शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रत्नागिरी : परिस्थितीनेच मला बनवली हजारो अनाथांची माय : सिंधुताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:12 IST

गेली ५० वर्षे अनेक अनाथांना मांडीवर घेऊन जगताना हजारोंची माय होण्याचा आनंद मिळाला. जीवनात माझ्यावर ओढवलेल्या अती वाईट परिस्थितीमुळे मला ही संधी मिळाली, त्याचे मला जराही दु:ख नसल्याची भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपरिस्थितीनेच मला बनवली हजारो अनाथांची माय : सिंधुताई सपकाळश्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त अनुभव कथन

गुहागर : आयुष्यभर भीक मागून जगणे आणि अनाथांना जगविणे हाच आपला जीवनक्रम राहिला आहे. सासरबरोबरच माहेरच्यांनी हाकलून दिल्यानंतर वयाच्या १९व्या वर्षापासून सर्वत्र भटकत असताना स्वत:साठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगण्याचा मार्ग सापडला. गेली ५० वर्षे अनेक अनाथांना मांडीवर घेऊन जगताना हजारोंची माय होण्याचा आनंद मिळाला. जीवनात माझ्यावर ओढवलेल्या अती वाईट परिस्थितीमुळे मला ही संधी मिळाली, त्याचे मला जराही दु:ख नसल्याची भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.गुहागरमधील प्रसिध्द श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त गुहागर रंगमंदिरमध्ये १६ देशांचा जागतिक दौरा केलेल्या व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांची काळीज हेलावून सोडणारी ज्वलंत कथा व स्वानुभव ऐकण्याची संधी विश्वस्त मंडळाच्यावतीने समस्त गुहागरवासीयांना मिळाली. यावेळी देवस्थानच्यावतीने अध्यक्ष अरूण परचुरे व मंडळींनी त्यांचा सन्मान केला.वयाच्या १०व्या वर्षी लग्न झाल्यानंतर पुढे निर्माण झालेला संघर्ष व त्यात पतीने आपल्या पोटच्या बाळावरून घराबाहेर काढल्याचा प्रसंग काळीज हेलावून सोडणारा होता. पुढे ८-१० दिवसांचे बाळ हातामध्ये घेऊन गावोगावी गाणी म्हणत भीक मागण्याचा सुरू झालेला प्रवास कर्नाटक, आंध्रप्रदेशसारख्या राज्यापर्यंत गेला. याचदरम्यान रेल्वेतून सुरू झालेला प्रवास, स्टेशनवर निवारा घेण्याची वेळ, स्मशानातील चितेवर भाकरी करून पोट भरण्याचा प्रसंग अशा अनेक गोष्टी त्यांनी हुबेहुबपणे शब्दातून उपस्थितांसमोर रेखाटल्या.या सर्व प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी मरण पत्करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याचवेळी आलेले मरण बाजूला करण्याचा ईश्वरी प्रयत्न यातून जीवनात स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यातूनच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होऊन हजारो अनाथांची माय होण्याचे भाग्य मला मिळाले.

हे करण्यासाठी प्रथम पोटच्या मुलीला अनाथ शाळेत ठेवण्याचा कठोर निर्णय मी घेतला. कारण इतरांना सांभाळताना आपली माया मुलांना देताना कोणावर अन्याय होऊ नये, हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळे आज २०० जावई, ४९ सुनांची सासू, १७५ गायींची आई, ७५० विविध पुरस्कारांची मानकरी, ३ राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित होण्याचे भाग्य मला मिळाले. आज माझी पोटची मुलगीही माझेच कार्य पुढे नेत आहे, तर इतर सर्व मुले व मुली संस्थेच्या कार्याला हातभार लावत आहेत. माझे कार्य पाहून सासरच्या मंडळींनी ६-७ वर्षांपूर्वी माझा सन्मान केला, असे त्या म्हणाल्या.अनुभव कथनआयुष्यातील आपले अनुभव सांगताना त्यांनी संतांच्या ओव्यांनी सुरूवात करत उपस्थितांची मने जिंकली. जीवन काय आहे, याचा अर्थ सांगताना स्त्रीचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यानंतर स्वत:च्या आईपासूनच झालेल्या अन्यायकारक वागणुकीचा पुढे नवरा व सासरच्या मंडळींकडून कसा त्रास झाला, हे सांगितले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिकTempleमंदिर