शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

रत्नागिरी : परिस्थितीनेच मला बनवली हजारो अनाथांची माय : सिंधुताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:12 IST

गेली ५० वर्षे अनेक अनाथांना मांडीवर घेऊन जगताना हजारोंची माय होण्याचा आनंद मिळाला. जीवनात माझ्यावर ओढवलेल्या अती वाईट परिस्थितीमुळे मला ही संधी मिळाली, त्याचे मला जराही दु:ख नसल्याची भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपरिस्थितीनेच मला बनवली हजारो अनाथांची माय : सिंधुताई सपकाळश्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त अनुभव कथन

गुहागर : आयुष्यभर भीक मागून जगणे आणि अनाथांना जगविणे हाच आपला जीवनक्रम राहिला आहे. सासरबरोबरच माहेरच्यांनी हाकलून दिल्यानंतर वयाच्या १९व्या वर्षापासून सर्वत्र भटकत असताना स्वत:साठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगण्याचा मार्ग सापडला. गेली ५० वर्षे अनेक अनाथांना मांडीवर घेऊन जगताना हजारोंची माय होण्याचा आनंद मिळाला. जीवनात माझ्यावर ओढवलेल्या अती वाईट परिस्थितीमुळे मला ही संधी मिळाली, त्याचे मला जराही दु:ख नसल्याची भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.गुहागरमधील प्रसिध्द श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त गुहागर रंगमंदिरमध्ये १६ देशांचा जागतिक दौरा केलेल्या व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांची काळीज हेलावून सोडणारी ज्वलंत कथा व स्वानुभव ऐकण्याची संधी विश्वस्त मंडळाच्यावतीने समस्त गुहागरवासीयांना मिळाली. यावेळी देवस्थानच्यावतीने अध्यक्ष अरूण परचुरे व मंडळींनी त्यांचा सन्मान केला.वयाच्या १०व्या वर्षी लग्न झाल्यानंतर पुढे निर्माण झालेला संघर्ष व त्यात पतीने आपल्या पोटच्या बाळावरून घराबाहेर काढल्याचा प्रसंग काळीज हेलावून सोडणारा होता. पुढे ८-१० दिवसांचे बाळ हातामध्ये घेऊन गावोगावी गाणी म्हणत भीक मागण्याचा सुरू झालेला प्रवास कर्नाटक, आंध्रप्रदेशसारख्या राज्यापर्यंत गेला. याचदरम्यान रेल्वेतून सुरू झालेला प्रवास, स्टेशनवर निवारा घेण्याची वेळ, स्मशानातील चितेवर भाकरी करून पोट भरण्याचा प्रसंग अशा अनेक गोष्टी त्यांनी हुबेहुबपणे शब्दातून उपस्थितांसमोर रेखाटल्या.या सर्व प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी मरण पत्करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याचवेळी आलेले मरण बाजूला करण्याचा ईश्वरी प्रयत्न यातून जीवनात स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यातूनच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होऊन हजारो अनाथांची माय होण्याचे भाग्य मला मिळाले.

हे करण्यासाठी प्रथम पोटच्या मुलीला अनाथ शाळेत ठेवण्याचा कठोर निर्णय मी घेतला. कारण इतरांना सांभाळताना आपली माया मुलांना देताना कोणावर अन्याय होऊ नये, हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळे आज २०० जावई, ४९ सुनांची सासू, १७५ गायींची आई, ७५० विविध पुरस्कारांची मानकरी, ३ राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित होण्याचे भाग्य मला मिळाले. आज माझी पोटची मुलगीही माझेच कार्य पुढे नेत आहे, तर इतर सर्व मुले व मुली संस्थेच्या कार्याला हातभार लावत आहेत. माझे कार्य पाहून सासरच्या मंडळींनी ६-७ वर्षांपूर्वी माझा सन्मान केला, असे त्या म्हणाल्या.अनुभव कथनआयुष्यातील आपले अनुभव सांगताना त्यांनी संतांच्या ओव्यांनी सुरूवात करत उपस्थितांची मने जिंकली. जीवन काय आहे, याचा अर्थ सांगताना स्त्रीचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यानंतर स्वत:च्या आईपासूनच झालेल्या अन्यायकारक वागणुकीचा पुढे नवरा व सासरच्या मंडळींकडून कसा त्रास झाला, हे सांगितले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिकTempleमंदिर