शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : टंचाईने लोक झाले त्रस्त; पाणी योजना नादुरूस्त,  अल्प पाणीपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:35 IST

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने त्याचा परिणाम ८५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या नळपाणी योजनांची पाणीपट्टी ही दुरूस्तीच्या खर्चापेक्षाही कमीच असल्याने ही दुरूस्ती आता जिल्हा परिषदेला डोईजड होऊ लागली आहे. ऐन पाणीटंचाईच्या तोंडावर या योजना नादुरूस्त असल्याने आता तेथे टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

ठळक मुद्दे टंचाईने लोक झाले त्रस्त; पाणी योजना नादुरूस्त,  अल्प पाणीपट्टी- दुरूस्तीवर खर्च होतात दरवर्षी लाखो रूपये

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने त्याचा परिणाम ८५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या नळपाणी योजनांची पाणीपट्टी ही दुरूस्तीच्या खर्चापेक्षाही कमीच असल्याने ही दुरूस्ती आता जिल्हा परिषदेला डोईजड होऊ लागली आहे. ऐन पाणीटंचाईच्या तोंडावर या योजना नादुरूस्त असल्याने आता तेथे टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे.जिल्हा परिषदेने ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे आजही लाखो लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांतील वाड्यांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी झालेले होते. नळपाणी योजनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात ही गैरसोय दूर करण्यात आली होती.

मात्र, नळपाणी योजनांच्या दुरुस्तीकडे गेल्या वर्षीपासून दुर्लक्ष करण्यात आल्याने त्या प्रमाणापेक्षा जास्त नादुरूस्त झाल्या आहेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे तिन्ही हंगामात पाण्यासाठी हाल होतात.नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येत असले तरी ही दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेकदा योजना नादुरुस्त झाल्याने जनतेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.

त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींची धडपड सुरु असते. ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या शेकडो योजना नादुरुस्त आहेत. जिल्ह्यातील ६४ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करण्यात येणार आहेत.वसुलीपेक्षा खर्चच जास्तग्रामीण भागातील नळपाणी योजनांच्या पाणीपट्टीतून जिल्हा परिषदेला कमी प्रमाणात महसूल मिळतो. तरीही पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. पाणीपट्टी वसुलीपेक्षा हा खर्च जास्त असतो.आराखड्यात दुरूस्तीची कामेनळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होत्या. पाण्यासाठी लोकांचेही हाल होत असल्याने पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये त्यांच्या दुरुस्तीची कामे घेतली आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीzpजिल्हा परिषद