिजे. सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र येऊन हा धडा शिकवूया. प्रकल्पग्रस्त शेतकरी कोकण रेल्वे प्रशासनाला सळो की पळो करून सोडतील, असे प्रतिपादन कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्त शेतकरी सळो की पळो करून सोडणार - संतोष चव्हाण यांचा इशारा सिंधुदुर्ग, रायगडमधील प्रकल्पग्रस्तांची सभा

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रकल्पासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्यांना नोकऱ्या देण्याऐवजी स्वत:च्या फायद्यासाठी, आपली तुंबडी भरून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य तो धडा शिकविला पाहिजे. सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र येऊन हा धडा शिकवूया. प्रकल्पग्रस्त शेतकरी कोकण रेल्वे प्रशासनाला सळो की पळो करून सोडतील, असे प्रतिपादन कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले.रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील सर्व कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जाहीर सभा रत्नागिरीत आयोजित करण्यात आली होती. ही सभा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

सभेला कृती समितीचे कार्याध्यक्ष विनायक मुकादम, सचिव अमोल सावंत, सहसचिव प्रभाकर सहदेव हातणकर, प्रतीक्षा सावंत, लांजा महिला संघटक भिंगार्डे, राजापूर तालुका संघटक यश भिंगार्डे, सिंधुदुर्गचे प्रतिनिधी पांडुरंग सुतार, मुरारी पेडणेकर हे उपस्थित होते. कृती समितीचे समर्थक श्री. विनय लुबडे हे मुंबईहून या सभेला उपस्थित राहिले होते.अमोल सावंत यांनी स्वागत केले. उपस्थित सर्व उमेदवारांमध्ये कोकण रेल्वेने असिस्टंट स्टेशन मास्तर, गुडस गार्डस साठी परीक्षा दिलेले तसेच ह्यडीह्ण ग्रुपची परीक्षा दिलेले परंतु आजपर्यंत त्यांना निकालासंदर्भात काहीच कळविलेले नाही असे अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरीही उपस्थित होते.कृती समितीचे कार्याध्यक्ष विनायक मुकादम म्हणाले की, कोकण रेल्वे प्रशासनाने ०३/२०१८ च्या अधिसुचनेनुसार असिस्टंट स्टेशन मास्तर, गुड्स गार्डस इत्यादी केवळ १२५ पदांसाठी निव्वळ कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांमधून आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार होते.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना खुली करून ऑनलाईनद्वारे अर्ज तसेच परीक्षा झाल्या. परंतु दुर्दैवाने कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांमधील एकही उमेदवार न घेता परप्रांतीय, परजिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तेतर उमेदवारांनाच कोकण रेल्वे भरती अधिकाऱ्यांनी जास्त प्राधान्य दिले आहे, असे सांगितले.कृती समितीचे सहसचिव प्रभाकर हातणकर यांनी सांगितले की, कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात मुख्य कार्मिक अधिकारी ठाकूर यांचेसमवेत झालेल्या बैठकीत हे उमेदवार जर का बाहेरचे आहेत म्हणजेच प्रकल्पग्रस्तेतर आहेत असे आढळले तर आम्ही त्यांना बाहेर काढू, असे सांगितले होते. परंतु आता ह्या अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी