शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रत्नागिरी बसस्थानकाचे काम रेंगाळले-: दगड न लागल्याने खोदाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:04 IST

राज्य परिवहन महामंडळाने राज्यात हायटेक बसस्थानके उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, चिपळूण व लांजा ही बसस्थानके नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी चिपळूण व रत्नागिरी बसस्थानकांचे  काम सुरू झाले आहे

ठळक मुद्देवाढीव खर्चासाठी प्रस्ताव सादरचिपळूण बसस्थानकाचे काम सध्या झपाट्याने सुरू

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने राज्यात हायटेक बसस्थानके उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, चिपळूण व लांजा ही बसस्थानके नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी चिपळूण व रत्नागिरी बसस्थानकांचे  काम सुरू झाले आहे. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातील ग्रामीण वाहतूक होणाºया ठिकाणची प्रवासी शेड तोडण्यात आली असून, दोन जेसीबी लावून याठिकाणी चर खोदाईचे सुरू असलेले काम काहीसे रेंगाळले आहे.

आघाडी सरकारच्या कारकिर्दीत बीओटी तत्वावर (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा) रत्नागिरी बसस्थानक मंजूर करण्यात आले होते. बसस्थानकाच्या १७ कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली होती. या कामाचे भूमिपूजनदेखील झाले होते. मात्र, सत्तांतरानंतर परिवहन मंत्रीपद दिवाकर रावते यांना मिळाले. त्यांनी रत्नागिरी बसस्थानकाचा बीओटी तत्वावरील प्रस्तावच रद्द केला व   शासनाच्या माध्यमातून बसस्थानक बांधण्याचे निश्चित केले. एकाचवेळी त्यांनी राज्यातील काही बसस्थानकांना मंजुरी दिली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक, लांजा बसस्थानक, चिपळूण बसस्थानकाला मान्यता मिळाली. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकासाठी दहा लाखांचा आराखडा मंजूर केला आहे. आराखडा निश्चितीनंतर पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आराखड्यात काही बदल सूचवले. 

त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्यात आल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले. रत्नागिरी बसस्थानकाची ‘जी प्लस टू’ अशी नवीन इमारत होणार असून, त्यात  व्यापारी गाळ्यांसह आरामदायी आसनव्यवस्था, प्लॅटफॉर्मसह चालक, वाहक, अधिकाºयांसाठी विश्रांती कक्ष व प्रवाशांसाठी अनेक अद्ययावत सोयीसुविधा देण्यात येणार आहेत.  

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक सध्या रहाटाघर बसस्थानकामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे रहाटाघर बसस्थानकातून बस सुटल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकात येऊनच पुढे रवाना होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील जुनी शेड पाडून त्याठिकाणी खोदकाम सुरू केले आहे. याठिकाणी सात ते आठ फूट खोदाई करण्यात आली आहे. मात्र, कठिण दगड लागणे अपेक्षित असताना अद्याप मऊ मातीच लागत असल्यामुळे खोदाईचा खर्च वाढला आहे. खोदाई बरोबर कॉलम टाकण्यासाठी फाऊंडेशन टाकणे गरजेचे आहे, त्याकरिताच्या वाढीव खर्चासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतु, मे महिन्यात टाकले जाणारे हे कॉलम भरणे आवश्यक आहे. अन्यथा त्यात पावसाचे पाणी साचून काम वाढण्याचीच शक्यता आहे. नियोजित कामासाठी ३० महिने निश्चित करण्यात आले असले तरी सध्या धीम्या गतीने सुरू असलेले काम पाहिले तर आणखी अवधी लागण्याची शक्यता आहे.

चिपळूण बसस्थानकाचे काम बºयापैकी गतीने सुरू आहे. मात्र, लांजा बसस्थानकाचे काम सुरू होण्यापूर्वीच निविदा प्रक्रियेमध्ये रखडले आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे प्रशासकीय कामकाज पूर्णत: थांबले आहे. गेल्या ६८ वर्षांमध्ये रत्नागिरी  बसस्थानकाचा टप्याटप्याने विस्तार झाला. १९५० साली राज्य परिवहन रत्नागिरी विभागाची स्थापना झाली. गेल्या ६८ वर्षात रत्नागिरी विभागाने यशस्वी वाटचाल केली आहे. राज्य परिवहन मुंबई प्रदेशातील रत्नागिरी विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे. रत्नागिरी विभागातील तीन बसस्थानकांच्या नूतनीकरणाला हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, यातील  चिपळूण बसस्थानकाचे काम सध्या झपाट्याने सुरू आहे. रत्नागिरी बसस्थानक खोदाईच्या कामात तर लांजा बसस्थानकाचे काम निविदा प्रक्रियेत रखडले आहे.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी