शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी बसस्थानकाचे काम रेंगाळले-: दगड न लागल्याने खोदाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:04 IST

राज्य परिवहन महामंडळाने राज्यात हायटेक बसस्थानके उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, चिपळूण व लांजा ही बसस्थानके नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी चिपळूण व रत्नागिरी बसस्थानकांचे  काम सुरू झाले आहे

ठळक मुद्देवाढीव खर्चासाठी प्रस्ताव सादरचिपळूण बसस्थानकाचे काम सध्या झपाट्याने सुरू

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने राज्यात हायटेक बसस्थानके उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, चिपळूण व लांजा ही बसस्थानके नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी चिपळूण व रत्नागिरी बसस्थानकांचे  काम सुरू झाले आहे. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातील ग्रामीण वाहतूक होणाºया ठिकाणची प्रवासी शेड तोडण्यात आली असून, दोन जेसीबी लावून याठिकाणी चर खोदाईचे सुरू असलेले काम काहीसे रेंगाळले आहे.

आघाडी सरकारच्या कारकिर्दीत बीओटी तत्वावर (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा) रत्नागिरी बसस्थानक मंजूर करण्यात आले होते. बसस्थानकाच्या १७ कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली होती. या कामाचे भूमिपूजनदेखील झाले होते. मात्र, सत्तांतरानंतर परिवहन मंत्रीपद दिवाकर रावते यांना मिळाले. त्यांनी रत्नागिरी बसस्थानकाचा बीओटी तत्वावरील प्रस्तावच रद्द केला व   शासनाच्या माध्यमातून बसस्थानक बांधण्याचे निश्चित केले. एकाचवेळी त्यांनी राज्यातील काही बसस्थानकांना मंजुरी दिली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक, लांजा बसस्थानक, चिपळूण बसस्थानकाला मान्यता मिळाली. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकासाठी दहा लाखांचा आराखडा मंजूर केला आहे. आराखडा निश्चितीनंतर पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आराखड्यात काही बदल सूचवले. 

त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्यात आल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले. रत्नागिरी बसस्थानकाची ‘जी प्लस टू’ अशी नवीन इमारत होणार असून, त्यात  व्यापारी गाळ्यांसह आरामदायी आसनव्यवस्था, प्लॅटफॉर्मसह चालक, वाहक, अधिकाºयांसाठी विश्रांती कक्ष व प्रवाशांसाठी अनेक अद्ययावत सोयीसुविधा देण्यात येणार आहेत.  

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक सध्या रहाटाघर बसस्थानकामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे रहाटाघर बसस्थानकातून बस सुटल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकात येऊनच पुढे रवाना होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील जुनी शेड पाडून त्याठिकाणी खोदकाम सुरू केले आहे. याठिकाणी सात ते आठ फूट खोदाई करण्यात आली आहे. मात्र, कठिण दगड लागणे अपेक्षित असताना अद्याप मऊ मातीच लागत असल्यामुळे खोदाईचा खर्च वाढला आहे. खोदाई बरोबर कॉलम टाकण्यासाठी फाऊंडेशन टाकणे गरजेचे आहे, त्याकरिताच्या वाढीव खर्चासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतु, मे महिन्यात टाकले जाणारे हे कॉलम भरणे आवश्यक आहे. अन्यथा त्यात पावसाचे पाणी साचून काम वाढण्याचीच शक्यता आहे. नियोजित कामासाठी ३० महिने निश्चित करण्यात आले असले तरी सध्या धीम्या गतीने सुरू असलेले काम पाहिले तर आणखी अवधी लागण्याची शक्यता आहे.

चिपळूण बसस्थानकाचे काम बºयापैकी गतीने सुरू आहे. मात्र, लांजा बसस्थानकाचे काम सुरू होण्यापूर्वीच निविदा प्रक्रियेमध्ये रखडले आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे प्रशासकीय कामकाज पूर्णत: थांबले आहे. गेल्या ६८ वर्षांमध्ये रत्नागिरी  बसस्थानकाचा टप्याटप्याने विस्तार झाला. १९५० साली राज्य परिवहन रत्नागिरी विभागाची स्थापना झाली. गेल्या ६८ वर्षात रत्नागिरी विभागाने यशस्वी वाटचाल केली आहे. राज्य परिवहन मुंबई प्रदेशातील रत्नागिरी विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे. रत्नागिरी विभागातील तीन बसस्थानकांच्या नूतनीकरणाला हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, यातील  चिपळूण बसस्थानकाचे काम सध्या झपाट्याने सुरू आहे. रत्नागिरी बसस्थानक खोदाईच्या कामात तर लांजा बसस्थानकाचे काम निविदा प्रक्रियेत रखडले आहे.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी