शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रत्नागिरी : कुळांना मालकी हक्क मिळालाच पाहिजे, चिपळुणात जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 13:55 IST

शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला कुळांना १०० टक्के मिळालाच पाहिजे. नाही तर चौपदरीकरणाच्या कामाची एक वीटही लावू देणार नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व विविध मागण्यांसाठी चिपळुणात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकुळांना मालकी हक्क मिळालाच पाहिजेचिपळुणात जनआक्रोश मोर्चा

चिपळूण : पेढे - परशुराम येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या जमिनी कसत आहेत. येथील देवस्थान ट्रस्टने अन्याय केला आहे. कुळांना मालकी हक्क मिळालाच पाहिजे, शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला कुळांना १०० टक्के मिळालाच पाहिजे. नाही तर चौपदरीकरणाच्या कामाची एक वीटही लावू देणार नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व विविध मागण्यांसाठी चिपळुणात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने तहसीलदार जीवन देसाई यांना निवेदन देण्यात आले. पेढे परशुराम या दोन गावातील ग्रामस्थ व महिला आपल्या घराला कुलूप लावून जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.संघर्ष समिती पेढे परशुरामवासियांनी परशुराम येथून फरशीतिठामार्गे बाजारपूल, चिंचनाका, प्रांत कार्यालयापर्यंत आपल्या न्याय हक्कासाठी जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे २ हजार ग्रामस्थ सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये आमदार सदानंद चव्हाण, खेडचे आमदार संजय कदम, मनसे खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम सहभागी झाले होते.यावेळी संघर्ष समिती पेढे परशुरामचे उपाध्यक्ष सुरेश बहुतुले यांनी सांगितले की, ७/१२ उताऱ्यावरील श्री देव भार्गवराम व खोतांची नावे कमी करुन त्या ठिकाणी कुळांची नावे मालक म्हणून लावावीत. शासनाने संपादित केलेल्या जमिनीला १०० टक्के मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली.चोख पोलीस बंदोबस्तसोमवारी सकाळी १० वाजल्यापासून परशुराम मंदिरापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत सुमारे ५ किमीचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला व विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. दुपारी २.३० पर्यंत मोर्चातील एकाही ग्रामस्थाने आपली जागा सोडली नाही. मोर्चासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग