शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

रत्नागिरी : टंचाईने लोक झाले त्रस्त; पाणी योजना नादुरूस्त,  अल्प पाणीपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:35 IST

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने त्याचा परिणाम ८५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या नळपाणी योजनांची पाणीपट्टी ही दुरूस्तीच्या खर्चापेक्षाही कमीच असल्याने ही दुरूस्ती आता जिल्हा परिषदेला डोईजड होऊ लागली आहे. ऐन पाणीटंचाईच्या तोंडावर या योजना नादुरूस्त असल्याने आता तेथे टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

ठळक मुद्दे टंचाईने लोक झाले त्रस्त; पाणी योजना नादुरूस्त,  अल्प पाणीपट्टी- दुरूस्तीवर खर्च होतात दरवर्षी लाखो रूपये

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने त्याचा परिणाम ८५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या नळपाणी योजनांची पाणीपट्टी ही दुरूस्तीच्या खर्चापेक्षाही कमीच असल्याने ही दुरूस्ती आता जिल्हा परिषदेला डोईजड होऊ लागली आहे. ऐन पाणीटंचाईच्या तोंडावर या योजना नादुरूस्त असल्याने आता तेथे टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे.जिल्हा परिषदेने ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे आजही लाखो लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांतील वाड्यांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी झालेले होते. नळपाणी योजनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात ही गैरसोय दूर करण्यात आली होती.

मात्र, नळपाणी योजनांच्या दुरुस्तीकडे गेल्या वर्षीपासून दुर्लक्ष करण्यात आल्याने त्या प्रमाणापेक्षा जास्त नादुरूस्त झाल्या आहेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे तिन्ही हंगामात पाण्यासाठी हाल होतात.नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येत असले तरी ही दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेकदा योजना नादुरुस्त झाल्याने जनतेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.

त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींची धडपड सुरु असते. ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या शेकडो योजना नादुरुस्त आहेत. जिल्ह्यातील ६४ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करण्यात येणार आहेत.वसुलीपेक्षा खर्चच जास्तग्रामीण भागातील नळपाणी योजनांच्या पाणीपट्टीतून जिल्हा परिषदेला कमी प्रमाणात महसूल मिळतो. तरीही पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. पाणीपट्टी वसुलीपेक्षा हा खर्च जास्त असतो.आराखड्यात दुरूस्तीची कामेनळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होत्या. पाण्यासाठी लोकांचेही हाल होत असल्याने पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये त्यांच्या दुरुस्तीची कामे घेतली आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीzpजिल्हा परिषद