शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी :दोन ट्रकवर दंडात्मक कारवाई, कोल्हापूरच्या ट्रकचालकाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 11:50 IST

वाहतूक परवाना नसताना चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करत तहसील कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसात ५८ हजार रूपयांचा दंड केल्याने अवैधरित्या चिऱ्याची व वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देलांजा तालुक्यात दोन ट्रकवर कारवाई परवाना नसल्याने ट्रक ताब्यात, ४५ हजारांचा दंड

लांजा : वाहतूक परवाना नसताना चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करत तहसील कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसात ५८ हजार रूपयांचा दंड केल्याने अवैधरित्या चिऱ्याची व वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांचे धाबे दणाणले आहेत.सुनील वासू पवार (विजापूर) हा ट्रक (केए - २८ - सी - २७३१) घेऊन विजापूरहून पावस येथे भात घेऊन आला होता. पावस येथे भात उतरल्यानंतर परत रिकामे जाण्यापेक्षा पावस येथून पाच ब्रास चिरा खरेदी करुन तो परत विजापूरकडे निघाला होता.

मात्र, यावेळी चिरेखाण मालक यांच्याकडून वाहतुकीचा परवाना घेतला नव्हता. लांजा-कोर्ले फाटा येथे तपासणी पथकाने गाडी अडविली. त्याच्याकडे परवाना नसल्याने ट्रक ताब्यात घेऊन ४५ हजारांचा दंड ठोठावला आहे.त्याचप्रमाणे वाटूळ येथे ट्रकमध्ये (एमएच - ११ - एल-४४३५) क्षमतेपेक्षा अधिक वाळू सिलिका वाळू भरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अशोक बनसोडे (कोल्हापूर) याला तपासणीसाठी थांबवले.

ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये २०ऐवजी २६ टन वाळू भरल्याचे आढळल्याने त्याला १३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.तहसीलदार वनिता पाटील यांच्यासह नायब तहसीलदार काका कुलकर्णी व तलाठ्यांनी या पथकामध्ये सहभाग घेतला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडीTahasildarतहसीलदार