शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

रत्नागिरी :  विभागीय वन अधिकारीच नसल्याने फळबाग लागवडीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 1:35 PM

रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीसाठी कार्यान्वीन यंत्रणा म्हणुन मान्यता मिळालेल्या सार्वजनिक वनीकरण विभागाला गेल्या दोन तीन महिन्यापासून विभागीय वन अधिकारीच नसल्याने सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या फळबाग लागवडीच्या कामात जिल्ह्यात समन्वयाचा अभाव जाणवत आहे.

ठळक मुद्देविभागीय वन अधिकारीच नसल्याने फळबाग लागवडीला फटकाजिल्ह्यात समन्वयाचा अभाव

रत्नागिरी : रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीसाठी कार्यान्वीन यंत्रणा म्हणुन मान्यता मिळालेल्या सार्वजनिक वनीकरण विभागाला गेल्या दोन तीन महिन्यापासून विभागीय वन अधिकारीच नसल्याने सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या फळबाग लागवडीच्या कामात जिल्ह्यात समन्वयाचा अभाव जाणवत आहे.नरेगामार्फत सुरू असलेल्या ५० कोटी वृक्षलागवडीत सार्वजनिक वनीकरण विभागाची रोपे तयार करण्यात महत्वाची भुमिका आहे. परंतु कोकणातील फळलागवडीचे महत्व लक्षात घेऊन या विभागाला प्रशासकीय यंत्रणा म्हणुन शासनाने विशेष बाब म्हणुन १२ एप्रिल रोजी अध्यादेशाद्वारे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील काजू लागवडीसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे फळबाग योजनेत शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषद कृषी विभाग या दोन यंत्रणांबरोबरच सामाजिक वनीकरण विभाग अशा तीन यंत्रणा कार्यान्वीन यंत्रणा म्हणुन काम करीत आहेत.यावर्षी नरेगाअंतर्गत ५० कोटी वृक्ष लागवडीचे काम महाराष्ट्रात सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यात झाले आहे. याचबरोबर फळबाग लागवडीचे कामही चांगल्या प्रकारे झाले आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे सामाजिक वनीकरण विभागाच्या योजना तसेच रोजगार हमी योजनांची मिळफन १४४.४६ हेक्टर क्षेत्रावर १ लाख ४७ हजार १२९ रोपे तयार करण्यात आली आहेत. सध्या नरेगाअंतर्गत सुरू असलेल्या फळबाग लागवडीसाठीही रोपवाटिक़ा तयार करून सर्व यंत्रणांना ती रोपे पुरविण्याचे प्रमुख काम या विभागाकडून केले जात आहे.रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता काजू, आंबा, साग व बांबू ही झाडे महत्वाची आहे. विशेषत: लांजा, राजापूर, चिपळूण, खेड या तालुक्यांमध्ये बांबुची लागवड लक्षणीय होत आहे. यातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.

सामाजिक वनीकरण विभागाचे जिल्हा वन अधिकारी सी. एल. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी फळबाग लागवडीच्या कामाला वेग आला होता. त्यामुळे जिल्ह्यात या सर्वच यंत्रणांमध्ये चांगला समन्वयही साधला जात होता.

मात्र, सध्या सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी धुमाळ यांची दोन तीन महिन्यापुर्वीच सांंगली जिल्ह्यात कुंडल येथे बढतीने बदली झाली आहे. त्यांचा अतिरिक्त कार्यभार अलिबाग येथील विभागीय वन अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे या यंत्रणांमधील समन्वय तुटला आहे. फळबाग लागवडीच्या कार्यान्विन यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी सामाजिक वनीकरण विभागाला अधिकारी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.फळबाग लागवड योजनेत शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषद कृषी विभाग या दोनच यंत्रणा कार्यान्विन यंत्रणा होत्या. सामाजिक वनीकरण विभागाकडे साग, चंदन, खैर, बांबू, नीम, आवळा, हिरडा, बेहडा, अर्जुन, सुरू आदी विशाल वृक्षांच्या लागवडीचे काम होते.

मात्र, या दोन जिल्ह्यांतील यशस्वी लागवडीचे काम लक्षात घेऊन शासनाने १२ एप्रिल रोजी अध्यादेशाद्वारे या दोन जिल्ह्यांसाठी आंबा व काजू लागवडीसाठी प्रशासकीय यंत्रणा म्हणुन सामाजिक वनीकरण विभागाला मान्यता दिली आहे. त्यामुळे मनरेगा फळबाग लागवडीसाठी आता तीन कार्यान्वीन यंत्रणा तयार झाल्या. त्यामुळे अधिक हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यानुसार रोपांची उपलब्धतेच्यादृष्टीने नियोजन करून फळबाग लागवड यशस्वीही झाली. त्यानंतर आता साग, बांबू लागवडीलाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र, त्यासाठी समन्वय साधणे अवघड झाले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग