शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पोषण आहारावरून रत्नागिरी पंचायत समितीत हंगामा, सदस्य आक्रमक, सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:05 IST

निकृष्ट शालेय पोषण आहाराच्या विषयावरून पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी हंगामा केला.

ठळक मुद्देपोषण आहारावरून रत्नागिरी पंचायत समितीत हंगामा, सदस्य आक्रमक, सभा गाजली, पोषण आहाराच्या गोदामाबाबत अधीक्षकच अनभिज्ञ

रत्नागिरी : निकृष्ट शालेय पोषण आहाराच्या विषयावरून पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी हंगामा केला.

धान्याच्या गोदामाची पाहणी करण्याची सर्वच सदस्यांनी मागणी करून प्रत्यक्ष पाहाण्यास ते निघाले. मात्र, दर महिन्याला आपण धान्य तपासणी करतो, अशा थापा देणाऱ्या पोषण आहार अधीक्षकालाच हे गोदाम कुठे आहे, हे माहीत नसल्याचे कळताच शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.

शालेय पोषण आहारासाठी आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी वितरित केलेले धान्य वापरू नये तसेच मुख्याध्यापकांनी खुल्या बाजारातून धान्य घेऊन मुलांना पोषण आहार शिजवून द्यावा, असा निर्णय आज शिक्षण समितीत घेण्यात आला.पंचायत समितीची मासिक सभा सभापती विभांजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शामराव पेजे सभागृहात झाली. यावेळी महावितरण, ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, आरोग्य, आदी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

उपसभापती शंकर सोनवडकर, सदस्य गजानन पाटील, ऋषिकेश भोंगले, मेघना पाष्टे, उत्तम सावंत यांच्यासह अन्य सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याचवेळी निकृष्ट शालेय पोषण आहारावरून सभा गाजली.

पंचायत समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी कुवारबाव आणि मिरजोळे शाळेतील मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारीनुसार पोषण आहाराचे निकृष्ट धान्य शाळांना वाटप झाल्याची माहिती दिली.

याचा जाब पोषण आहार अधीक्षक संतोष कटाळे यांना विचारण्यात आला. परंतु त्यांनी १५ दिवस आपण रजेवर असल्याचे सांगितले. मात्र, पाटील यांनी ही रजा अधिकृत आहे का? असे विचारले असता ते निरूत्तर झाले.पाटील यांनी वितरित केलेले धान्य अत्यंत निकृष्ट आहे. हरभऱ्यात काड्या, तसेच मूगडाळीत टोके पडलेली असल्याची माहिती दिली. जनावरेही खाणार नाहीत, असे हे धान्य असून, हा मुलांच्या जीविताशी चाललेला खेळ आहे, असे पाटील यांनी सांगितले. याबाबत पाहणी केली का, अशी कटाळे यांच्याकडे विचारणा करता त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.कोल्हापूरचे ठेकेदार रामदास जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांना गोडावूनमध्ये धान्य शिल्लक नसून, कामगार गावी गेल्याचे सांगितले. त्यामुळे त्यातील भ्रष्टाचार सर्वांच्या निदर्शनास आला. त्यामुळे आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी वितरित धान्य वापरू नये, मुख्याध्यापकांनी खुल्या बाजारातून धान्य घेऊन मुलांना पोषण आहार शिजवून द्यावा, असा निर्णय या सभेत घेण्यात आला.गोडावून केले सीलसर्व सदस्य उद्यमनगर येथील गोडावूनची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र, तेथील गोडावूनला टाळे असल्याने पाहणी करता आली नाही. परंतु, गोडावूनच्या पाठीमागच्या बाजूने आतमध्ये पाहिले असता धान्याची पोती मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसले. ठेकेदार आणि अधीक्षक दिशाभूल करत असल्याने हे गोडावून सील करण्यात आले आहे.ठेका रद्द करण्याची मागणीमंगळवारी शिक्षण समितीच्या बैठकीतही शालेय पोषण आहाराचा मुद्दा चर्चेला घेण्यात आला. यावेळी शिक्षण सभापती बेटकर यांनी अधीक्षक संतोष कटाळे यांना फैलावर घेतले. काही दिवसांपूर्वी खेड येथे ३३ मुलांना आहारातून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच निकृष्ट धान्य पुरवठ्यावरून ते संतापले.

या ठेकेदारावर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करत नवा ठेकेदार नेमावा आणि या ठेकेदाराचे कोणतेही बिल पास करू नये, असा ठराव करण्यात आला. यावेळी येथे उपस्थित सदस्य बाळकृष्ण जाधव यांनीही कटाळे यांना फैलावर घेतले.शिक्षणाधिकारी यांच्याकडून आॅगस्टमध्येच पत्रशिक्षणाधिकारी देविदास कुल्हाळ आणि शिंदे यांनी २७ आॅगस्ट रोजी या धान्याची तपासणी केली असल्याचे सांगितले आणि हे धान्य निकृष्ट असल्याचे ठेकेदाराला पत्र पाठवले आहे, असेही सांगितले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीRatnagiriरत्नागिरी